शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ क्षण आठविले की अजूनही उठतात रोमांच !

By admin | Updated: July 26, 2014 01:46 IST

‘ते’ दिवस आणि क्षण आठवले की अजूनही अंगावर

विजयाचे साक्षीदार : चंद्रपुरात घडविताहेत सैनिकचंद्रपूर : ‘ते’ दिवस आणि क्षण आठवले की अजूनही अंगावर रोमांच उठतात. ते तोफांचे वर्षाव, मशिनगन्सचे आवाज आजही कानात गुंजतात. विजयाच्या ध्येयाने झपाटलेल्या आमच्या मनांनी अखेर कारगिलवर विजय मिळविला. तो अत्यानंदाचा क्षण आठविला की डोळ्यापुढे डौलाने फडकणारा तिरंगा येतो आणि आपोआपच गर्वाने माना उंच अन् ताठ होतात.या आठवणी आहेत कारगिल मोहिमेत सहभागी होऊन विजयी ठरलेल्या मेजर हरजिंदर सिंग, कमलसिंग थापा आणि दीपक भोयर यांच्या. हे तिघेही हिंमतबाज सैनिक सध्या चंद्रपुरातील सन्मित्र सैनिकी विद्यालयात शिकवित आहेत. चंद्रपुरातील भावी सैनिकांना आतापासूनच घडविण्याचे काम करीत आहेत.२६ जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याने मिळवलेल्या विजयाचे आणि विरांच्या बलिदानाचे स्मरण यासाठी हा विजयोत्सव असतो. १९९९ मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानची घुसखोरी पूर्णपणे निपटून काढून जो विजय मिळवला. तो प्रतिदिनी सैनिकी प्रशिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या आणि सैन्यात जावून शौर्य गाजवायचे स्वप्न पाहणाऱ्या सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे. रोज हे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक स्वत: या युद्धात सहभागी होते ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या सैनिकांनी कारगिल युद्धाच्या आठवणी सांगितल्या.सध्या सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे समादेशक असलेले मेजर हरजिंदर सिंह हे त्यावेळी भारतीय सैन्यात बॅट्री कमांडर यापदावर नियुक्त होते. शत्रूवर नजर ठेवायची, त्यांची विमानं भारतीय हद्दीत घुसू नयेत, घुसली तर त्यांचा वेध घेवून तोफांचा मार करुन ते विमान पाडायचं या अवघड आणि तेवढ्याच जवाबदारीच्या कामाला त्यांनी शौर्याने न्याय दिला. राशन म्हणजे शिधा कमी पडला तरी चालेल पण दारुगोळा कमी पडू नये यासाठी त्यांनी शिध्याच्या पिशव्याही रिकाम्या करून त्यात दारुगाळा भरुन घेतला होता. मेजर हरजिंदर सिंह आपले अनुभव सांगतांना तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांपुढे उभा करत होते.सैनिकी निदेशक म्हणून सन्मित्र सैनिकी विद्यालयात नुकतेच रुजू झालेले कमलसिंह थापा यांचाही कारगिल युद्धात म्हणजेच आॅपरेशन विजमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. १९ बटालियन जम्मू काश्मीरमध्ये कमलसिंह त्यावेळी सुभेदार पदावर कार्यरत होते. कारगिलचे युद्ध त्यांनी खूप जवळून अनुभवले. त्या प्रसंगाचे वर्णन करताना सहकाऱ्यांच्या आठवणींनी त्यांचे मन हेलावत होते आणि त्या विजयश्रीच्या स्मरणाने त्यांचा उर अभिमानाने फुलून येत होता. शत्रू उंचावर असल्यानं शत्रुला मारा करणे सोपी नव्हते. नैसर्गिक परिस्थिती भारतीय सैन्याला प्रतिकूल होती. पण भारतीय सैन्याची हिंमत प्रचंड होती. मशिनगन्सची फायरिंग आणि तोफांच्या माऱ्यात कमलसिंह थापा यांनी ट्रास- बटालिक या क्षेत्रात शत्रूवर चढाई करून त्यांना धूळ चारली.दीपक भोयर हे मूळ चंद्रपूरर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे. कारगिल युद्धादरम्यान ते श्रीनगर येथे भारतीय वायुदलात सार्जंट म्हणून कार्यरत होते. तांत्रिक सेवेच्या माध्यमातून वायूदलाच्या लढाऊ विमानांमध्ये संपर्क ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. ते सध्या सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी निदेशक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील भावी सैनिक घडत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)चंद्रपूर जिल्ह्यातल्या दीपक भोयर यांच्यासह मूळ पंजाबचे हरजिंदर सिंह, हिमाचल प्रदेशातले कमलसिंह थापा हे तिघेही सैन्यातून निवृत्त होऊन सन्मित्र सैनिकी विद्यालयात उद्याचे सैनिक घडवत आहेत. देशसेवा हेच जीवनाचं ध्येय समजून कार्य करण्यातच सार्थकता मानणारे हे तिघेही निवृत्तीनंतरच सुखासीन आयुष्य जगत राहण्याची चाकोरी नाकारुन या कार्याच्या निमित्तानं देश सेवाच करीत आहेत. प्रत्यक्ष जीवनात आदर्श ठरावेत, असे हे तिघेही त्यांच्या वाट्याला आलेलं काम हे त्याचं कर्तव्यच होतं या भावनेने बोलत होते. आज सैन्यदलात अनेक संधी असूनही तरुणवर्ग त्याकडे आकर्षित होत नसल्याची खंत त्यांना आहे. या प्रेरणादायी क्षेत्रात तरुणांनी कारकीर्द घडवावी, असे त्यांना मनापासून वाटते.