शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, ११ हजार रुपये असलेला कापसाचा भाव सात हजारांवर आला ना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:20 IST

कापसाच्या दरात घसरण : तीन वर्षांपूर्वी मिळाला ११ हजार रुपये भाव

आशिष खाडे लोकमत न्यूज नेटवर्क पळसगाव : दिवसागणिक शेतकऱ्यांच्या उपयोगी साहित्यांसह बी- बियाणे, खते, औषधी, मजुरी आदींच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे; परंतु त्याच मातीतून उगवणार पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडताना दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी कापसाला दहा हजारांच्या पलीकडे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत होता; पण आजच्या घडीला कापसाचे चढलेले भाव चक्क चार हजारांनी उतरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खरीप हंगामामध्ये मुख्य पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, तूर, धान पिकांसोबत कापूस पिकांची बहुतांश शेतकरी लागवड करतात. कापूस पिकाला सहा महिन्याचा कालावधी असून उत्पादन क्षमता आता त्यात दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच उरत नाही आहे. 

कापूस पिकाला तीन वर्षांअगोदर नऊ हजारांपासून ते साडेअकरा हजार रुपयांपर्यंत चांगला भाव मिळत होता. भाव बऱ्यापैकी मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च निघून काही पैसे शेतकऱ्यांना शिल्लक राहत होते; पण मागील दोन वर्षांपासून कापसाच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. 

त्यामुळे आता दिवसेंदिवस कापूस पिकाची शेती ही तोट्यात जात आहे. कापूस पिकाला ७५२१ रुपये शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांचा कापूस या हमीभावाने घेतल्याचे दिसून आले नाही. सात हजार रुपयांपासून बाजार मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. 

एवढ्या भावामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे समोरील हंगामासाठी पैशाची तरतूद कुठून करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. 

"शासनाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. उलट शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही; पण कापसाचा ११ हजार रुपयांवर गेलेला भाव आज सात हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे." -पद्माकर देरकर, शेतकरी, पळसगाव

"एक एकरमध्ये १६ हजार रुपयांचे सोयाबीन झाले. त्यात २० हजारांचा खर्च आला. सोयाबीनला जर सात हजार रुपये हमीभाव असता तर किमान खर्च तरी माझा निघाला असता." - सूरज पोतराजे, शेतकरी, पळसगाव.

शेतकरी धोरणात हवाय बदल मागील दहा वर्षांच्या काळात शेतमालाच्या हमीभावात शासनाने भाववाढ केली असली, तरीही भाववाढ उत्पादनखचर्चापेक्षा कमीच आहे. खासगी बाजारात मालाचे भाव हमीभावापेक्षा कमीच राहत आहेत. त्यावर शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. शेतमालाचे भाव आणि इतर वस्तूंची झालेली भाववाढ यामध्ये कमालीची तफावत आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात काळोख दिवसेंदिवस निर्माण होत आहे. मागील दहा वर्षांच्या काळात ज्याप्रमाणे खताचे भाव वाढले, त्याच तुलनेत जर शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाचे भाव जर वाढवून दिले तरच शेतकरी आर्थिक सक्षम होईल.

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर