शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

तीन महिन्यात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: November 21, 2015 00:43 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीचा फटका : तीन पात्र तर दोन आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र

कर्जबाजारीपणा व नापिकीचा फटका : तीन पात्र तर दोन आत्महत्या शासकीय मदतीस अपात्रप्रवीण खिरटकर वरोरा चंद्रपूर जिल्ह्यात आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात शेतकरी आत्महत्या तपासणी बाबत जिल्हास्तरीय समितीने तीन आत्महत्या पात्र तर दोन अपात्र ठरविल्या आहेत.नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्ज परतफेडीचा तगदा या तीन कारणांनी आत्महत्या केल्या असल्यास शासनाकडून सन २००६ पासून आर्थिक मदत दिली जाते. याची अंतिम तपासणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत करून त्याबाबत निर्णय देण्यात येत असते. या समितीने तीन महिन्यात घडलेल्या पाच आत्महत्या प्रकरणांपैकी दोन प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर गावातील नानाजी उर्फ रामकृष्ण शंकर पिंपळशेंडे या शेतकऱ्याने ५ सप्टेंबर २०१५ रोजी गावाच्या पायवाटे लगतच्या विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. मृतावर दोन लाख ३१ हजार ६१९ रुपयाचे आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी आष्टाचे कर्ज होते. त्याच्या नावाने पाच हेक्टर जमीन होती. ही आत्महत्या जिल्हास्तरीय समितीने आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा येथील गणपत वसंत कुत्तरमारे या शेतकऱ्याने २६ आॅगस्ट रोजी गळफास लावून आत्महत्या केली. मृताच्या वडीलाने नावे, पत्नीच्या नावे कर्ज होते. हे प्रकरणही पात्र ठरविण्यात आले. पोंभूर्णा तालुक्यातील थेरगाव येथील अरविंद जैराम वेलादी याने २६ आॅगस्ट रोजी विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. मात्र हे प्रकरण आर्थिक मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. भद्रावती तालुक्याील घोडपेठ येथील अमरदीप दिलीप गहुकार याने २७ सप्टेंबर रोजी शेततळ्यात आत्महत्या केली. सदर प्रकरणात ट्रॅक्टरची कामे करीत असल्याने अपात्र ठरविण्यात आले. वरोरा तालुक्यातील दिंदोडा येथील देवेंद्र कवडू आत्राम या शेतकऱ्याने ११ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्यावर सहकारी सोसायटीचे कर्ज होते. सदर प्रकरण जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविले आहे.