लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेजारच्या यवतमाळ व नागपूरमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झालेत. पोलीस प्रशासनाकडून जिल्हा सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी सुरू असून पासधारकांनाच प्रवेश आहे.कोरोनाचे संकट देशात घोंघावत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्यासह नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहे. जिल्ह्यात प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. दुचाकी व चारचाकी वाहन धारकांची कसून चौकशी सुरू असून केवळ पास धारकांनाच प्रवेश आहे.जिल्ह्यात सद्या एक कोरोनाग्रस्त रुग्ण आहे. त्यामुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन, महानगरपालिका, जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगर पंचायतींनी विविध प्रयत्न सुरु केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रपूरसह विविध शहरांतील अंतर्गत भागामध्येही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर राज्य सीमेवरही २४ तास पहारा सुरु करण्यात आला आहे. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह काही ग्रामस्थांचीही मदत घेतली जात असून कोणत्याही स्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.प्रशासन सतर्कचंद्रपूर जिल्ह्याला नागपूर जिल्ह्यातून किराणा, फळ आणि औषधांसह इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात आवक होते. त्यामुळे कोरोना जिल्ह्याचे पुन्हा दार ठोठावत असल्याचे चित्र आहे. परिणामी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीस विभागाने जिल्ह्याच्या सर्वच सीमांवर सक्तीने तपासणी सुरू केली आहे.कोरपना तालुक्यातील राज्य व जिल्हा सीमेवर २४ तास चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परराज्यातून तसेच लगतच्या जिल्ह्यातून येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक काम तसेच ज्यांच्याकडे पास आहे, त्यांनाच प्रवेश दिला जात आहे.- अरुन गुरुनुलेपोलीस निरीक्षक, कोरपनारिक्क घेणे पडणार महागातजिल्ह्याच्या शेजारी असलेला यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून येणाºया प्रत्येक नागरिकांवर प्रशासनाची नजर आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून या जिल्ह्यात जाण्याचे किंवा त्या जिल्ह्यातून कोणी लपुन-छपून येत असेल तर प्रशासनाला माहिती देणे गरजेचे आहे. नागपूर येथून जिल्ह्यात फळ, औषधी आणि किराणा मालाची वाहतूक करणाºया ट्रक चालकासोबत प्रत्येक व्यक्तीची ‘आॅन द स्पॉट’ तपासणी करणे गरजेचे आहे. ही सतर्कता न बाळगल्यास जिल्ह्याला कोरोनाचा प्रादूर्भाव होण्यास वेळ लागणार नाही.
जिल्हा सीमांवर कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST
कोरोनाचे संकट देशात घोंघावत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्यासह नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहे. जिल्ह्यात प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. दुचाकी व चारचाकी वाहन धारकांची कसून चौकशी सुरू असून केवळ पास धारकांनाच प्रवेश आहे.
जिल्हा सीमांवर कसून तपासणी
ठळक मुद्देजिल्हा सीमेवर पास असलेल्यांनाच प्रवेश : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाची सतर्कता