शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: November 12, 2014 22:41 IST

तुकूममधील ताडोबा मार्गावरील मुख्य रस्त्याखालून शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तीन ते चार ठिकाणी फूटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी गळतीमुळे

चंद्रपूर : तुकूममधील ताडोबा मार्गावरील मुख्य रस्त्याखालून शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तीन ते चार ठिकाणी फूटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी गळतीमुळे रस्त्याची दुरवस्था होत आहे. पाईपलाईन त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी इको-प्राने महानगरपालिका आयुक्तांना केली आहे. मात्र मागणीकडे प्रशासनाचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे.तुकूम- दुर्गापूर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून ते मातोश्री विद्यालयापर्यंत इरई धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता टाकण्यात आलेली भूमिगत पाईपलाईन ठिकठिकाणी फूटली आहे. हा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरु असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून नागरिकांना पाणी पुरवठा कमी झालेला आहे. तसेच पाण्याच्या गळतीमुळे रस्त्याचा काही भागसुद्धा खराब झाला आहे. याबाबत ७ एप्रिलला इको-प्रोच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. सोबतच तुकूम- दुर्गापूर रस्त्याच्या कडेला फूटपाथला लागून मोठ-मोठे सिमेंटचे पाईप पडलेले आहेत. त्यामुळे मोटारसायकल, कार पार्किगच्या जागेवर पाईपचे अतिक्रमण झाल्याने सायंकाळच्या वेळी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. सदर पाईप हटविणेसुद्धा गरजेचे आहे. याकडे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष केंद्रीय करुन पाणी गळती सुरु असलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात राहुल विरुटकर, राहुल कुचनकर, शशांक मुंजनकर, विजय हेडाऊ, आशिष कामटकर, स्वप्निल शिंदे आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)