शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

त्यांनाही हवे वैवाहिक जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:05 IST

एचआयव्ही (एड्स) बाधितांनी उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाला, आत्मविश्वास वाढला आहे. आता, त्यातील काहींची पुढची पायरी त्यांना जीवनसाथी मिळावे, वैवाहिक जीवन प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे६२ जणांचा परिचय : एचआयव्ही बाधितांकरिता वर-वधू परिचय मेळावा

बल्लारपूर : एचआयव्ही (एड्स) बाधितांनी उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाला, आत्मविश्वास वाढला आहे. आता, त्यातील काहींची पुढची पायरी त्यांना जीवनसाथी मिळावे, वैवाहिक जीवन प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा आहे.त्यांच्या या अपेक्षेची दखल सेवाभावी आणि सामाजिक संस्थांनी घेतली. त्यांच्या पुढाकाराने नुकताच एचआयव्ही बाधीत व आता पूर्ण बरे झालेल्यांकरिता वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन येथील बल्लारपूर पेपर मिल कॉलनीतील आॅडिटोरियम हॉलमध्ये करण्यात आले होते. या मेळाव्यात २५ महिला व ३७ पुरुषांनी आपला परिचय देऊन आपला जीवनसाथी कसा असावा, ही अपेक्षा व्यक्त केली.परिचय देणाऱ्यात २० ते ४५ वर्षे पर्यंतचे स्त्री-पुरुष होते. यातील काही अविवाहित तर काहींचे पूर्वी लग्न झालेले व घटस्फोटीत होते. या मेळाव्याचे आयोजन किरण ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर, विहान प्रकल्प, शिवार संस्था चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदा वनकर तर प्रमुख अतिथी म्हणून बिल्ट ग्राफीक्सच्या वरिष्ठ अधिकारी सुचेता ठावरी, जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, एड्स नियंत्रणाचे जिल्हा परिवेक्षक निरंजन मंगरूळकर, समुदाय देखभाल समन्वयक हेमचंद उराडे, जिल्हा महिला बालकल्याण संरक्षण अधिकारी प्रिती उंदीरवाडे यांची उपस्थिती होती.यावेळी बल्लारपूर कार्यालयाकडून एचआयव्ही बाधिताना देण्यात येत असलेल्या शासकीय मदतीची माहिती दिली. संचालन विशाल पावडे यांनी तर आभार संगीता रोहणकर यांनी मानले.