शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाने काम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:24 IST

चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठ्या नद्या वाहात असून या सर्व मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो.

ठळक मुद्देपूरपरिस्थितीसाठी सज्ज राहा : आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठ्या नद्या वाहात असून या सर्व मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो. त्यामुळे या मुख्य नद्यांना पूर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अतंर्गत गाव, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत केले.यावर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व आराखडा तयार करण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठक नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन तथा निर्देश करीत असताना ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा, पैनगंगा, इरई व वर्धा नदीच्या पुरामुळे ज्या गावांना धोका निर्माण होऊ शकते, अशा गावांची यादी यावेळी वाचून दाखविली. तेव्हा या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास या गावातील नागरिकांना सुरक्षित व संरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणेने आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पावसाळयापूर्वी सर्व नगर परिषद क्षेत्रात व मोठया शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येऊन नाले मोकळे करण्यात यावे. तसेच शहरातील धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटीस देवून ते घर खाली करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाºयांना त्यांनी दिल्या. तसेच विद्युत, दूरध्वनी, आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पुरवठा विभाग व पशुसंवर्धन या विभागांनी आपल्या विभागाचे नोडल अधिकारी नियुक्त करुन आपली यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सुसज्ज ठेवण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचीन कलंत्रे अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत संवाद साधताना म्हणाले, या सर्व आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर प्रशिक्षित पथके तयार करण्यात येऊन त्यांना बोटी हाताळण्याचे प्रशिक्षण पावसाळ्यापूर्वी देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.