शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

‘त्यांच्या’ नशिबी आले उपेक्षितांचे जीणे!

By admin | Updated: June 28, 2015 01:52 IST

पतीचे अकाली अथवा अपघाती निधन झाल्याने कुटुंबाचा आधारच गेला. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला.

निराधार विधवांची व्यथा अनुदानात केली कपात ‘अच्छे दिन’वाल्यांच्या आघातअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरपतीचे अकाली अथवा अपघाती निधन झाल्याने कुटुंबाचा आधारच गेला. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. लहान मुलांच्या पालन पोषणाची विवंचना सतावू लागली. भविष्याचा वेध घेत असताना शासनाची संजय गांधी निराधार योजना मदतीला आली. मासिक अनुदानावर प्रपंच सुरू झाला. मात्र ‘अच्छे दिन’वाल्यांचा आघात झाला. मागील पाच महिन्यांपासून मिळणाऱ्या अनुदानात कपात झाली. परिणामी ‘त्यांच्या’ नशिबी उपेक्षितांचे जीणे आले. ही बल्लारपूर तालुक्यातील निराधार विधवांची व्यथा आहे.निराधार विधवा, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना अर्थ साहाय्य देण्याच्या उद्देशाने व निराधार विधवांना मानसिक बळ आशेचा किरण दाखविणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यात सन १९८० केली जात आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची योजना निराधारांना सामाजिक न्यायाची पहाट दाखविणारी आहे. योजनेमुळे अनेकांना जगण्याचा आधार मिळाला. पुरोगामी राज्याचा सामाजिक बांधिलकी जोपासणारा व सर्वसमाज घटकांना न्याय देणारा निर्णय आहे. आघाडी सरकारने योजनेला पाठबळ दिले. मात्र युती सरकारने योजनेचे बळच हिरावल्याचे वास्तव समोर आले.संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी विधवा महिलांना मुले २५ वर्षाची होईपर्यंत दरमहा ९०० रुपये अनुदान दिले जात होते. योजनेत अर्ज मंजूर झाल्यापासून अशा विधवा निराधार महिलांना नोव्हेंबर २०१४ पर्यंत नियमीत मासिक अनुदान मिळत होते. मात्र मागील पाच महिन्यापासून या घटकातील विधवांना ९०० रुपये ऐवजी ६०० रुपयेच अनुदान बँक खात्यात पाठविले जात आहे. योजनेतील अनुदान वाढीची अपेक्षा असताना उलट अनुदानात कपात केल्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून सत्तेवर आलेल्या युती सरकारने निराधार महिलांवरच आघात केला आहे. याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील महिलांना सोसावी लागत आहे.संजय गांधी निराधार योजना राज्य शासन पुरस्कृत आहे. शासन निर्णयानुसार आघाडी सरकारच्या कार्यकाळात या योजनेतील लाभार्थी विधवा महिलेची मुले २१ वर्षाची होतपर्यंत दरमहा ९०० रुपये अनुदान देण्याची तरतूद होती. त्यानुसार अनुदान बँक खात्यात जमा केले जात होते. तद्नंतर विधवा महिलांच्या मुलांच्या वयात २५ वर्षाची मर्यादा करण्यात आली. तरीही मासिक अनुदान ९०० रुपयेच देण्यात येत होते. मात्र एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्याचा शब्द खेळ करुन प्रशासनाने अशा विधवा महिलांना ९०० रुपये ऐवजी ६०० रुपये मासिक अनुदान केल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.ज्या लाभार्थी महिलेला मुलीच असतील, अशा लाभार्थ्यांच्या बाबतीत मुलींचे वय २५ वर्षे झाले अथवा लग्न होऊन नांदावयास गेल्यावर सुद्धा लाभास पात्र ठरते. अशांना मासिक अनुदान ६०० रुपये देणे क्रमप्राप्त आहे. मात्र ज्या विधवा निराधारांचे मुले २५ वर्षाच्या आता असून ही अनुदानात कपात करणे म्हणजे त्यांना उपेक्षितांचे जीवन जगण्यास विद्यमान सरकारने जाणिवपूर्वक बाध्य केले आहे. विसापूर येथील शांताबाई शेषराव अर्जूनकर या विधवा महिलेला दोन अल्पवयीन मुली तर येथीलच वनिता शालीक आत्राम हिला दोन लहान मुले आहेत. दोन अडीच वर्षापासून तिला दरमहा ९०० रुपये अनुदान दिले जात होते. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार निराधार विधवा महिलांच्या प्रश्नावर विरोधी पक्षात असताना आग्रही भूमिका घेत. एकेकाळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी निवड समितीत त्यांचाही समावेश होता. निराधारांचा अर्ज मंजुर केला म्हणून लाभार्थ्यांला पोस्ट कार्ड पाठवायचे. तुमच्या मिळणाऱ्या अनुदानात वाढ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन ते नेहमी निराधारांच्या मेळाव्यात देत असत. मात्र आजधडीला राज्याच्या मंत्री मंडळात तेच वजनदार मंत्री आहेत. राज्याची तिजोरीही त्यांच्या ताब्यात आहे. आशा पल्लवित करणाऱ्या खजिनदाराने निराधार विधवांच्या नशिबी उपेक्षितांचे जीवन जगण्यास भाग पाडल्याने तिव्र नाराजी पसरली आहे.