शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या अडीचशेच्या घरात

By राजेश भोजेकर | Updated: April 19, 2023 18:11 IST

मानव-वन्यजीव संघर्षही वाढला

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळेचंद्रपूर जिल्ह्याची ख्याती दिवसागणिक वाढतच आहे. यात नव्याने भर पडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या ४४६ असून पैकी २५० च्या घरात वाघांची संख्या एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ही बाब चंद्रपूरसाठी अभिमानाची असली तरी मानव-वन्यजीव संघर्षही वाढला आहे. यावर शासनाने अदृश्य भिंतीचा प्रयोग पुढे आणला आहे.

महाराष्ट्रात ४४६ वाघांची नोंद घेण्यात आली आहे. विदर्भात वाघांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये सर्वाधिक २०६ ते २४८ वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने गणना केलेली आकडेवारी नुकतीच पंतप्रधानांनी जाहीर केली. यानुसार देशात ३ हजार १६७ वाघ असल्याचे जाहीर केले आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ असल्याच्या नोंदी आहेत. महाराष्ट्रात तब्बल ४४६ वाघ असल्याची नोंद घेण्यात आली आहे. या वाघांपैकी तब्बल २०६ ते २४८ वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८७ ते ९१ ब्रम्हपुरी वनविभागात ५३ ते ६६, मध्य चांदा वनविभागात १०, वरोरा-भद्रावती वनक्षेत्रात १३, राजुरा विभागात २, कन्हाळगाव अभयारण्यात १३ ते २३, जुनोना वनक्षेत्रात वाघांची संख्या २६ ते ४३ आहेत.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ६२५ चौ कि.मी. वनक्षेत्रात पसरलेला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघासाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास आहे. वाघाच्या शिकारीसाठी मोठ्या संख्येने तृष्णभक्षक प्राणी ताडोबात आहे. यामुळेच एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८७ ते ९१ वाघ आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील उष्ण वातावरणामुळे प्रजनन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.

वाघांच्या झुंजीही वाढल्या

मानव-वन्यजीव संघर्षासोबतच वाघांच्या झुंजीत वाढ झाली आहे. वाघांची पाहिजे तेवढे अधिवास क्षेत्र नसल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढले आहे. शिवाय दोन वाघाच्या झुंजीही वाढल्या आहे. यामध्ये वाघांचे मृत्यूही होत आहे. अलीकडेच ताडोबाच्या बफरमध्ये येत असलेल्या चंद्रपूर वनपरिक्षेत्रात झुंजीत दोनही वाघांचा मृत्यू झाला. तर मागील वर्षी ५२ आणि यावर्षी ७ जणांचा  वाघाने बळी घेतल्याच्या घटना घडल्या आहे.

टॅग्स :TigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पchandrapur-acचंद्रपूर