शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चौघांचा बळी घेणारा 'तो' वाघ अखेर जेरबंद; चंद्रपूर वनविभागाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 13:50 IST

सदर, वाघ दोन ते अडीच वर्षांचा असल्याचे समजते

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत उत्तर वनपरिक्षेत्रात मागील पाच महिन्यांत चौघांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

२८ जून २२, १६ ऑगस्ट २२, १७ ऑगस्ट २२, ४ नोव्हेंबर २२ या तारखांना उत्तर वनपरिक्षेत्रात झालेल्या मनुष्य हानीमध्ये स्याम २ वाघाचा सहभाग असल्याचे कॅमेरा ट्रॅपवरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद करण्याचे आदेश दिले. हे आदेश मिळाल्याने ८ नोव्हेंबरला सकाळपासून लाखापूर येथे पाळत ठेवण्यात आली होती. सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान डॉट मारून वाघाला बेशुद्ध करून पिंजराबंद करण्यात आले. सदर, वाघ दोन ते अडीच वर्षांचा असल्याचे समजते.

तालुक्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उत्तर-दक्षिण वनपरिक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष नित्याचीच बाब आहे. उत्तर वनपरिक्षेत्रात उपक्षेत्र सायागाटा नियतक्षेत्रामध्ये कक्ष क्र. ११८ मध्ये जगन पानसे (रा. लाखापूर) याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. कॅमेरा ट्रॅपवरून या घटनेत व याआधीच्या सलग तीन मनुष्य हानीच्या घटनांमध्ये स्याम २ या वाघाचा सहभाग असल्याचे दिसून आले.

सदर वाघ जेरबंद करण्याचे आदेश असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे, शूटर अजय मराठे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कक्ष क्र. ११८ मध्ये वाघावर पाळत ठेवली होती. सायंकाळी वाघाला बेशुद्ध करून पिंजराबंद करण्यात आले. पुढील कारवाई वनविभागाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूरforest departmentवनविभाग