शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

न्याय्य मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी

By admin | Updated: July 5, 2014 01:20 IST

उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा बुरखा फाडणारी एक घटना पुढे आली आहे.

चंद्रपूर: उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा बुरखा फाडणारी एक घटना पुढे आली आहे. बल्लारपूर येथील रितेश शुक्ला या युवकाने अनुभवलेली ही कहानी त्यानेच येथे पत्रकारांना ऐकविली.बल्लारपूर येथील सुभाष वॉर्डातील रहिवासी रितेश शुक्ला व त्याचा भाऊ रुपेश यांचा विवाह फत्तेपूर (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील कुटीया येथील विद्याप्रसाद तिवारी यांच्या दोन मुली गुंजन व कोमल यांच्याशी झाला होता. लग्नानंतर या दोन्ही बहिणी आपल्या माहेरी येत जात असत.जानेवारी महिन्यात रितेशचे सासरे विद्याप्रसाद तिवारी हे बल्लारपूर येथे आले व त्यांनी दोन्ही मुली व दोन महिने वयाच्या नातीला २० दिवसांसाठी गावी नेतो, असे सांगून घेऊन गेले. मात्र त्यानंतर अनेकदा निरोप पाठवूनही त्यांनी मुलींना बल्लारपूर येथे पाठविले नाही. त्यामुळे रितेश स्वत: कुटीया येथे गेला. दरम्यान, जिवे मारण्याच्या उद्देशाने रितेशची पत्नी, सासू व पत्नीच्या भावाने संगनमत करून जेवणात विष कालविले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी रितेशच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन, १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, मोबाईल व रोख ११ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर घराला कुलूप लाऊन सर्वजण तेथून निघून गेले.रितेशची प्रकृती बिघडल्याने सासरच्या शेजारी राहणाऱ्या विवेक वाजपेयी व त्याच्या एका मित्राने रितेशला तेथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती ठिक झाल्यानंतर रितेने जवळच असलेल्या मलवा येथील पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे तेथील जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अलाहाबाद पोलीस महानिरीक्षकाकडे तक्रार केली. मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर फत्तेपूर न्यायालयात प्रकरण दाखल केले. मात्र तेथे वकिलांचा संप सुरू असल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला. उच्च न्यायालयाचा आदेश घेऊन रितेश संबंधित पोलीस ठाण्यात पोहचला. मात्र तरीही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. पोलिसांनी तक्रार स्विकारण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी केली. ंअन्यथा विविध गुन्हे दाखल करण्याची धमकीही पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)