शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हजारो कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 23, 2015 01:04 IST

जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमी. या ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीच्या उद्योग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

वतन लोणे घोडपेठजिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमी. या ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीच्या उद्योग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. मात्र या प्रकल्पाच्या मान्यतेनंतरही परिसरातील अनेक सुशिक्षीत तरूण बेरोजगार फिरत आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित तरूणांचे या आस्थापनेत काम करून उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न भंगले आहे.ताडाळी एमआयडीसी येथे ६०० मेगावॅट उर्जा निर्मितीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. मात्र हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नसल्यामुळे अनेक बेरोजगार तरूणांचे भविष्य प्रकल्पाच्या निमीत्त्याने टांगणीला लागले आहे.सध्या ताडाळी येथील एमआयडीसी ही जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची एमआयडीसी संबोधली जाते. बरेचशे उद्योग या एमआयडीसी मध्ये स्थापन झाले आहेत. मात्र बऱ्याच उद्योगांना अखेरची घरघर लागल्याने या परिसरातील कामगार तसेच मजुरांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. ताडाळी येथील उर्जानिमीर्ती प्रकल्पाचे बांधकाम मागील पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे.ताडाळी व परिसरातील नागरिकांची ५०० एकर जमिन या प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना अल्पसा मोबदला देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे एकमात्र साधन उद्योगाच्या स्वरूपात हिरावल्यामुळे तसेच उद्योग अजुनपर्यंत सुरू न झाल्यामुळे जगायचे कसे, या विवंचनेत ताडाळी परिसरातील शेतकरी व मजुरवर्ग सापडला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.आस्थापनेला मराठी तरूणांची अ‍ॅलर्जीप्रत्येक आस्थापनेमध्ये ८० टक्के जिल्ह्यातील कामगारांना रोजगार द्यावा, असा शासनाचा नियम आहे. मात्र धारीवाल आस्थापनेमध्ये या नियमाला बगल देवून बऱ्याचशा लहानमोठ्या कामांसाठी कंत्राटी पद्धतीने दुसऱ्या राज्यातील मजुरांना काम दिले जाते. त्यामुळे मराठी तरूणांना काम मिळत नसून जिल्ह्यातील तरूणांची कुचंबणा होत आहे. बऱ्याच कामगारांना १५ दिवसांचे काम कंपनीकडून पुरविण्यात येत आहे. कुटूंब कसे चालवायचे, या विवंचनेत कामगार वर्ग सापडला आहे.नोकरीवरून काढण्याचा सपाटाताडाळी एमआयडीसी येथील धारीवाल कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक या पदावर बरेच मराठी तरूण कंत्राटी पध्दतीने मागील पाच-सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र धारीवाल प्रशासनाला मराठी तरूणांची अ‍ॅलर्जी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोणत्याही लहान-मोठ्या कारणांवरून सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढण्याचा पर्याय कंपनीकडून स्वीकारला जात आहे. कंपनीचे उच्चपदस्थ सुरक्षा अधिकारी हे सुरक्षारक्षकांची पिळवणुक करीत असल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांनी केला आहे.सुरक्षा रक्षकांचा न्यायासाठी संपशुक्रवारी धारीवाल आस्थापनेतील सुरक्षा रक्षकांकडून संप पुकारण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांनी न घेतलेल्या आगाऊ रकमेची पगारातून कपात करण्यात आली होती. मात्र संपाचा बडगा उगारल्यामुळे धारीवाल प्रशासनाने सर्व सुरक्षारक्षकांचे कपात केलेले वेतन परत करण्याचे मान्य केले. तसेच काहीच कारण नसतांना आत्तापर्यंत निलंबीत केलेल्या सुरक्षारक्षकांवर भाष्य करण्यास कंपनी प्रशासनाने नकार दिला आहे. सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.