शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाची १२ दिवसांपासून हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:37 IST

Chandrapur : टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यात मागील दोन महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली. नागरिकांच्या मागणीनुसार, वनविभागाने टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून मोहीम राबवत आहे. मात्र, हा वाघ हुलकावणी देत असून जेरबंद करण्याचे वनविभागाचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहे.

तालुक्यात दोन वाघांनी धुमाकूळ घालत दोन महिन्यात सहा जणांचा बळी घेतला. हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाला. ३० ऑक्टोबरला बोरचांदली शिवारात गुरे चराई करताना वाघाचे दर्शन होताच जीव वाचविण्याच्या आकांतात शैलेश कटकमवार याने नदीत उडी घेतली. त्यामुळे त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी, शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण असून शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून वनविभागाने तैनात केलेल्या रेस्क्यू टीमला हुलकावणी देत आहे. ही टीम वाघाच्या मागावर आहे. परिसरात अनेक ठिकाणी वनविभागाने कॅमेरे लावले.

तालुक्यातील जंगलात ११ वाघांचा संचार आहे. वनविभागाने वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी केली. 

"दोन दिवसांपूर्वी टी ८३ वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळाले. टी ८७ वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी संयम ठेवावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे." -राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मूल 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर