शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

समन्वयाने काम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:24 IST

चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठ्या नद्या वाहात असून या सर्व मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो.

ठळक मुद्देपूरपरिस्थितीसाठी सज्ज राहा : आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठ्या नद्या वाहात असून या सर्व मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो. त्यामुळे या मुख्य नद्यांना पूर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अतंर्गत गाव, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत केले.यावर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व आराखडा तयार करण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठक नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन तथा निर्देश करीत असताना ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा, पैनगंगा, इरई व वर्धा नदीच्या पुरामुळे ज्या गावांना धोका निर्माण होऊ शकते, अशा गावांची यादी यावेळी वाचून दाखविली. तेव्हा या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास या गावातील नागरिकांना सुरक्षित व संरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणेने आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पावसाळयापूर्वी सर्व नगर परिषद क्षेत्रात व मोठया शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येऊन नाले मोकळे करण्यात यावे. तसेच शहरातील धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटीस देवून ते घर खाली करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाºयांना त्यांनी दिल्या. तसेच विद्युत, दूरध्वनी, आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पुरवठा विभाग व पशुसंवर्धन या विभागांनी आपल्या विभागाचे नोडल अधिकारी नियुक्त करुन आपली यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सुसज्ज ठेवण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचीन कलंत्रे अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत संवाद साधताना म्हणाले, या सर्व आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर प्रशिक्षित पथके तयार करण्यात येऊन त्यांना बोटी हाताळण्याचे प्रशिक्षण पावसाळ्यापूर्वी देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.