शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

वाघाने हल्ला केला; मात्र गुराख्याने झुंज देत वाघाला पिटाळून लावले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:34 IST

काळ आला; मात्र वेळ आली नव्हती !

दिलीप मेश्राम

नवरगाव (चंद्रपूर) : जंगलात गुरे चारत असताना अचानक गुराखी सुनील सुधाकर नैताम याच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. मात्र तितक्याच तत्परतेने सुनीलने वाघाशी झुंज देत वाघाला पळवून लावले. यामध्ये तो जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर बिटामध्ये रत्नापूर येथील गुराखी सुनील सुधाकर नैताम (३५) हा नेहमीप्रमाणे सोमवारी रत्नापूर बिटातील कक्ष क्रमांक ४४ मध्ये इतर सहकाऱ्यांसह गुरे चारत असताना अचानक पट्टेदार वाघाने पाठीमागून हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने सुनील घाबरला. मात्र लगेच स्वत:ला सावरत पलटून हातातील काठीने व कुऱ्हाडीने प्रतिकार केला. सोबत असलेले सहकारी केशव येसनसुरे यांना आवाज दिला.

वाघच तो; हरणार कसा?

दोन गुराख्यांनी मिळून वाघाचा हल्ला परतवून लावला. मात्र या संघर्षात वाघ प्रतिस्पर्धी होता. शिवाय तो भुकेला होता. त्यामुळे पोटाची भूक भागविण्यासाठी त्या दोघांना सोडल्यानंतर त्याने लगेच एका गायीवर हल्ला करून ठार मारले. घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील वनरक्षक जे. एस. वैद्य यांनी जखमी सुनीलला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी दाखल केले.

अन् कुऱ्हाड खाली पडताच अवसान गळाले

वाघाशी झुंज देत असताना सुनीलच्या हातातील कुऱ्हाड खाली पडली आणि त्याचे अवसानच गळाले. आता आपला संघर्ष संपला, असे वाटत असतानाच सहकारी केशव येसनसुरे धावून आला. त्यानंतर दोघांनी मिळून त्या पट्टेदार वाघाचा हल्ला परतवून लावला. ‘होता केशव म्हणून वाचला सुनील’ असाच प्रकार तिथे घडला. मात्र वाघाच्या झटापटीत वाघाने सुनीलच्या पाठीवर, छातीवर आणि हातावर जखमा केल्या. सुनीलने स्वत:ला सावरून हिम्मत दाखविली नसती तर नक्कीच तो बळी ठरला असता. याशिवाय शेतात जवळच असलेल्या केशव येसनसुरे यांनीही धाडस दाखवून मदत केली नसती तर अनुचित घडले असते.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर