शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मूळगावी पोहोचल्याचा आनंद शब्दातीत; युक्रेनमधून परतलेला हर्षल आनंदाने गहिवरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 21:33 IST

Chandrapur News रशियाच्या संघर्षानंतर अनेक अडचणींना तोंड देत बुधवारी (दि. २) सकाळी मूळगावी सुखरूप पोहोचलो. याचा अतिशय आनंद होत आहे अशी भावना हर्षल ठवरे या विद्यार्थ्याने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

ठळक मुद्देचिंतेने उडाला होता थरकाप : आदिती सायरे

चंद्रपूर : युक्रेन - रशियाच्या संघर्षानंतर अनेक अडचणींना तोंड देत बुधवारी (दि. २) सकाळी मूळगावी सुखरूप पोहोचलो. याचा अतिशय आनंद होत आहे. मात्र, माझे रूममेट तेथेच अडकल्याचे दुःखही आहे, अशी भावना हर्षल ठवरे या विद्यार्थ्याने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षासाठी हर्षल टर्नोफिल शहरात होता. त्याने आधीच १० मार्चला मूळगावी परतण्याची तयारी केली होती, विमानाचे तिकीटपण काढले. मात्र, २४ फेब्रुवारीला कीव्ह शहरावर रशियाने हल्ला केल्याचा संदेश आला. रात्री खिडकी, दरवाजे बंद करून बेसमेंटमध्ये राहण्याच्या सूचना मिळाल्या. २५ फेब्रुवारीला बॅग भरून पोलंडला नेऊ असे सांगितले; पण विद्यार्थी जास्त असल्याने २६ तारखेला रोमोनिया देशाच्या बॉर्डरवर नेण्यात आले. यासाठी चार तास रांगेत अन्न, पाण्याविना राहावे लागले. रात्री १२.३० वाजता बॉर्डर पार करून रोमाेनियात गेलो. सीमेपार भारतीय दूतावासाने व्यवस्था केली आणि २७ फेब्रुवारीला दिल्लीत पोहोचल्याचे हर्षलने सांगितले.

मनाचा थरकाप उडत होता

 कुठेही बॉम्बस्फोट होत होते. मनात भीती निर्माण झाली. आता भारतात परत कसे जायचे, या चिंतेने मनाचा थरकाप उडत होता. एकामागून एक होणाऱ्या बॉम्बस्फोटाचे आवाज अजूनही कानात गुंजत आहेत, अशी आपबिती युक्रेनवरून परतलेल्या वरोरा येथील आदिती सायरे हिने सांगितली. आदिती अनंत सायरे ही युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. खारकीव्हमध्ये रशियन सैन्याने बॉम्ब टाकल्याची वार्ता कानावर पडली आणि भीती वाटायला लागली. त्याच रात्री एवनोचे विमानतळ रशियन सैन्याने बेचिराख केले. त्यामुळे आता बाहेर कसे पडावे, याची काळजी वाटायला लागली. भारतीय दूतावासाच्या सांगण्यावरून रोमानियात पोहोचलो. तेथील नागरिकांनी आमची केलेली व्यवस्था व मदत ही शब्दात सांगू शकत नाही, असेही ती म्हणाली.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया