शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

चक्क लीजवर घेतलेला तलावच मासेमारांनी कोरडा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

ब्रह्मपुरी येथील देलनवाडी वाॅर्डातील तलाव (सर्व्हे नं. २७४)  सन २०१६ - १७  ते २०२० - २१ या कालावधीकरिता  अध्यक्ष, सचिव वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना मासेमारीकरिता वार्षिक चार हजार रुपयांत देण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे यावर्षीही मासेमारी करण्यात आली. तलावात किमान तीन फूट पाणी असावे, असे निर्देश असताना सदर संस्थेने अधिक उत्पन्न घेण्याच्या लालसेने चक्क मोटारपंप लावून संपूर्ण तलावातील पाणी बाहेर काढले.

दत्तात्रय दलाल/ अनुप पानतावणेलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी /अड्याळ : पंचायत समिती ब्रह्मपुरींतर्गत तालुक्यातील छोटे - मोठे तलाव मासेमारीकरिता विविध मच्छीमार सहकारी संस्थांना देण्यात येतात. काही अटी व शर्थींचे पालन या संस्थांना करावे लागते. मात्र, या नियमांना झुगारून येथील देलनवाडी वाॅर्डातील तलावातील पाणी मोटारपंप लावून आटविल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या भागात गुरेपालकांना जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी येथील देलनवाडी वाॅर्डातील तलाव (सर्व्हे नं. २७४)  सन २०१६ - १७  ते २०२० - २१ या कालावधीकरिता  अध्यक्ष, सचिव वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना मासेमारीकरिता वार्षिक चार हजार रुपयांत देण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे यावर्षीही मासेमारी करण्यात आली. तलावात किमान तीन फूट पाणी असावे, असे निर्देश असताना सदर संस्थेने अधिक उत्पन्न घेण्याच्या लालसेने चक्क मोटारपंप लावून संपूर्ण तलावातील पाणी बाहेर काढले. त्यामुळे हे तलाव पूर्णतः वाळले आहे. बाजूच्या परिसरात शेती असून या भागात गुरेढोरे चरतात. म्हशी, गायी व बकऱ्या या तलावातील पाणी पितात. त्यामुळे येथील पाणी गुरांना पिण्यासाठी उपयुक्त होते. मात्र, सदर संस्थेने तलावातील संपूर्ण पाणी मोटारपंप लावून बाहेर काढले. त्यामुळे संपूर्ण तलाव आटले आहे.  लगतच्या परिसरातील विहिरी व हातपंपाच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. भर उन्हाळ्यात या भागात पाण्याची भीषण समस्या निर्माण होऊ शकते. पंचायत समितीने सदर संस्थेवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी आता केली आहे.

तालुक्यातील इतर लीजवरील तलावांचे काय ?सन २०२१ - २२  मध्ये तालुक्यातील  एकूण १२४  तलाव मासेमारीकरिता विविध संस्थांना लीजवर देण्यात आले आहेत. यातील ६७ तलावांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यातील किती तलावांमध्ये अटीनुसार पाणी शिल्लक आहे. ते पंचायत समितीने तपासणे गरजेचे आहे. अनेक तलावांत अधिक उत्पन्न कमाविण्याच्या  लालसेने संपूर्ण तलाव आटविण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर गुरांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. याकडे लक्ष देऊन तालुक्यातील तलावांची पाणी पातळी नियमानुसार कायम आहे काय, हे पं.स.ने तपासणे गरजेचे आहे.

पंचायत समितीमार्फत वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना सक्त ताकीद देऊन पत्र किंवा नोटीस देण्यात येईल. संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- डॉ. शिरीष रामटेके संवर्ग विकास अधिकारी ( प्रभारी ) पंचायत समिती, ब्रह्मपुरी.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प