शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्याय्य मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी

By admin | Updated: July 5, 2014 01:20 IST

उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा बुरखा फाडणारी एक घटना पुढे आली आहे.

चंद्रपूर: उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा बुरखा फाडणारी एक घटना पुढे आली आहे. बल्लारपूर येथील रितेश शुक्ला या युवकाने अनुभवलेली ही कहानी त्यानेच येथे पत्रकारांना ऐकविली.बल्लारपूर येथील सुभाष वॉर्डातील रहिवासी रितेश शुक्ला व त्याचा भाऊ रुपेश यांचा विवाह फत्तेपूर (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील कुटीया येथील विद्याप्रसाद तिवारी यांच्या दोन मुली गुंजन व कोमल यांच्याशी झाला होता. लग्नानंतर या दोन्ही बहिणी आपल्या माहेरी येत जात असत.जानेवारी महिन्यात रितेशचे सासरे विद्याप्रसाद तिवारी हे बल्लारपूर येथे आले व त्यांनी दोन्ही मुली व दोन महिने वयाच्या नातीला २० दिवसांसाठी गावी नेतो, असे सांगून घेऊन गेले. मात्र त्यानंतर अनेकदा निरोप पाठवूनही त्यांनी मुलींना बल्लारपूर येथे पाठविले नाही. त्यामुळे रितेश स्वत: कुटीया येथे गेला. दरम्यान, जिवे मारण्याच्या उद्देशाने रितेशची पत्नी, सासू व पत्नीच्या भावाने संगनमत करून जेवणात विष कालविले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी रितेशच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन, १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, मोबाईल व रोख ११ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर घराला कुलूप लाऊन सर्वजण तेथून निघून गेले.रितेशची प्रकृती बिघडल्याने सासरच्या शेजारी राहणाऱ्या विवेक वाजपेयी व त्याच्या एका मित्राने रितेशला तेथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती ठिक झाल्यानंतर रितेने जवळच असलेल्या मलवा येथील पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे तेथील जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अलाहाबाद पोलीस महानिरीक्षकाकडे तक्रार केली. मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर फत्तेपूर न्यायालयात प्रकरण दाखल केले. मात्र तेथे वकिलांचा संप सुरू असल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला. उच्च न्यायालयाचा आदेश घेऊन रितेश संबंधित पोलीस ठाण्यात पोहचला. मात्र तरीही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. पोलिसांनी तक्रार स्विकारण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी केली. ंअन्यथा विविध गुन्हे दाखल करण्याची धमकीही पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)