शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

हिरवा चारा पुरात झाला नष्ट, कोरडा चारा केव्हाच संपला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील मोठ्या नद्या असलेल्या वर्धा, वैनगंगा यासह इरई, झरपट नदी  नाल्यांना दोन ते तीन वेळा पूर  आला. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. पुराच्या पाण्यामध्ये पिकांचे नुकसान झाले. यासोबतच हिरवा चारा सडला, त्यामुळे सध्या पूरग्रस्त गावांतील नागरिकांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पडला आहे.  शेतातील पीकही वाया गेले असून दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासात्री मात्र किमान एक ते दीड महिना वाट बघावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडविली आहे.  नदी-नाल्यांना पूर आला असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. यातच आता चारा टंचाईला जिल्ह्यातील विशेषत: भद्रावती, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. मुक्या जनावरांना जगवायचे तरी कसे, अशी चिंता त्यांना सतावत आहे.जिल्ह्यातील मोठ्या नद्या असलेल्या वर्धा, वैनगंगा यासह इरई, झरपट नदी  नाल्यांना दोन ते तीन वेळा पूर  आला. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. पुराच्या पाण्यामध्ये पिकांचे नुकसान झाले. यासोबतच हिरवा चारा सडला, त्यामुळे सध्या पूरग्रस्त गावांतील नागरिकांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पडला आहे.  शेतातील पीकही वाया गेले असून दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासात्री मात्र किमान एक ते दीड महिना वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देऊन जनावरांच्या चाऱ्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी  आहे.  

जनावरांना जगवण्याचा प्रश्नपूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांना जनावरांना जगविणे कठीण झाले आहे. कोरडा चारा पावसाच्या दिवसामध्ये संपला असून, पूर आल्यामुळे शेतातील हिरवा चारा नष्ट झाला आहे. त्यामुळे जनावरांना जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आता पूर ओसरला आहे. मात्र, चिखलामुळे शेतात जाणे कठीण झाले आहे.

सर्वत्र राखेचा थरकाही वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात शेती आली तरीही शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होत नव्हते. शेतामध्ये नदीतील पाण्यासोबत वाहून आलेल्या मातीमुळे शेती सुपीक होत होती. यावर्षी मात्र विशेषत: भद्रावती तालुक्यात पुराच्या पाण्यामध्ये राख आल्याने शेतामध्ये सर्वत्र राख पसरली आहे. यामुळे शेती नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुटार संपलेबहुतांश शेतकरी पावसाची सोय म्हणून कुटार भरून ठेवतात. यावर्षी  सतत कोसळलेल्या पावसामुळे जनावरांना घरीच बांधून ठेवावे लागले. यामध्ये कोरडा चारा संपला आहे. 

गवत सडून झाले नष्ट शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे गवत सडून नष्ट झाले आहे. दुसरीकडे शेत परिसरात सर्वत्र चिखल असल्याने जनावरांना शेतात नेतासुद्धा येत नसल्याची स्थिती आहे.

पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांना चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुक्या जनावरांना कसे जगवायचे, हा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत करून धीर देण्याची गरज आहे. - संदीप खुटेमाटेअध्यक्ष, अन्नदाता एकता मंच

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर