शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विनाग्रामपंचायतीचे गाव; ना सुविधा, ना योजना! पाच वर्षांपूर्वी वन विभागाने केले होते गावाचे स्थलांतरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 08:08 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव हे भद्रावती तालुक्यातील गाव होते. वन्य प्राणी-मानव संघर्ष टाळण्याकरिता पळसगावचे सन २०१९मध्ये वरोरा तालुक्यातील सालोरी गावाजवळील वन विभागाच्या जागेवर स्थलांतरण करण्यात आले.

प्रवीण खिरटकर

वरोरा (जि. चंद्रपूर) : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव गावाचे वरोरा तालुक्यातील सलोरी गावानजीक असलेल्या वन जमिनीवर पाच वर्षांपूर्वी स्थलांतरण करण्यात आले. मात्र या गावाला ना कुठल्या ग्रामपंचायतीत समाविष्ट केले, ना स्वतंत्र अशी ग्रामपंचायत दिली. त्यामुळे हे गाव मागील पाच वर्षांपासून विनाग्रामपंचायतीचे आहे. परिणामी येथील ग्रामस्थ विविध सोयी-सुविधा तसेच शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहेत.  

ग्रामपंचायतीचा ठराव झाला, पण...

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव हे भद्रावती तालुक्यातील गाव होते. वन्य प्राणी-मानव संघर्ष टाळण्याकरिता पळसगावचे सन २०१९मध्ये वरोरा तालुक्यातील सालोरी गावाजवळील वन विभागाच्या जागेवर स्थलांतरण करण्यात आले.

ग्रामस्थ घरे बांधून मागील पाच वर्षांपासून तिथे राहात आहेत. वन विभागाने नव्याने वसवलेल्या पळसगावात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा आदी सोयी-सवलती ग्रामस्थांना दिल्या. तसेच पळसगावजवळील वनली, खातोडा या गावांनी पळसगाव-वनली-खातोडा मिळून ग्रामपंचायत करण्याचा ठराव मंजूर केला.

परंतु, मागील पाच वर्षांपासून प्रशासनाने ग्रामपंचायतीची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे पळसगावातील ९० कुटुंबांना शासकीय दाखला घेण्याकरिता पूर्वीच्या भद्रावती तालुक्यात जावे लागत आहे. जुन्या रेकॉर्डनुसार दाखले मिळवावे लागत असल्याने त्यांना शारीरिक, आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वन विभागाने शेती दिली, सिंचन नाही

nवन विभागाने पळसगाववासीयांना शेती दिली. सिंचनाकरिता तलाव खोदून दिला. परंतु, शेतात सिंचनाकरिता विद्युत पुरवठा कोण करणार? याचा सोक्षमोक्ष अद्याप लागलेला नाही.

nशेतीचा ऑनलाइन सातबाराही अद्याप मिळालेला नाही. अद्यापपर्यंत पळसगाव वरोरा तालुक्यात समाविष्ट झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.