शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

राज्यभरातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:43 IST

चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे.

ठळक मुद्देभक्तीचे वातावरण : महाकाली यात्रेत गर्दी वाढली

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाकडून भाविकांना सुविधा पुरविल्या जात असल्या तरी भाविकांची गर्दी वाढल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे रखरखत्या उन्हातही भाविकांचा उत्साह कायम असल्याने सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरवर्षी चैत्र पोर्णिमेला चंद्रपूरचे आराध्य दैवत ऐतिहासिक महाकाली मंदिर परिसरात यात्रा भरते. राज्याच्या विविध भागातून भाविक यानिमित्त माता महाकालीचे दर्शन घ्यायला येतात. २३ मार्चपासून यात्रा सुरू झाली. मात्र सुरुवातीच्या चार दिवस भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढत आहे. ट्रक, मेटॅडोर, ट्रॅक्टर यासारख्या वाहनांनी भाविक चंद्रपुरात येत आहेत.महापालिकेतर्फे आरोग्य सुविधायात्रेत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोई-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक छोटेखानी दवाखाना उघडण्यात आला आहे. ज्या भाविकाची प्रकृती बिघडली, असे भाविक येथे येऊन उपचार करून घेत आहे. या ठिकाणी नि:शुल्क औषधी देण्यात येत आहे. मात्र एखाद्या भाविकाची प्रकृती अधिकच गंभीर असल्यास त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जात आहे.निवासाची व्यवस्थाभक्तांच्या निवासाच्या दृष्टीने मंदिराच्या आतील परिसरात दोन मोठे लोखंडी शेड तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक धर्मशाळेच्या समोरील विभागात तर दुसरा मंदिराच्या समोर उभारण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी भाविकांनी आपला तात्पुरता संसार थाटला आहे. अनेक भाविक येथे मुक्कामी राहत असल्याने स्वयंपाकही त्याच ठिकाणी करतात. बुधवारी प्रस्तुत प्रतिनिधीने या ठिकाणी फेरफटका मारला असता अनेक भाविक स्वयंपाक करताना दिसून आले.पोलीस विभागातर्फे दोन चौक्यायात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व भाविकांना कुठलीही अडचण जाऊ नये, यासाठी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्या वतीने दोन तात्पुरत्या चौकी उभारण्यात आल्या आहेत. सर्वत्र तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. भाविकांच्या कुटुंबातील कुणी हरविल्यास पोलीस चौकीतून ध्वनीक्षेपकामार्फत याची माहिती देण्यात येते. जो हरविला असेल, त्याला चौकीत बोलाविण्यात येत व त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाते.तप्त उन्हात कारंज्याचा गारवाहजारोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात एकच गर्दी उसळते. त्यामुळे दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा हजार चौरस फूटचा शेड तयार करण्यात आला आहे. याशिवाय १२ हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. भाविकांच्या रांगेत मजबूत रेलींग, पिण्याच्या पाणी, पंख्यांची सोय केली आहे. सध्या उन्हाळ्यात दिवस असल्याने दर्शन रांगेच्या मंडपात वरच्या भागाला छोटेखानी कारंजे लावण्यात आले आहे. यातून पाण्याचे बारिक फव्वारे अंगावर उडत असल्याने भाविकांना गारवा मिळत आहे.