शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

हजारो कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 23, 2015 01:04 IST

जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमी. या ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीच्या उद्योग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

वतन लोणे घोडपेठजिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमी. या ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीच्या उद्योग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. मात्र या प्रकल्पाच्या मान्यतेनंतरही परिसरातील अनेक सुशिक्षीत तरूण बेरोजगार फिरत आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित तरूणांचे या आस्थापनेत काम करून उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न भंगले आहे.ताडाळी एमआयडीसी येथे ६०० मेगावॅट उर्जा निर्मितीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. मात्र हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नसल्यामुळे अनेक बेरोजगार तरूणांचे भविष्य प्रकल्पाच्या निमीत्त्याने टांगणीला लागले आहे.सध्या ताडाळी येथील एमआयडीसी ही जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची एमआयडीसी संबोधली जाते. बरेचशे उद्योग या एमआयडीसी मध्ये स्थापन झाले आहेत. मात्र बऱ्याच उद्योगांना अखेरची घरघर लागल्याने या परिसरातील कामगार तसेच मजुरांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. ताडाळी येथील उर्जानिमीर्ती प्रकल्पाचे बांधकाम मागील पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे.ताडाळी व परिसरातील नागरिकांची ५०० एकर जमिन या प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना अल्पसा मोबदला देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे एकमात्र साधन उद्योगाच्या स्वरूपात हिरावल्यामुळे तसेच उद्योग अजुनपर्यंत सुरू न झाल्यामुळे जगायचे कसे, या विवंचनेत ताडाळी परिसरातील शेतकरी व मजुरवर्ग सापडला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.आस्थापनेला मराठी तरूणांची अ‍ॅलर्जीप्रत्येक आस्थापनेमध्ये ८० टक्के जिल्ह्यातील कामगारांना रोजगार द्यावा, असा शासनाचा नियम आहे. मात्र धारीवाल आस्थापनेमध्ये या नियमाला बगल देवून बऱ्याचशा लहानमोठ्या कामांसाठी कंत्राटी पद्धतीने दुसऱ्या राज्यातील मजुरांना काम दिले जाते. त्यामुळे मराठी तरूणांना काम मिळत नसून जिल्ह्यातील तरूणांची कुचंबणा होत आहे. बऱ्याच कामगारांना १५ दिवसांचे काम कंपनीकडून पुरविण्यात येत आहे. कुटूंब कसे चालवायचे, या विवंचनेत कामगार वर्ग सापडला आहे.नोकरीवरून काढण्याचा सपाटाताडाळी एमआयडीसी येथील धारीवाल कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक या पदावर बरेच मराठी तरूण कंत्राटी पध्दतीने मागील पाच-सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र धारीवाल प्रशासनाला मराठी तरूणांची अ‍ॅलर्जी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोणत्याही लहान-मोठ्या कारणांवरून सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढण्याचा पर्याय कंपनीकडून स्वीकारला जात आहे. कंपनीचे उच्चपदस्थ सुरक्षा अधिकारी हे सुरक्षारक्षकांची पिळवणुक करीत असल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांनी केला आहे.सुरक्षा रक्षकांचा न्यायासाठी संपशुक्रवारी धारीवाल आस्थापनेतील सुरक्षा रक्षकांकडून संप पुकारण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांनी न घेतलेल्या आगाऊ रकमेची पगारातून कपात करण्यात आली होती. मात्र संपाचा बडगा उगारल्यामुळे धारीवाल प्रशासनाने सर्व सुरक्षारक्षकांचे कपात केलेले वेतन परत करण्याचे मान्य केले. तसेच काहीच कारण नसतांना आत्तापर्यंत निलंबीत केलेल्या सुरक्षारक्षकांवर भाष्य करण्यास कंपनी प्रशासनाने नकार दिला आहे. सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.