शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जिवतीत चोर बिटी बियाण्यांनी केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:33 IST

बळीराजाच्या डोक्यावर आधीच आर्थिक संकट कोसळले असताना आता चोर बिटी बियाण्यांनी घात केला आहे. जिवती ताललुक्यातील पाटण परिसरात चोर बिटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देत्या वनकर्मचाऱ्यांकडून चोर बिटीची अवैध विक्री : शेतकऱ्यांची फसगत, बियाणे विकणाºयांवर कारवाई करा

फारूख शेख।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : बळीराजाच्या डोक्यावर आधीच आर्थिक संकट कोसळले असताना आता चोर बिटी बियाण्यांनी घात केला आहे. जिवती ताललुक्यातील पाटण परिसरात चोर बिटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पाटण, नंदप्पा, कोलांडी, खडकी, हिरापूर, गोंदापूर येथील शेतकऱ्यांनी पाटण येथील एका वन कर्मचाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून कापसाचे अवैध चोर बिटी बियाण्यांची खरेदी केली व शेतात लागवड केली. या बियाण्यांमुळे निंदनाचा खर्च कमी येतो, फवारणी करून गवत नाहिसे केले जाते, कापसाला काही होत नाही, कमी खर्चात जास्त पीक हाती येते, असे सांगून पाटण येथील एका वन कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना अवैधरित्या चोर बिटी बियाणे विकले. मात्र या बियाण्यांनी आता आपला रंग दाखविला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाला दोन-चार बोंडेच लागली असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने शेतकरी परशुराम वैलादी रा. नंदप्पा या शेतकºयाच्या शेतात भेट दिली असता त्याने आपली आपबिती सांगितली. आपली फसगत करणाऱ्या त्या वन कर्मचाऱ्याची तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.चोर बिटीवर बंदीजे कापसाचे वाण शासनातर्फे प्रमाणित नाही, अशा वाणांना बंदी घातली आहे. परंतु जिल्ह्यात काही एजंटकडून पैशाच्या हव्यासापोटी बंदी असलेल्या चोर बिटी बियाण्यांची विक्री केली जात आहे. याकडे कृषी विभागही कानाडोळा करीत आहे.चुकीच्या औषध फवारणीमुळे कपाशी करपलीआक्सापूर : कृषी केंद्राने चुकीची व मुदतबाह्य कीटकनाशक औषधे पुरविली. ही औषधे फवारल्यामुळे चार एकरातील कपाशी करपली.गोंडपीपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील अल्पभूधारक शेतकरी रामचंद्र झाडे यांना भंगाराम तळोधी येथील सतीश कृषी केंद्राकडून चुकीची व मुदताबाह्य कीटकनाशक औषध पुरविण्यात आली. हंगामाच्या शेवटी तोंडातील घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रामचंद्र झाडे यांनी २२ सप्टेंबरला भंगाराम तळोधी येथील सतीश कृषी केंद्र येथून बुम फ्लावर, मोनो व ग्रोमोक्सोवन व सोबत तणनाशक असे दोन हजार २०० रुपयांचे औषध खरेदी केले. या औषधाचे बिल मागितले असता जवळच्या व्यक्तीला बिलाची काय आवश्यकता, असे म्हणून बिल दिले नाही. शेतकऱ्याने ३० सप्टेबरला फवारणी केली व लगेच दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन बघितले असता संपूर्ण कपाशी करपून गेली होती. ते बघून रामचंद्र झाडे यांना धक्काच बसला. पीक गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. झाडे यांनी कृषी विभाग गोंडपिपरी यांच्याकडे तक्रार केली असून कृषी केंद्रावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती