शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

राज्यभरातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:43 IST

चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे.

ठळक मुद्देभक्तीचे वातावरण : महाकाली यात्रेत गर्दी वाढली

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाकडून भाविकांना सुविधा पुरविल्या जात असल्या तरी भाविकांची गर्दी वाढल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे रखरखत्या उन्हातही भाविकांचा उत्साह कायम असल्याने सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरवर्षी चैत्र पोर्णिमेला चंद्रपूरचे आराध्य दैवत ऐतिहासिक महाकाली मंदिर परिसरात यात्रा भरते. राज्याच्या विविध भागातून भाविक यानिमित्त माता महाकालीचे दर्शन घ्यायला येतात. २३ मार्चपासून यात्रा सुरू झाली. मात्र सुरुवातीच्या चार दिवस भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढत आहे. ट्रक, मेटॅडोर, ट्रॅक्टर यासारख्या वाहनांनी भाविक चंद्रपुरात येत आहेत.महापालिकेतर्फे आरोग्य सुविधायात्रेत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोई-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक छोटेखानी दवाखाना उघडण्यात आला आहे. ज्या भाविकाची प्रकृती बिघडली, असे भाविक येथे येऊन उपचार करून घेत आहे. या ठिकाणी नि:शुल्क औषधी देण्यात येत आहे. मात्र एखाद्या भाविकाची प्रकृती अधिकच गंभीर असल्यास त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जात आहे.निवासाची व्यवस्थाभक्तांच्या निवासाच्या दृष्टीने मंदिराच्या आतील परिसरात दोन मोठे लोखंडी शेड तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक धर्मशाळेच्या समोरील विभागात तर दुसरा मंदिराच्या समोर उभारण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी भाविकांनी आपला तात्पुरता संसार थाटला आहे. अनेक भाविक येथे मुक्कामी राहत असल्याने स्वयंपाकही त्याच ठिकाणी करतात. बुधवारी प्रस्तुत प्रतिनिधीने या ठिकाणी फेरफटका मारला असता अनेक भाविक स्वयंपाक करताना दिसून आले.पोलीस विभागातर्फे दोन चौक्यायात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व भाविकांना कुठलीही अडचण जाऊ नये, यासाठी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्या वतीने दोन तात्पुरत्या चौकी उभारण्यात आल्या आहेत. सर्वत्र तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. भाविकांच्या कुटुंबातील कुणी हरविल्यास पोलीस चौकीतून ध्वनीक्षेपकामार्फत याची माहिती देण्यात येते. जो हरविला असेल, त्याला चौकीत बोलाविण्यात येत व त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाते.तप्त उन्हात कारंज्याचा गारवाहजारोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात एकच गर्दी उसळते. त्यामुळे दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा हजार चौरस फूटचा शेड तयार करण्यात आला आहे. याशिवाय १२ हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. भाविकांच्या रांगेत मजबूत रेलींग, पिण्याच्या पाणी, पंख्यांची सोय केली आहे. सध्या उन्हाळ्यात दिवस असल्याने दर्शन रांगेच्या मंडपात वरच्या भागाला छोटेखानी कारंजे लावण्यात आले आहे. यातून पाण्याचे बारिक फव्वारे अंगावर उडत असल्याने भाविकांना गारवा मिळत आहे.