शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिक तहानलेलेच !

By admin | Updated: January 14, 2015 23:04 IST

एकही गाव पाण्याविना राहु नये, पाणी टंचाईची झळ पोहचू नये, शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून वर्षानुवर्षे पाणीपुरवठा योजनासाठी पाण्यासारखाच निधी खर्च केला जातो.

शंकर चव्हाण/संघरक्षीत तावाडे - जिवती एकही गाव पाण्याविना राहु नये, पाणी टंचाईची झळ पोहचू नये, शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून वर्षानुवर्षे पाणीपुरवठा योजनासाठी पाण्यासारखाच निधी खर्च केला जातो. ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावरून नैसर्गीक आपत्ती, कायम विहीरीतील गाळ काढणे, विहिर, बोर, अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे यावर शासनाने गेल्या सात वर्षात १७ लाख ४७ हजार ७८ रुपये खर्च केले. तरीही पहाडावरील गावे अजुनही तहानलेलीच आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा व जिल्हा यंत्रणेमार्फत जलस्वराज्य प्रकल्प, महाजल प्रकल्प, शिवकालीन पाणी पुरवठा योजना अशा महत्वाकांक्षी योजना टंचाईग्रस्त गावात राबविण्यात आल्या. मात्र संबंधित विभागाने त्या योजनेला गांभीर्याने घेतले नाही. योजनेचे पैसे खर्च झाले. मात्र काम पुर्ण झाले नाही. कुठे पाण्याची टाकी उभी आहे तर कुठे पाईपलाईन अर्धवट आहे. या योजनेमुळे ज्या गावांना कायमस्वरूपी शुद्ध पाणी प्यायला मिळणार होते, ती योजनाच मोडकळीस पडली असल्याने तहानलेल्या जनतेचा घसा कोरडाच राहिला आहे.