शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कार, दुमजली घर, प्लॉट असणाऱ्यांनाही हवे घरकुल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 05:00 IST

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणाऱ्या ३२ हजार ६८   जणांकडे चारचाकी वाहन, दुमजली किंवा सुस्थितीतील घर, बँकेत ठेवी, जंगम मालमत्ता, तीन एकरहून अधिक शेतजमीन, प्लॉट व अन्य मालमत्ता आहे. अर्जदारांची ही माहिती जाणून घेण्यासाठी आधार लिंकचा वापर करण्यासोबतच प्रत्यक्षात घरी जाऊन पाहणी केल्याने बनावटपणा उघडकीस आला. जिल्ह्यातील पात्र अर्जदारांची पडताळणी जॉबकार्ड मॅपच्या सहाय्याने केली जात  आहे. 

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने स्वीकारलेल्या अर्जांची आधार लिंकने पडताळणी केली असता, जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ६८ अर्जदार आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असल्याचे उघडकीस आले. परिणामी, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने हे अर्ज अपात्र ठरविले आहे. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना सन १९९५-९६ पासून राबविली जात आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर व कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. यापूर्वी लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतमार्फतच केली जात होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे.  योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा, कायम प्रतीक्षा यादीत नाव आणि घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा व तत्सम अन्य सर्वसाधारण अटी आहेत. घरकुल अनुदान व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ९०-९५ दिवसांच्या अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य व घरकुल लाभार्थ्यांना स्वच्छतागृहासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. या योजनेमुळे हजारो गरिबांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

पात्र अर्जदारांचे जॉबकार्ड मॅपिंग सुरू- प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणाऱ्या ३२ हजार ६८   जणांकडे चारचाकी वाहन, दुमजली किंवा सुस्थितीतील घर, बँकेत ठेवी, जंगम मालमत्ता, तीन एकरहून अधिक शेतजमीन, प्लॉट व अन्य मालमत्ता आहे. अर्जदारांची ही माहिती जाणून घेण्यासाठी आधार लिंकचा वापर करण्यासोबतच प्रत्यक्षात घरी जाऊन पाहणी केल्याने बनावटपणा उघडकीस आला. जिल्ह्यातील पात्र अर्जदारांची पडताळणी जॉबकार्ड मॅपच्या सहाय्याने केली जात  आहे. 

एनआयसीने राजकीय हस्तक्षेपाला चाप  

जि. प. अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दोन वर्षांपासून गरजु नागरिकांकडून अर्ज मागविले होते. यादी केंद्र सरकारच्या एनआयसी प्रणालीत अपलोड करण्यात आली. यंत्रणेने संबंधितांच्या घरी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा यंत्रणेने पाहणी करून छायाचित्र अपलोड केले असता, चंद्रपूर जिल्ह्यातील ३२ हजार ६८ अर्जदार श्रीमंत आढळले.  केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना आता राजकीय हस्तक्षेप करण्यासही चाप बसला, असा दावा जि. प. प्रशासनाने केला आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना