शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाची १२ दिवसांपासून हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:37 IST

Chandrapur : टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यात मागील दोन महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली. नागरिकांच्या मागणीनुसार, वनविभागाने टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून मोहीम राबवत आहे. मात्र, हा वाघ हुलकावणी देत असून जेरबंद करण्याचे वनविभागाचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहे.

तालुक्यात दोन वाघांनी धुमाकूळ घालत दोन महिन्यात सहा जणांचा बळी घेतला. हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाला. ३० ऑक्टोबरला बोरचांदली शिवारात गुरे चराई करताना वाघाचे दर्शन होताच जीव वाचविण्याच्या आकांतात शैलेश कटकमवार याने नदीत उडी घेतली. त्यामुळे त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी, शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण असून शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून वनविभागाने तैनात केलेल्या रेस्क्यू टीमला हुलकावणी देत आहे. ही टीम वाघाच्या मागावर आहे. परिसरात अनेक ठिकाणी वनविभागाने कॅमेरे लावले.

तालुक्यातील जंगलात ११ वाघांचा संचार आहे. वनविभागाने वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी केली. 

"दोन दिवसांपूर्वी टी ८३ वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळाले. टी ८७ वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी संयम ठेवावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे." -राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मूल 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर