शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

साहेब, ११ हजार रुपये असलेला कापसाचा भाव सात हजारांवर आला ना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:20 IST

कापसाच्या दरात घसरण : तीन वर्षांपूर्वी मिळाला ११ हजार रुपये भाव

आशिष खाडे लोकमत न्यूज नेटवर्क पळसगाव : दिवसागणिक शेतकऱ्यांच्या उपयोगी साहित्यांसह बी- बियाणे, खते, औषधी, मजुरी आदींच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे; परंतु त्याच मातीतून उगवणार पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडताना दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी कापसाला दहा हजारांच्या पलीकडे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत होता; पण आजच्या घडीला कापसाचे चढलेले भाव चक्क चार हजारांनी उतरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खरीप हंगामामध्ये मुख्य पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, तूर, धान पिकांसोबत कापूस पिकांची बहुतांश शेतकरी लागवड करतात. कापूस पिकाला सहा महिन्याचा कालावधी असून उत्पादन क्षमता आता त्यात दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच उरत नाही आहे. 

कापूस पिकाला तीन वर्षांअगोदर नऊ हजारांपासून ते साडेअकरा हजार रुपयांपर्यंत चांगला भाव मिळत होता. भाव बऱ्यापैकी मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च निघून काही पैसे शेतकऱ्यांना शिल्लक राहत होते; पण मागील दोन वर्षांपासून कापसाच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. 

त्यामुळे आता दिवसेंदिवस कापूस पिकाची शेती ही तोट्यात जात आहे. कापूस पिकाला ७५२१ रुपये शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांचा कापूस या हमीभावाने घेतल्याचे दिसून आले नाही. सात हजार रुपयांपासून बाजार मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. 

एवढ्या भावामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे समोरील हंगामासाठी पैशाची तरतूद कुठून करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. 

"शासनाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. उलट शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही; पण कापसाचा ११ हजार रुपयांवर गेलेला भाव आज सात हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे." -पद्माकर देरकर, शेतकरी, पळसगाव

"एक एकरमध्ये १६ हजार रुपयांचे सोयाबीन झाले. त्यात २० हजारांचा खर्च आला. सोयाबीनला जर सात हजार रुपये हमीभाव असता तर किमान खर्च तरी माझा निघाला असता." - सूरज पोतराजे, शेतकरी, पळसगाव.

शेतकरी धोरणात हवाय बदल मागील दहा वर्षांच्या काळात शेतमालाच्या हमीभावात शासनाने भाववाढ केली असली, तरीही भाववाढ उत्पादनखचर्चापेक्षा कमीच आहे. खासगी बाजारात मालाचे भाव हमीभावापेक्षा कमीच राहत आहेत. त्यावर शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. शेतमालाचे भाव आणि इतर वस्तूंची झालेली भाववाढ यामध्ये कमालीची तफावत आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात काळोख दिवसेंदिवस निर्माण होत आहे. मागील दहा वर्षांच्या काळात ज्याप्रमाणे खताचे भाव वाढले, त्याच तुलनेत जर शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाचे भाव जर वाढवून दिले तरच शेतकरी आर्थिक सक्षम होईल.

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर