शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विषारी साप पकडल्याची वनविभागात नोंदच नाही

By admin | Updated: August 1, 2016 00:35 IST

कोणत्याही प्रजातीचा साप पकडल्यास वनविभागाकडे असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करणे नियमाप्रमाणे गरजेचे आहे.

सापाच्या तस्करीची शक्यता : वरोरा वनविभागाची सावरासावरवरोरा : कोणत्याही प्रजातीचा साप पकडल्यास वनविभागाकडे असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करणे नियमाप्रमाणे गरजेचे आहे. वरोरा शहरानजीक एका शेतातील विहिरीमध्ये विषारी साप सर्पमित्राने पकडला. परंतु वनविभागात त्याबाबत नोंद केली नाही. ही माहिती उघड होताच वरोरा वनविभागाने सावरासावर सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याविषारी सापाची तस्करी होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या येन्सा गावाच्या शेत शिवारातील विहिरीमध्ये दोन साप आढळल्याने शेतकऱ्याने सर्पमित्रास पाचारण केले. त्यातील एक साप मृत अवस्थेत आढळल्याने त्याला शेतात पुरण्यात आले तर दुसरा विषारी साप घेऊन सर्प मित्र निघून गेले. २२ जुलैची घटना असताना वनविभागाच्या रजिस्टरमध्ये नोंद कित्येक तासापर्यंत करण्यात आली नाही. याबाबत वनविभाग संपूर्णपणे अनभिज्ञ होता. ही बाब काही जागरुक नागरिकांनी उघडकीस आणताच वनविभाग जागा झाला व २२ जुलैच्या घटनेची २६ जुलै रोजी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. याचा अर्थ चार दिवस नोंदी अभावी साप कुठे ठेवला, याची माहिती कळू शकली नाही.चार दिवसापर्यंत विषारी साप बाळगल्या प्रकरणी वनविभागाने कुठलीही कारवाई संबधीतावर केली नसल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)सर्पमित्राबाबत वनविभाग अनभिज्ञ वरोरा तालुक्यात किती सर्पमित्र आहेत, याची अज्ञावत माहती वनविभागाकडे दिसून येत नाही. त्यामुळे अनेक सर्पमित्र या परिसरात तयार झाले असून त्यांच्यावर वनविभागाचा अंकुश नसल्याने विषारी सापाच्या तस्करीची शक्यता वर्तविली जात आहे.विषारी साप शेतात सोडलाकुठलाही प्राणी सापडल्यास त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वनविभाग तपासणी केल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येते. पकडलेला विषारी साप एका शेतात सोडल्याची लेखी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. शेतात साप सोडल्यानंतर तो जिवंत राहिल काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. साप मरणासन्न अवस्थेत होता, अशी माहिती वनविभाग देत आहे. साप चार दिवस अन्नापासून वंचित राहिल्याने तो मरणसन्न अवस्थेत होता, हे निष्पन्न होत आहे.