शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बोअरवेलच्या पाण्यावर भागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:27 IST

राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनिर्लीवासीयांची व्यथा : परिसरातील भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटले

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.चार्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणाºया निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया नळयोजनेची विहिरी आटली आहे. गावात चार सरकारी हातपंप तर एक विहिर आहे. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता निर्ली येथील सरपंच पोर्णिमा प्रदिप दुबे यांनी गावालगत असलेल्या प्रमोद धांडे यांच्या शेतातील बोअरवेलवरून गावकऱ्यांना पाण्याची सोय करून दिली आहे. आजघडीला शेतातील या एका बोअरवेलवरून अख्खा गाव पाणी भरत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रमोद धांडे यांनी गावकºयांच्या सोयीसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने गावकरी या बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवित आहे. पाणी टंचाईने ग्रस्त झालेल्या गावांकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने निर्लीवासीयांना ४७ अंश सेल्सीअसच्या उष्ण तापमानात शेतातील बोअरवेलवरून पाणी आणण्याचा दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्लीवासियांसाठी पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी अशी मागणी गट ग्राम पंचायत निर्लीच्या सरपंच पौर्णिमा दुबे, भाऊराव क्षीरसागर, प्रदिप दुबे, केतन धांडे, सुनिल वनकर, आकाश धांडे, रविंद्र दुबे, मंजुळाबाई धांडे, बाळा धांडे, गिताबाई धांडे, सुनिल धांडे यांनी केली आहे.निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता गावाशेजारील शेतातील एका बोअरवेलवरून गावकºयांच्या पाण्याची तात्पुरती सोय करून दिली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गावाकडे लक्ष देवून नागरिकांच्या पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी.-पौर्णिमा दुबेसरपंच, गट ग्रामपंचायत निर्ली

टॅग्स :water shortageपाणीटंचाई