शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिक तहानलेलेच !

By admin | Updated: January 14, 2015 23:04 IST

एकही गाव पाण्याविना राहु नये, पाणी टंचाईची झळ पोहचू नये, शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून वर्षानुवर्षे पाणीपुरवठा योजनासाठी पाण्यासारखाच निधी खर्च केला जातो.

शंकर चव्हाण/संघरक्षीत तावाडे - जिवती एकही गाव पाण्याविना राहु नये, पाणी टंचाईची झळ पोहचू नये, शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून वर्षानुवर्षे पाणीपुरवठा योजनासाठी पाण्यासारखाच निधी खर्च केला जातो. ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावरून नैसर्गीक आपत्ती, कायम विहीरीतील गाळ काढणे, विहिर, बोर, अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे यावर शासनाने गेल्या सात वर्षात १७ लाख ४७ हजार ७८ रुपये खर्च केले. तरीही पहाडावरील गावे अजुनही तहानलेलीच आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा व जिल्हा यंत्रणेमार्फत जलस्वराज्य प्रकल्प, महाजल प्रकल्प, शिवकालीन पाणी पुरवठा योजना अशा महत्वाकांक्षी योजना टंचाईग्रस्त गावात राबविण्यात आल्या. मात्र संबंधित विभागाने त्या योजनेला गांभीर्याने घेतले नाही. योजनेचे पैसे खर्च झाले. मात्र काम पुर्ण झाले नाही. कुठे पाण्याची टाकी उभी आहे तर कुठे पाईपलाईन अर्धवट आहे. या योजनेमुळे ज्या गावांना कायमस्वरूपी शुद्ध पाणी प्यायला मिळणार होते, ती योजनाच मोडकळीस पडली असल्याने तहानलेल्या जनतेचा घसा कोरडाच राहिला आहे.