शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

समन्वयाने काम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:24 IST

चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठ्या नद्या वाहात असून या सर्व मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो.

ठळक मुद्देपूरपरिस्थितीसाठी सज्ज राहा : आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठ्या नद्या वाहात असून या सर्व मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो. त्यामुळे या मुख्य नद्यांना पूर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अतंर्गत गाव, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत केले.यावर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व आराखडा तयार करण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठक नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन तथा निर्देश करीत असताना ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा, पैनगंगा, इरई व वर्धा नदीच्या पुरामुळे ज्या गावांना धोका निर्माण होऊ शकते, अशा गावांची यादी यावेळी वाचून दाखविली. तेव्हा या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास या गावातील नागरिकांना सुरक्षित व संरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणेने आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पावसाळयापूर्वी सर्व नगर परिषद क्षेत्रात व मोठया शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येऊन नाले मोकळे करण्यात यावे. तसेच शहरातील धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटीस देवून ते घर खाली करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाºयांना त्यांनी दिल्या. तसेच विद्युत, दूरध्वनी, आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पुरवठा विभाग व पशुसंवर्धन या विभागांनी आपल्या विभागाचे नोडल अधिकारी नियुक्त करुन आपली यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सुसज्ज ठेवण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचीन कलंत्रे अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत संवाद साधताना म्हणाले, या सर्व आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर प्रशिक्षित पथके तयार करण्यात येऊन त्यांना बोटी हाताळण्याचे प्रशिक्षण पावसाळ्यापूर्वी देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.