शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

लॉकडाऊनमुळे अनेकांनी जपून ठेवल्या लॉकरमध्येच अस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:52 IST

लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांची इच्छा असतानाही धार्मिक स्थळी अस्थी नेण्यावर निर्बंध आले. त्यामुळे काही कुटुंंबीयांनी आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकरमध्ये अस्थी जपून ठेवल्या तर काहींनी सोयीनुसार अस्थी विसर्जन करून कार्यक्रम आटोपता घेत आहेत.

ठळक मुद्देअस्थी विसर्जनास अडचणीपरवानगीचा ससेमिरा

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करून काही कुटुंबीय विविध धार्मिक ठिकाणी अस्थी विसर्जनासाठी घेऊन जातात. मात्र लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांची इच्छा असतानाही धार्मिक स्थळी अस्थी नेण्यावर निर्बंध आले. त्यामुळे काही कुटुंंबीयांनी आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकरमध्ये अस्थी जपून ठेवल्या तर काहींनी सोयीनुसार अस्थी विसर्जन करून कार्यक्रम आटोपता घेत आहेत. चंद्रपूर शहरातील शांती धाममध्येही परवागनीविना काही व्यक्तींच्या अस्थी लॉकरमध्ये जपून ठेवण्यात आल्या आहेत.मृत्यूनंतर अस्थी विसर्जन करण्याच्या विविध धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रथा-परंपरा पाळताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्वसाधारणपणे विदर्भात वर्धानदीच्या वढा संगम, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथील वैनगंगा नदी व माहूर येथेही अस्थी विसर्जन करण्यासाठी नेल्या जाते. मात्र लॉकडाऊनमुळे बंधने आली. बाहेर गावी जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असल्याने अस्थीचे विसर्जन कुठे करावे, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. काहींनी आपल्या आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत स्मशानघाटातील लॉकरमध्ये अस्थी सुरक्षित ठेवल्या आहेत. चंद्रपूर शहरातील शांतीधाममध्ये अस्थी ठेवण्यासाठी १६ लॉकरची व्यवस्था आहे. या लॉकरमध्ये सध्या १० अस्थी ठेवल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी या लॉकरमध्ये एक किंवा दोन दिवसच अस्थी ठेवल्या जात होत्या. काही कुटुंब अस्थी विसर्जन करण्यासाठी प्रशासकीय परवानगी मागत असून परवानगी मिळाल्यानंतरच त्या अस्थी येथून नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.इरईच्या पात्रात अस्थीचे विसर्जनलॉकडाऊन व शासकीय परवानगीचा ससेमीरा टाळण्यासाठी काही कुटुंबीय इरई नदीच्या पात्रात अस्थी कलशाचे विसर्जन करीत आहे. यात वेळ व पैशाचीही बचत होत आहे. काही जण सोयीनुसार आपआपल्या पद्धतीने अस्थीचे विसर्जन करीत आहेत.लॉकडाऊनपूर्वी शांतीधाममध्ये असलेल्या लॉकरमध्ये एक किंवा दोन दिवस अस्थी ठेवल्या जात होत्या. मात्र सध्या अस्थी ठेवण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. अनेक जण आपल्या इच्छेनुसार अस्थीकलशचे विसर्र्जन करतात. मात्र आता ये-जा करण्याची परवानगी घ्यावी लागत असल्याने निर्बंध आले आहे.- नरेंद्र गर्गेलवार,टालव्यवस्थापक, शांतीधाम चंद्रपूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस