शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

चक्क लीजवर घेतलेला तलावच मासेमारांनी कोरडा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

ब्रह्मपुरी येथील देलनवाडी वाॅर्डातील तलाव (सर्व्हे नं. २७४)  सन २०१६ - १७  ते २०२० - २१ या कालावधीकरिता  अध्यक्ष, सचिव वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना मासेमारीकरिता वार्षिक चार हजार रुपयांत देण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे यावर्षीही मासेमारी करण्यात आली. तलावात किमान तीन फूट पाणी असावे, असे निर्देश असताना सदर संस्थेने अधिक उत्पन्न घेण्याच्या लालसेने चक्क मोटारपंप लावून संपूर्ण तलावातील पाणी बाहेर काढले.

दत्तात्रय दलाल/ अनुप पानतावणेलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी /अड्याळ : पंचायत समिती ब्रह्मपुरींतर्गत तालुक्यातील छोटे - मोठे तलाव मासेमारीकरिता विविध मच्छीमार सहकारी संस्थांना देण्यात येतात. काही अटी व शर्थींचे पालन या संस्थांना करावे लागते. मात्र, या नियमांना झुगारून येथील देलनवाडी वाॅर्डातील तलावातील पाणी मोटारपंप लावून आटविल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या भागात गुरेपालकांना जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी येथील देलनवाडी वाॅर्डातील तलाव (सर्व्हे नं. २७४)  सन २०१६ - १७  ते २०२० - २१ या कालावधीकरिता  अध्यक्ष, सचिव वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना मासेमारीकरिता वार्षिक चार हजार रुपयांत देण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे यावर्षीही मासेमारी करण्यात आली. तलावात किमान तीन फूट पाणी असावे, असे निर्देश असताना सदर संस्थेने अधिक उत्पन्न घेण्याच्या लालसेने चक्क मोटारपंप लावून संपूर्ण तलावातील पाणी बाहेर काढले. त्यामुळे हे तलाव पूर्णतः वाळले आहे. बाजूच्या परिसरात शेती असून या भागात गुरेढोरे चरतात. म्हशी, गायी व बकऱ्या या तलावातील पाणी पितात. त्यामुळे येथील पाणी गुरांना पिण्यासाठी उपयुक्त होते. मात्र, सदर संस्थेने तलावातील संपूर्ण पाणी मोटारपंप लावून बाहेर काढले. त्यामुळे संपूर्ण तलाव आटले आहे.  लगतच्या परिसरातील विहिरी व हातपंपाच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. भर उन्हाळ्यात या भागात पाण्याची भीषण समस्या निर्माण होऊ शकते. पंचायत समितीने सदर संस्थेवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी आता केली आहे.

तालुक्यातील इतर लीजवरील तलावांचे काय ?सन २०२१ - २२  मध्ये तालुक्यातील  एकूण १२४  तलाव मासेमारीकरिता विविध संस्थांना लीजवर देण्यात आले आहेत. यातील ६७ तलावांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यातील किती तलावांमध्ये अटीनुसार पाणी शिल्लक आहे. ते पंचायत समितीने तपासणे गरजेचे आहे. अनेक तलावांत अधिक उत्पन्न कमाविण्याच्या  लालसेने संपूर्ण तलाव आटविण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर गुरांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. याकडे लक्ष देऊन तालुक्यातील तलावांची पाणी पातळी नियमानुसार कायम आहे काय, हे पं.स.ने तपासणे गरजेचे आहे.

पंचायत समितीमार्फत वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना सक्त ताकीद देऊन पत्र किंवा नोटीस देण्यात येईल. संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- डॉ. शिरीष रामटेके संवर्ग विकास अधिकारी ( प्रभारी ) पंचायत समिती, ब्रह्मपुरी.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प