शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

विषारी साप पकडल्याची वनविभागात नोंदच नाही

By admin | Updated: August 1, 2016 00:35 IST

कोणत्याही प्रजातीचा साप पकडल्यास वनविभागाकडे असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करणे नियमाप्रमाणे गरजेचे आहे.

सापाच्या तस्करीची शक्यता : वरोरा वनविभागाची सावरासावरवरोरा : कोणत्याही प्रजातीचा साप पकडल्यास वनविभागाकडे असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करणे नियमाप्रमाणे गरजेचे आहे. वरोरा शहरानजीक एका शेतातील विहिरीमध्ये विषारी साप सर्पमित्राने पकडला. परंतु वनविभागात त्याबाबत नोंद केली नाही. ही माहिती उघड होताच वरोरा वनविभागाने सावरासावर सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याविषारी सापाची तस्करी होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या येन्सा गावाच्या शेत शिवारातील विहिरीमध्ये दोन साप आढळल्याने शेतकऱ्याने सर्पमित्रास पाचारण केले. त्यातील एक साप मृत अवस्थेत आढळल्याने त्याला शेतात पुरण्यात आले तर दुसरा विषारी साप घेऊन सर्प मित्र निघून गेले. २२ जुलैची घटना असताना वनविभागाच्या रजिस्टरमध्ये नोंद कित्येक तासापर्यंत करण्यात आली नाही. याबाबत वनविभाग संपूर्णपणे अनभिज्ञ होता. ही बाब काही जागरुक नागरिकांनी उघडकीस आणताच वनविभाग जागा झाला व २२ जुलैच्या घटनेची २६ जुलै रोजी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. याचा अर्थ चार दिवस नोंदी अभावी साप कुठे ठेवला, याची माहिती कळू शकली नाही.चार दिवसापर्यंत विषारी साप बाळगल्या प्रकरणी वनविभागाने कुठलीही कारवाई संबधीतावर केली नसल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)सर्पमित्राबाबत वनविभाग अनभिज्ञ वरोरा तालुक्यात किती सर्पमित्र आहेत, याची अज्ञावत माहती वनविभागाकडे दिसून येत नाही. त्यामुळे अनेक सर्पमित्र या परिसरात तयार झाले असून त्यांच्यावर वनविभागाचा अंकुश नसल्याने विषारी सापाच्या तस्करीची शक्यता वर्तविली जात आहे.विषारी साप शेतात सोडलाकुठलाही प्राणी सापडल्यास त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वनविभाग तपासणी केल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येते. पकडलेला विषारी साप एका शेतात सोडल्याची लेखी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. शेतात साप सोडल्यानंतर तो जिवंत राहिल काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. साप मरणासन्न अवस्थेत होता, अशी माहिती वनविभाग देत आहे. साप चार दिवस अन्नापासून वंचित राहिल्याने तो मरणसन्न अवस्थेत होता, हे निष्पन्न होत आहे.