शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘त्या’ वृद्धांना आता स्वगृही परतण्याची आस !

By admin | Updated: February 4, 2015 23:11 IST

पोटच्या गोळ्यांनी बेघर केलेल्या असाह्य आई-वडिलांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षाची व्यथा ‘लोकमत’ने ‘पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र’

रुपेश कोकावार - बाबूपेठ (चंद्रपूर)पोटच्या गोळ्यांनी बेघर केलेल्या असाह्य आई-वडिलांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षाची व्यथा ‘लोकमत’ने ‘पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र’ या वृत्तातून मांडली. याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून बेजबाबदार मुलांना नोटीस बजावणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महाकाली परिसरात जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या वृद्धांना घरी परतण्याची आस लागली आहे. बुधवारी सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांनी महाकाली परिसरातील वृद्धांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यांची आपबिती ऐकून बेजबाबदार मुलांना नोटीस बजावण्याची तयारी दर्शवली. ज्या मुलांना लहाण्याचे मोठे केले, खांद्यावरती बसवून जग दाखवले, त्याच पोटच्या पोराने जीवनातील शेवटच्या वळणावर पोरख केले. अन् स्वत:च्या हक्काच्या घरुनही हाकलून देत बेघर केले. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी डोक्यावर छत शोधत अनेक वृद्धांनी महाकाली मंदिराचा आसरा घेतला. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या हातात भिक्षापात्रही आले. मिळेल ते खाऊन जीवन जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षमय व्यथा ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित केली. या बातमीची दलख घेत महाकाली पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी ‘त्या’ पीडित वृद्धांची भेट घेवून त्यांच्यावर आलेल्या या दशेमागचे सत्य जाणून घेतले. आई-वडीलांवर अशी वेळ आणणाऱ्या मुलांना नोटीस पाठवण्यात येणार असून ‘तुम्हचे आई-वडील मंदिर परिसरात असून, त्यांना घरी नेण्यात यावे’ अन्यथा पुढील कार्यवाहीस तुम्ही पात्र राहाल, असे नमूद करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांमुळे आता आपण पुन्हा आपल्या हक्काच्या घरात परतणार, अशी ‘त्या’ वृद्धांना आस लागली आहे.