शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

ग्रा.पं.च्या दुर्लक्षाने 'ती' चार गावे कायम समस्यांच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:50 IST

Chandrapur : समस्या मार्गी लावा अन्यथा गावकरी करणार आंदोलन

दीपक साबनेलोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तेलंगणा सीमेलगत असलेल्या येल्लापूर ग्रा.पं.अंतर्गत येत असलेली येल्लापूर, येल्लापूर (खु.), गोंडगुडा, कोलामगुडा ही चार गावे ग्रा.पं.प्रशासनाच्या हेतुपरस्सर दुर्लक्षामुळे समस्यांच्या विळख्यात अडकली आहेत. गावकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

येल्लापूर येथील पंचशील बुद्ध विहार ते बाबासाहेब जोंधळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला असून बुद्ध विहाराजवळ चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तलावाखालील विहिरीकडे जाणारा रस्ता, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, येल्लापूर (खु.) येथील हातपंपाजवळून शाळेकडे जाणारा रस्ता या सर्वांची पावसाळ्याच्या दिवसांत हीच अवस्था आहे. येल्लापूर, येल्लापूर (खु.) येथील हातपंपाचे पाणी सांडपाणी व्यवस्थापनाअभावी रस्त्यावर पसरून घाण निर्माण झाली आहे. गावातील गवतही कापण्यात आले नसून गावातील नाली सफाई देखील करण्यात आली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जि.प. शाळेजवळील विहीर कोसळून दोन वर्षांच्या वर कालावधी लोटूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. या विहिरीतील पाण्याचा वापर गावकरी करतात. दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षांपूर्वीपासून जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेला पाणीपुरवठा बंद असून जलजीवन मिशनचे कामही अर्धवट आहे. तरी ग्रा.पं. मार्फत विशेष पाणी कराच्या नोटिसा बजावण्यात आल्यात. जि.प. शाळेच्या तीन इमारती, अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याच इमारतीत अद्यापही चिमुकले धडे गिरवत आहेत. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. मुलींसाठी शौचालय देखील नाही. संरक्षण भिंत नाही, रंगरंगोटी देखील करण्यात आली नाही. गावात अपवादात्मक ठिकाणे वगळता पथदिवे नाहीत.

यासह अनेक समस्यांचे निवेदन येल्लापूर येथील ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष यासह १०३ नागरिकांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. ग्रामसेविका हप्त्यातून एक ते दोन दिवसच ग्रा.पं.ला येतात. गावातील समस्यांविषयी विचारणा करायला गेलेल्या नागरिकांना तुमचं गावच खूप खराब आहे, येथे कोणी काम करायला येत नाही, तुम्हाला काय समजते, अर्थ उद्धटपणाने उडवाउडवीची उत्तरे देतात तसेच सरपंच व उपसरपंच यांच्य नातेवाइकांचा कामाच्या कमिशनच्या लोभापायी ग्रामसेविका यांन ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप वाढविला आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली आहे.

विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामेमागील तीन वर्षापासून विकासकामांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. त्या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई देखील करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. गावातील समस्या दूर नाही झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरgram panchayatग्राम पंचायत