शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हिरवा चारा पुरात झाला नष्ट, कोरडा चारा केव्हाच संपला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील मोठ्या नद्या असलेल्या वर्धा, वैनगंगा यासह इरई, झरपट नदी  नाल्यांना दोन ते तीन वेळा पूर  आला. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. पुराच्या पाण्यामध्ये पिकांचे नुकसान झाले. यासोबतच हिरवा चारा सडला, त्यामुळे सध्या पूरग्रस्त गावांतील नागरिकांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पडला आहे.  शेतातील पीकही वाया गेले असून दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासात्री मात्र किमान एक ते दीड महिना वाट बघावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडविली आहे.  नदी-नाल्यांना पूर आला असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. यातच आता चारा टंचाईला जिल्ह्यातील विशेषत: भद्रावती, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. मुक्या जनावरांना जगवायचे तरी कसे, अशी चिंता त्यांना सतावत आहे.जिल्ह्यातील मोठ्या नद्या असलेल्या वर्धा, वैनगंगा यासह इरई, झरपट नदी  नाल्यांना दोन ते तीन वेळा पूर  आला. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. पुराच्या पाण्यामध्ये पिकांचे नुकसान झाले. यासोबतच हिरवा चारा सडला, त्यामुळे सध्या पूरग्रस्त गावांतील नागरिकांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पडला आहे.  शेतातील पीकही वाया गेले असून दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासात्री मात्र किमान एक ते दीड महिना वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देऊन जनावरांच्या चाऱ्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी  आहे.  

जनावरांना जगवण्याचा प्रश्नपूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांना जनावरांना जगविणे कठीण झाले आहे. कोरडा चारा पावसाच्या दिवसामध्ये संपला असून, पूर आल्यामुळे शेतातील हिरवा चारा नष्ट झाला आहे. त्यामुळे जनावरांना जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आता पूर ओसरला आहे. मात्र, चिखलामुळे शेतात जाणे कठीण झाले आहे.

सर्वत्र राखेचा थरकाही वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात शेती आली तरीही शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होत नव्हते. शेतामध्ये नदीतील पाण्यासोबत वाहून आलेल्या मातीमुळे शेती सुपीक होत होती. यावर्षी मात्र विशेषत: भद्रावती तालुक्यात पुराच्या पाण्यामध्ये राख आल्याने शेतामध्ये सर्वत्र राख पसरली आहे. यामुळे शेती नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुटार संपलेबहुतांश शेतकरी पावसाची सोय म्हणून कुटार भरून ठेवतात. यावर्षी  सतत कोसळलेल्या पावसामुळे जनावरांना घरीच बांधून ठेवावे लागले. यामध्ये कोरडा चारा संपला आहे. 

गवत सडून झाले नष्ट शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे गवत सडून नष्ट झाले आहे. दुसरीकडे शेत परिसरात सर्वत्र चिखल असल्याने जनावरांना शेतात नेतासुद्धा येत नसल्याची स्थिती आहे.

पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांना चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुक्या जनावरांना कसे जगवायचे, हा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत करून धीर देण्याची गरज आहे. - संदीप खुटेमाटेअध्यक्ष, अन्नदाता एकता मंच

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर