शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

ते जगत आहेत उघड्यावरचे जीवन

By admin | Updated: August 19, 2015 01:19 IST

गरीब असो वा श्रीमंत घर ही प्रत्येकाची गरज आहे. शासनाने कानपा येथील आदिवासीची १९८४ मध्ये ही गरज पूर्ण केली.

१९८४ मध्ये मिळालेले घरकूल झाले नामशेष : देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्षघनश्याम नवघडे नागभीडगरीब असो वा श्रीमंत घर ही प्रत्येकाची गरज आहे. शासनाने कानपा येथील आदिवासीची १९८४ मध्ये ही गरज पूर्ण केली. पण त्यानंतर शासन आपले कर्तव्य विसरले. डागडूजीअभावी ही संपूर्ण घरे नामशेष झालीत आणि या आदिवासींच्या नशिबी उकिरड्यावरचे जीणे वाट्याला आले.चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारे हे गावे नागभीड नागपूर राज्यमहामार्गावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजाराच्या आसपास असून आदिवासींची लोकसंख्या एक हजाराच्या दरम्यान आहे. या आदिवासीसाठी १९८४ मध्ये इंदिरा आवास योजनेतून घरकुल योजना राबविण्यात आली. जवळपास ६२ घरकुल या आदिवासींना देण्यात आले. तत्कालिन खासदार विलास मुत्तेमवार आणि आमदार बाबासाहेब खानोरकर यांच्या हस्ते या घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. १० ते १५ वर्षे या घरकुलांची स्थिती बरी होती. पण नंतर या घरकुल योजनेला घरघर लागणे सुरु झाले. ही घरे पडायला सुरुवात झाली. घरे पडू लागल्याने या लाभार्थ्यांनी संबंधित यंत्रणेकडे घरांच्या डागडुजीसाठी अर्ज केलेत. पण कोणतीही मदत त्यांना देण्यात आली नाही. या योजनेत डागडुजीटे प्रावधानच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आता ही घरे पूर्णत: नामशेष झाली असून हे सर्व लाभार्थी घरांच्या अंगणातच पाल टाकून आपले जीवन कंठत आहेत.शासनाकडून एकदा या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असल्याने नवीन घरकुल योजनेसाठी ते आता कायमचे अपात्र झाले आहेत. अनेकदा या लाभार्थ्यांनी नवीन घरकुलासाठी अर्ज केले. पण त्यांना लाभ मिळाला असल्याचे सांगून लाभ नाकारण्यात आला. सदर प्रतिनिधीने या वस्तीला भेट दिली असता, ही वस्ती विविध समस्यांचे माहेरघर बनली असल्याचे निदर्शनास आले.या लोकांना शेती नसल्याने ते नेहमीच फिरस्तीचे व्यवसाय करतात. देवी देवतांचे फोटो विकणे, खारका मनुकांची गावोगावात फिरुन विक्री करणे हा या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.आपल्या व्यथा कथन करताना या लोकांनी सांगितले की, हिवाळा आणि उन्हाळ्यात आम्ही कसेही दिवस काढतो. पण पावसाळ्यात मात्र आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. थोडासा जरी पाऊस आला तरी झोपड्यांमध्ये पाणी घुसत असल्याने अन्न धान्य व कपडे भिजून जात असतात. शिवाय साप विचवांची भिती वेगळीच असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या व्यवसायातून आमचे पोटच भरत नाही. मग घराच्या दुरूस्तीसाठी पैसे आणायचे कुठून, असा या नागरिकांचा सवाल आहे. नवीन घर बांधण्याची आमच्यात शक्ती नाही. शासनाने आमची चौकशी जरुर करावी आणि आम्हाला घरकुलाचा लाभ पुन्हा एकदा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ग्रामपंचायतीनेही आदिवासीच्या वस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. या वस्तीत रस्त्याची व्यवस्था सुस्थितीत असली तरी नाल्या मात्र तयार करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरच जिरत असते किंवा वाहत असते. या वस्तीतच अंगणवाडी आहे. एक स्वच्छतागृह बांधण्यात आले असले तरी ते सुद्धा मोडकळीस आले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुले उघड्यावरच विधी उरकत असतात.