शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

ते जगत आहेत उघड्यावरचे जीवन

By admin | Updated: August 19, 2015 01:19 IST

गरीब असो वा श्रीमंत घर ही प्रत्येकाची गरज आहे. शासनाने कानपा येथील आदिवासीची १९८४ मध्ये ही गरज पूर्ण केली.

१९८४ मध्ये मिळालेले घरकूल झाले नामशेष : देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्षघनश्याम नवघडे नागभीडगरीब असो वा श्रीमंत घर ही प्रत्येकाची गरज आहे. शासनाने कानपा येथील आदिवासीची १९८४ मध्ये ही गरज पूर्ण केली. पण त्यानंतर शासन आपले कर्तव्य विसरले. डागडूजीअभावी ही संपूर्ण घरे नामशेष झालीत आणि या आदिवासींच्या नशिबी उकिरड्यावरचे जीणे वाट्याला आले.चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारे हे गावे नागभीड नागपूर राज्यमहामार्गावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजाराच्या आसपास असून आदिवासींची लोकसंख्या एक हजाराच्या दरम्यान आहे. या आदिवासीसाठी १९८४ मध्ये इंदिरा आवास योजनेतून घरकुल योजना राबविण्यात आली. जवळपास ६२ घरकुल या आदिवासींना देण्यात आले. तत्कालिन खासदार विलास मुत्तेमवार आणि आमदार बाबासाहेब खानोरकर यांच्या हस्ते या घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. १० ते १५ वर्षे या घरकुलांची स्थिती बरी होती. पण नंतर या घरकुल योजनेला घरघर लागणे सुरु झाले. ही घरे पडायला सुरुवात झाली. घरे पडू लागल्याने या लाभार्थ्यांनी संबंधित यंत्रणेकडे घरांच्या डागडुजीसाठी अर्ज केलेत. पण कोणतीही मदत त्यांना देण्यात आली नाही. या योजनेत डागडुजीटे प्रावधानच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आता ही घरे पूर्णत: नामशेष झाली असून हे सर्व लाभार्थी घरांच्या अंगणातच पाल टाकून आपले जीवन कंठत आहेत.शासनाकडून एकदा या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असल्याने नवीन घरकुल योजनेसाठी ते आता कायमचे अपात्र झाले आहेत. अनेकदा या लाभार्थ्यांनी नवीन घरकुलासाठी अर्ज केले. पण त्यांना लाभ मिळाला असल्याचे सांगून लाभ नाकारण्यात आला. सदर प्रतिनिधीने या वस्तीला भेट दिली असता, ही वस्ती विविध समस्यांचे माहेरघर बनली असल्याचे निदर्शनास आले.या लोकांना शेती नसल्याने ते नेहमीच फिरस्तीचे व्यवसाय करतात. देवी देवतांचे फोटो विकणे, खारका मनुकांची गावोगावात फिरुन विक्री करणे हा या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.आपल्या व्यथा कथन करताना या लोकांनी सांगितले की, हिवाळा आणि उन्हाळ्यात आम्ही कसेही दिवस काढतो. पण पावसाळ्यात मात्र आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. थोडासा जरी पाऊस आला तरी झोपड्यांमध्ये पाणी घुसत असल्याने अन्न धान्य व कपडे भिजून जात असतात. शिवाय साप विचवांची भिती वेगळीच असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या व्यवसायातून आमचे पोटच भरत नाही. मग घराच्या दुरूस्तीसाठी पैसे आणायचे कुठून, असा या नागरिकांचा सवाल आहे. नवीन घर बांधण्याची आमच्यात शक्ती नाही. शासनाने आमची चौकशी जरुर करावी आणि आम्हाला घरकुलाचा लाभ पुन्हा एकदा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ग्रामपंचायतीनेही आदिवासीच्या वस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. या वस्तीत रस्त्याची व्यवस्था सुस्थितीत असली तरी नाल्या मात्र तयार करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरच जिरत असते किंवा वाहत असते. या वस्तीतच अंगणवाडी आहे. एक स्वच्छतागृह बांधण्यात आले असले तरी ते सुद्धा मोडकळीस आले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुले उघड्यावरच विधी उरकत असतात.