शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
4
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
5
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
6
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
7
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
8
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
9
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
10
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
11
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
12
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
13
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
14
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
15
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
16
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
17
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
18
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
19
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
20
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली

जिल्ह्यातील १४,९७१ पाणीस्रोतांचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:43 AM

पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करुन साथरोगास प्रतिबंध केला जातो. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे, यासाठी शुध्दीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते.

ठळक मुद्देजि.प. चा उपक्रम : शासकीय विहिरी, हातपंप, नळ योजना यांचा समावेश

चंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द, सुरक्षित, मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच जलजन्य रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवले जावे, यासाठी जिल्हा परिषदेमधील पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्हयातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील १४ हजार ९७१ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे सर्वेक्षण मोहीम १ आक्टोंबर ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.पिण्याचे पाणी, परिसर आणि वैयक्तीक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमामध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्व अनन्यसाधारण असून वैयक्तीक सवयी व सार्वजनिक स्वच्छता, नळ पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष, देखभाल व दुरुस्ती या कारणांमुळे पाणी दूषित होते. हे दूषित पाणी पिण्यास वापरल्याने विविध जलजन्य आजार होऊ शकतात.त्यामुळे जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व गावांतील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मोहीम स्वरुपात केले जाणार आहे.  पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करुन साथरोगास प्रतिबंध केला जातो. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे, यासाठी शुध्दीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते. दूषित पाणी पुरवठा करणाºया ग्रामपंचायतींना लाल तर पाणी स्त्रोताभोवती अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते.पाणी हा महत्त्वाचा घटकमानवी आहारात पाणी हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता राखण्याकडे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. गावांच्या वैयक्तीक सवयी, पाण्याचा वापर, सांडपाण्याचा निचरा, पाणी पुरवठा योजनेतील दुरुस्ती आणि देखभाल या बाबी यात महत्त्वाच्या मानल्या जातात.आपल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता व गावात कोणताही जलजन्य आजार होऊ नये याकरिता जलसुरक्षक यांनी गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करुन घ्यावे, पाणी नमुने गोळा करुन ते प्रयोगशाळेत पाठवावे. स्त्रोत दूषित असल्यास त्यावर उपाययोजना करता येईल. स्त्रोतांजवळ ग्रामस्थांनी स्वच्छता पाळावी.- विजय पचारेउपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद, चंद्रपूर.