शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलच्या पाण्यावर भागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:27 IST

राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनिर्लीवासीयांची व्यथा : परिसरातील भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटले

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.चार्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणाºया निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया नळयोजनेची विहिरी आटली आहे. गावात चार सरकारी हातपंप तर एक विहिर आहे. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता निर्ली येथील सरपंच पोर्णिमा प्रदिप दुबे यांनी गावालगत असलेल्या प्रमोद धांडे यांच्या शेतातील बोअरवेलवरून गावकऱ्यांना पाण्याची सोय करून दिली आहे. आजघडीला शेतातील या एका बोअरवेलवरून अख्खा गाव पाणी भरत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रमोद धांडे यांनी गावकºयांच्या सोयीसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने गावकरी या बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवित आहे. पाणी टंचाईने ग्रस्त झालेल्या गावांकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने निर्लीवासीयांना ४७ अंश सेल्सीअसच्या उष्ण तापमानात शेतातील बोअरवेलवरून पाणी आणण्याचा दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्लीवासियांसाठी पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी अशी मागणी गट ग्राम पंचायत निर्लीच्या सरपंच पौर्णिमा दुबे, भाऊराव क्षीरसागर, प्रदिप दुबे, केतन धांडे, सुनिल वनकर, आकाश धांडे, रविंद्र दुबे, मंजुळाबाई धांडे, बाळा धांडे, गिताबाई धांडे, सुनिल धांडे यांनी केली आहे.निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता गावाशेजारील शेतातील एका बोअरवेलवरून गावकºयांच्या पाण्याची तात्पुरती सोय करून दिली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गावाकडे लक्ष देवून नागरिकांच्या पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी.-पौर्णिमा दुबेसरपंच, गट ग्रामपंचायत निर्ली

टॅग्स :water shortageपाणीटंचाई