शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

असहिष्णुता देशात कधी नव्हती ?

By admin | Updated: January 10, 2016 00:53 IST

देशात असहिष्णुता या विषयावर ओरड होऊन त्या संदर्भात बऱ्याच साहित्यकारांनी आपले पुरस्कार परत करण्याची मोहीमच उघडली होती.

वीरा साथीदार यांचा सवाल : ‘कोर्ट’ आॅस्करमधून बाद होण्याचे कारण आर्थिक बाजूवसंत खेडेकर बल्लारपूरदेशात असहिष्णुता या विषयावर ओरड होऊन त्या संदर्भात बऱ्याच साहित्यकारांनी आपले पुरस्कार परत करण्याची मोहीमच उघडली होती. विरोधी पक्षाने सत्तापक्षाला संसदेत धारेवर धरले होते. काही तरी विषय हवा म्हणून विरोधकांनी हा विषय उचलून धरला. वस्तुत: युद्ध, जातीय तेढ, हिंसा इत्यादी असहिष्णुतेचे वातावरण आपल्या देशात आजचे नव्हे, तर अनेक काळापासून आहे. त्यामुळे, असहिष्णुता हा वादाचा वा विरोधाचा मुद्दा होऊ शकत नाही, असे परखड व स्पष्ट मत ‘कोर्ट’ या गाजलेल्या आणि आॅस्करवारी करून आलेल्या चित्रपटाचे नायक वीरा साथीदार यांनी मांडले.साथीदार हे एका कार्यक्रमानिमित्त बल्लारपुरात आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. कुणाला चांगले वाटो वा वाईट, मी स्पष्ट बोलतो, असे स्वत:बद्दल सांगत ते म्हणाले, मी डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीतून घडत आलो आहे. वैचारिक व क्रांतिकारी विचाराच्या पथनाट्यातून अभिनयाचे धडे मिळाले. विनायक कऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात अभिनयाचे गुण पक्के झाले. सुप्रसिद्ध समाजसेवी अ‍ॅड. सुबत अब्राहम यांच्या माध्यमातून कोर्ट चित्रपटामध्ये निर्माता-दिग्दर्शक व लेखक चैतन्य ताम्हणे (मुंबई) यांनी मला अभिनय करण्याची संधी दिली. त्याचे सोने केले आणि मला भरपूर नाव मिळाले. या चित्रपटाच्या विविध अंगासोबत मला अभिनयाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कितीतरी पुरस्कार मिळाले. विषय नवा, मांडणी उत्तम आणि सर्वच कलावंतांचा जिवंत अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरली आणि त्यामुळेच हा चित्रपट चर्चेला आला, प्रशंसा लाभली आणि आॅस्करपर्यंत जाऊन आला, असे तो म्हणाला.कोर्टातील वास्तव चित्र, त्यातील व त्यासंबंधी घडामोडी यामुळे हा वास्तववादी चित्रपट नावीन्यपूर्ण आणि जरा हटके ठरला. हा चित्रपट प्रारंभी विदेशात १९ देशांमध्ये प्रदर्शित झाला. एकूण १९ पुरस्कार त्याला मिळाले. त्यानंतर तो भारतात प्रदर्शित झाला. परंतु वितरकाच्या अडचणीमुळे हा चित्रपट अजूनही बऱ्याच ठिकाणी पोहचला नाही. याचे दु:ख वाटते. कोर्ट चित्रपट भारताकडून आॅस्कर स्पर्धेकरिता गेला, पण तो पहिल्या फेरीतच बाद झाला. यावर साथीदार म्हणाले, आॅस्करमध्ये एकूण १५०० ज्युरी (परीक्षक) असतात. त्या साऱ्यांना चित्रपट दाखविणे व तेही स्वत:च्या खर्चाने, हे आवश्यक असते. त्याची व्यवस्था करण्याकरिता खर्च लागतो. भारत सरकार तो खर्च उचलत नाही. आपण आर्थिकदृष्ट्या टिकू शकत नाही, अशी खंतही साथीदार यांनी व्यक्त केली.मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातला नागपूरचा रहिवाशी. ‘कोर्ट’ला आणि मला अभिनयाचे कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्याची सर्वत्र चर्चा झाली. लहान थोरांनी सर्वच क्षेत्रातील लोकांनी अभिनंदन केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी दखल घेतली नाही, याचे वाईट वाटते. -वीरा साथीदार , चित्रपट कलावंत