शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

एकाच गावाच्या तीन ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

घनश्याम नवघडे नागभीड : ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्यापासून ग्रामपंचायतीसंदर्भातील अनेक गमतीजमती समोर येत असून त्यांची चवीने चर्चाही होत आहे. ...

घनश्याम नवघडे

नागभीड : ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्यापासून ग्रामपंचायतीसंदर्भातील अनेक गमतीजमती समोर येत असून त्यांची चवीने चर्चाही होत आहे. नागभीड तालुक्यातील कुनघाडा चक हे असेच एक गाव असून, या गावाची तीन ग्रामपंचायतींमध्ये विभागणी करण्यात आल्याने हे गाव चांगलेच चर्चेत आले आहे.

कुनघाडा चक हे गाव काही रिठांमध्ये विभागल्या गेले असले तरी लौकिक अर्थाने एकच गाव आहे. हे नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या जी काही अतिसंवेदनशील गावे आहेत त्यातील मोहाळी मोकासा या गावाला हे गाव अगदी लागून आहे. सुप्रसिद्ध पांडवगुफा याच कुनघाडा गावात आहेत. कुनघाडा चक या गावाचा मोहाळी मोकासा या ग्रामपंचायतीत समावेश करण्यात आला असता तर प्रशासकीयदृष्ट्या लोकांना अतिशय सोयीचे झाले असते. मात्र या गावाचे तीन ग्रामपंचायतींमध्ये विभाजन करण्यात आले आहे. कुनघाडा चकचा अधिकांश भाग जवळजवळ चार किमी अंतरावर असलेल्या बिकली ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्यात आला आहे. तर या गावापासून तीन किमीवर पेंढरी बरड ही ग्रामपंचायत आहे. पेंढरी या महसुली गावाची सीमा कुनघाडा चक या गावापर्यंत पोहचली असल्याने, कुनघाडा चकचा एक पूर्ण मोहल्लाच पेंढरी बरड या ग्रामपंचायतीला जोडण्यात आला आहे. या मोहल्ल्यात ७० ते ८० मतदार असल्याची माहिती आहे. तर मोहाळीमध्ये कुनघाडा चकचे १०० ते १२५ मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत. आता कुनघाडा चक येथील नागरिकांना एखाद्या कामाची गरज पडली की ज्या गावात त्यांचे नाव समाविष्ट आहे, त्या गावात पायपीट करून कामासाठी जावे लागते. वास्तविक या गावास मोहाळी मोकासा हे गाव अतिशय जवळ आहे. या गावाचा मोहाळीत समावेश करावा, नाही तर ही तिन्ही गावे मिळून एक स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली तर नागरिकांना अतिशय सोयीस्कर होऊ शकते.

बॉक्स

पारडी, कोसंबीचेही असेच

नागभीड तालुक्यातील कोसंबी गवळी या गावाचीही हीच गोष्ट. कोसंबी गवळी या गावातील जवळपास १२५ मतदारांची तीन किमी अंतरावर असलेल्या पारडी ठवरे या ग्रामपंचायतींच्या मतदार यादीत नोंद आहे. उल्लेखनीय बाब ही की पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी हेच मतदार गावातच म्हणजे कोसंबी गवळी येथे मतदान करतात आणि नेमक्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी या मतदारांची पारडी ठवरे या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नोंद होते. हे असे १५ ते २० वर्षांपासून सुरू आहे. ग्रा.पं. निवडणुकीच्या वेळी आमची नावे कोसंबी गवळी ग्रामपंचायतच्या मतदार यादीत आली पाहिजेत म्हणून कोसंबी गवळीवासीयांनी अनेकदा आवाज उठविला. ग्रा.पं.च्या निवडणुकीवर यापूर्वी बहिष्कारही टाकला, पण त्यांना न्याय मिळाला नाही.