शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बोअरवेलच्या पाण्यावर भागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:27 IST

राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनिर्लीवासीयांची व्यथा : परिसरातील भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटले

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.चार्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणाºया निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया नळयोजनेची विहिरी आटली आहे. गावात चार सरकारी हातपंप तर एक विहिर आहे. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता निर्ली येथील सरपंच पोर्णिमा प्रदिप दुबे यांनी गावालगत असलेल्या प्रमोद धांडे यांच्या शेतातील बोअरवेलवरून गावकऱ्यांना पाण्याची सोय करून दिली आहे. आजघडीला शेतातील या एका बोअरवेलवरून अख्खा गाव पाणी भरत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रमोद धांडे यांनी गावकºयांच्या सोयीसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने गावकरी या बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवित आहे. पाणी टंचाईने ग्रस्त झालेल्या गावांकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने निर्लीवासीयांना ४७ अंश सेल्सीअसच्या उष्ण तापमानात शेतातील बोअरवेलवरून पाणी आणण्याचा दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्लीवासियांसाठी पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी अशी मागणी गट ग्राम पंचायत निर्लीच्या सरपंच पौर्णिमा दुबे, भाऊराव क्षीरसागर, प्रदिप दुबे, केतन धांडे, सुनिल वनकर, आकाश धांडे, रविंद्र दुबे, मंजुळाबाई धांडे, बाळा धांडे, गिताबाई धांडे, सुनिल धांडे यांनी केली आहे.निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता गावाशेजारील शेतातील एका बोअरवेलवरून गावकºयांच्या पाण्याची तात्पुरती सोय करून दिली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गावाकडे लक्ष देवून नागरिकांच्या पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी.-पौर्णिमा दुबेसरपंच, गट ग्रामपंचायत निर्ली

टॅग्स :water shortageपाणीटंचाई