शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हजारो शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले

By admin | Updated: February 4, 2016 00:54 IST

निसर्गाने पाहिजे त्या प्रमाणात साथ न दिल्याने जिल्ह्यातील पीकांची दैनावस्था झाली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे नेतृत्व : दुष्काळी परिस्थितीत जगावे कसे?चंद्रपूर: निसर्गाने पाहिजे त्या प्रमाणात साथ न दिल्याने जिल्ह्यातील पीकांची दैनावस्था झाली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा. असा प्रश्न करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली.जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आघाड्याचे कार्यकर्ते सहभागी असलेला लक्षवेधी मोर्चा दुपारी २ वाजता स्थानिक बाबुपेठ मार्गावरील शिवाजी चौकामधून निघाला. ‘फडणवीस सरकार हाय हाय’ म्हणत चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अतिक्रमणधारकांना शेतजमीनीचे पट्टे देण्यात यावे, अशा घोषणा देत मोर्चेकरी गांधी चौक, जटपुरा गेटमागर््ो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अरुण निमजे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्याय देण्यास अकार्यक्षम ठरलेल्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी होवून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी लक्षवेध मोर्चात सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केले. फडणवीस सरकार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचे सांगून सरकारचा निषेध नोंदवून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भविष्यात प्राणांतिक उपोषणाचा मार्ग स्विकारु असे जाहीर केले. सभेचे संचालन शहर अध्यक्ष शशीकांत देशकर यांनी केले.यावेळी मोर्चेकरी शेतकरी व कार्यकर्त्यांच्या वतीने एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेवून चौदा मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीही निवेदनातील ज्या मागण्या जिल्हास्तरावर सोडविता येणाऱ्या आहेत, त्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, सुदर्शन निमकर, शशीकांत देशकर, दीपक जयस्वाल, हिराचंद बोरकुटे, महादेव पिदुरकर, अरुण निमजे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, बेबी उईके, सुरेश रामगुंडे, प्रशांत गाडेवार, प्रविण उरकुडे, जयस्वाल आदींचा समावेश होता. मोर्चा यशस्वीतेसाठी नितीन भटारकर, सुमित समर्थ, हरिदास झाडे, विलास नेरकर, दामोधर नन्नावार, अविनाश राऊत, मंगेश पोटवार, सचिन राऊत आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)