शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
3
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
4
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
5
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
6
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
7
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
8
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
9
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
10
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
11
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
12
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
14
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
15
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
16
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
18
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
19
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
20
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी

रोहयोची मजुरी जमा झालीच नाही

By admin | Updated: July 8, 2017 00:41 IST

गेल्या चार-पाच वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा विभागात रोहयो अंतर्गत अनेक कामे केली जात आहे.

चौकशीची मागणी : भद्रावती तालुक्यातील प्रकार, मजुरांत रोषलोकमत न्यूज नेटवर्कवडाळा (तु.): गेल्या चार-पाच वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा विभागात रोहयो अंतर्गत अनेक कामे केली जात आहे. मात्र त्या कामाची मजूरी नियमाप्रमाणे निर्धारीत वेळेनुसार मजुरांच्या खात्यात जमा करण्यास रोहयो यंत्रणेतील कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई प्रमाण यावर्षी वाढलेले आहे. या वर्षीचीही मजुरी अद्याप मजुरांच्या खात्यावर जमा झाली नसल्याने मजुरांत रोष पसरला आहे.या प्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करुन जबाबदार असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील रोहयो मजुरांकडून होत आहे. याप्रकरणी चंदनखेडा विभागातील वडाळा, घोसरी, सोनगाव, खुटेवेडा, कोंढेगाव, चिचोली, वायगाव (तु.) येथील मजुरांनी वेळेवर मजूरी खात्यात जमा करण्याबाबत वेळोवेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो), तहसीलदार भद्रावती व संवर्ग विकास अधिकारी भद्रावती यांच्याकडे लेखी तक्रारी व प्रत्यक्ष भेटी घेवून आपबिती सांगितली. मात्र त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. रोजगार हमी कायद्यानुसार केलेल्या कामाचा हप्ता भरल्यानंतर १५ दिवसाच्या आत मजुरीची रक्कम मजुराच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम संबंधीत यंत्रणेकडून १५ दिवसांपेक्षा जास्त उशिर झाला तर नंतरच्या दिवसांपासून ती रक्कम मजुराच्या खात्यात जमा करेपर्यंत वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार नुकसान भरपाई भत्ता मजुराच्या खात्यात मजुरीच्या रकमेसोबत जमा करणे आवश्यक आहे.मात्र यावर्षी गेल्या सहा महिन्यांपासून रोहयो मजुरांची मजुरी १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस होवूनही नुकसान भरपाई भत्त्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे रोहयो मजुरांना नुकसान भरपाई भत्यापासून वंचित ठेवून रोहयो यंत्रनेतील कर्मचाऱ्यांनी वेतन प्रदान अधिनियम १९४६ च्या तरतुदीचे उल्लंघन केले आहे. रोजगार हमी योजनेचे काम सुरू झाल्यानंतर काम पूर्ण होऊनही मजुरी अजूनही मिळाली नाही. त्यात खुटवंडा येथील मनोहर नामदेव पेंदाम यांची दोन वर्षापासून तर जनार्धन चिंधू आडे, संध्या संतोष कन्नाके, आम्रपाली खुशाल चिकाटे, सरदार सिताराम कुळमेथे या मजुरांची मजुरी गेल्या चार महिन्यांपासून मिळालेली नाही. त्याचप्रमाणे सितारामपेठ येथील बेबी बबन किन्नाके, सुनिता दिलीप कन्नाके, भामडेळी येथील ज्योती विनोद घरत अशा अनेक गावातील रोहयो मजुरांचा समावेश आहे.रोहयो मजुरांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणे, मजुरी प्रलंबित ठेवणे, डाटा एंट्री करताना बँक पासबुक क्रमांक व आधार क्रमांक चुकीचा टाकणे, मजुरांना नेटची समस्या सांगणे यासारखे प्रकार पंचायतस्तरावरील रोहयो यंत्रनेतील कर्मचाऱ्यांकडून होत आहे. या प्रकरणाची जिल्हास्तरावर वरिष्ठांनी चौकशी करुन रोहयो कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याची मागणी रोहयो मजुरांकडून होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. कामे देण्यात दिरंगाईग्रामपंचायत स्तरावर कामे उपलब्ध करून देण्याचा कायदा असतानाही अनेक गावातील मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे काही मजुरांना मजुरीसाठी इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागल्याचा प्रकार तालुक्यात घडला आहे.