शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

न्याय्य मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी

By admin | Updated: July 5, 2014 01:20 IST

उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा बुरखा फाडणारी एक घटना पुढे आली आहे.

चंद्रपूर: उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा बुरखा फाडणारी एक घटना पुढे आली आहे. बल्लारपूर येथील रितेश शुक्ला या युवकाने अनुभवलेली ही कहानी त्यानेच येथे पत्रकारांना ऐकविली.बल्लारपूर येथील सुभाष वॉर्डातील रहिवासी रितेश शुक्ला व त्याचा भाऊ रुपेश यांचा विवाह फत्तेपूर (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील कुटीया येथील विद्याप्रसाद तिवारी यांच्या दोन मुली गुंजन व कोमल यांच्याशी झाला होता. लग्नानंतर या दोन्ही बहिणी आपल्या माहेरी येत जात असत.जानेवारी महिन्यात रितेशचे सासरे विद्याप्रसाद तिवारी हे बल्लारपूर येथे आले व त्यांनी दोन्ही मुली व दोन महिने वयाच्या नातीला २० दिवसांसाठी गावी नेतो, असे सांगून घेऊन गेले. मात्र त्यानंतर अनेकदा निरोप पाठवूनही त्यांनी मुलींना बल्लारपूर येथे पाठविले नाही. त्यामुळे रितेश स्वत: कुटीया येथे गेला. दरम्यान, जिवे मारण्याच्या उद्देशाने रितेशची पत्नी, सासू व पत्नीच्या भावाने संगनमत करून जेवणात विष कालविले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी रितेशच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन, १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, मोबाईल व रोख ११ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर घराला कुलूप लाऊन सर्वजण तेथून निघून गेले.रितेशची प्रकृती बिघडल्याने सासरच्या शेजारी राहणाऱ्या विवेक वाजपेयी व त्याच्या एका मित्राने रितेशला तेथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती ठिक झाल्यानंतर रितेने जवळच असलेल्या मलवा येथील पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे तेथील जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अलाहाबाद पोलीस महानिरीक्षकाकडे तक्रार केली. मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर फत्तेपूर न्यायालयात प्रकरण दाखल केले. मात्र तेथे वकिलांचा संप सुरू असल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला. उच्च न्यायालयाचा आदेश घेऊन रितेश संबंधित पोलीस ठाण्यात पोहचला. मात्र तरीही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. पोलिसांनी तक्रार स्विकारण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी केली. ंअन्यथा विविध गुन्हे दाखल करण्याची धमकीही पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)