शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

वाघाने हल्ला केला; मात्र गुराख्याने झुंज देत वाघाला पिटाळून लावले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:34 IST

काळ आला; मात्र वेळ आली नव्हती !

दिलीप मेश्राम

नवरगाव (चंद्रपूर) : जंगलात गुरे चारत असताना अचानक गुराखी सुनील सुधाकर नैताम याच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. मात्र तितक्याच तत्परतेने सुनीलने वाघाशी झुंज देत वाघाला पळवून लावले. यामध्ये तो जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर बिटामध्ये रत्नापूर येथील गुराखी सुनील सुधाकर नैताम (३५) हा नेहमीप्रमाणे सोमवारी रत्नापूर बिटातील कक्ष क्रमांक ४४ मध्ये इतर सहकाऱ्यांसह गुरे चारत असताना अचानक पट्टेदार वाघाने पाठीमागून हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने सुनील घाबरला. मात्र लगेच स्वत:ला सावरत पलटून हातातील काठीने व कुऱ्हाडीने प्रतिकार केला. सोबत असलेले सहकारी केशव येसनसुरे यांना आवाज दिला.

वाघच तो; हरणार कसा?

दोन गुराख्यांनी मिळून वाघाचा हल्ला परतवून लावला. मात्र या संघर्षात वाघ प्रतिस्पर्धी होता. शिवाय तो भुकेला होता. त्यामुळे पोटाची भूक भागविण्यासाठी त्या दोघांना सोडल्यानंतर त्याने लगेच एका गायीवर हल्ला करून ठार मारले. घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील वनरक्षक जे. एस. वैद्य यांनी जखमी सुनीलला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी दाखल केले.

अन् कुऱ्हाड खाली पडताच अवसान गळाले

वाघाशी झुंज देत असताना सुनीलच्या हातातील कुऱ्हाड खाली पडली आणि त्याचे अवसानच गळाले. आता आपला संघर्ष संपला, असे वाटत असतानाच सहकारी केशव येसनसुरे धावून आला. त्यानंतर दोघांनी मिळून त्या पट्टेदार वाघाचा हल्ला परतवून लावला. ‘होता केशव म्हणून वाचला सुनील’ असाच प्रकार तिथे घडला. मात्र वाघाच्या झटापटीत वाघाने सुनीलच्या पाठीवर, छातीवर आणि हातावर जखमा केल्या. सुनीलने स्वत:ला सावरून हिम्मत दाखविली नसती तर नक्कीच तो बळी ठरला असता. याशिवाय शेतात जवळच असलेल्या केशव येसनसुरे यांनीही धाडस दाखवून मदत केली नसती तर अनुचित घडले असते.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर