शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘त्या’ मुलांच्या सामूहिक अंत्यविधीला संपूर्ण गाव खिन्न मनाने एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 14:29 IST

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लावली हजेरी

बाबूराव बोंडे

तोहोगाव (चंद्रपूर) : वर्धा नदीच्या पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांवर सामूहिक अंत्यविधी नलफळी घाटावर करण्यात आला. या अंत्यविधीसाठी संपूर्ण गावकरी उपस्थित होते. सोबतच कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड, संवर्ग विकास अधिकारी शालिक माउलीकर, तोहोगाव शाळेतील संपूर्ण शिक्षक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सर्वच उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले होते.

शवविच्छेदन करून मृतदेह गावात येताच पाहण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले. कुटुंब, नातेवाइकांनी तर हंबरडाच फोडला. यावेळी उपस्थित गावकऱ्यांचेही अश्रू अनावर झाले होते. तोहोगावपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वर्धा नदीच्या सिंधी घाटावर, तोहोगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारे चार विद्यार्थी शनिवारी सकाळची शाळा आटोपून खेकडे पकडण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न समजल्याने ते वर्धा नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला.

अन् त्या पोलिसांनी घेतली होती नदीत उडी

पोलिस हा जनतेचा सेवक आणि मित्र असल्याचे विधान प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये दर्शनी भागातील फलकावर असले तरी या विधानाला प्रत्यक्षात साकारण्याचे काम कोठारी पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांनी करून दाखविले. राजू राजूरकर व सचिन पोहणकर अशी त्यांची नावे आहेत. दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या सिंधी घाटावर तीन शाळकरी विद्यार्थी बुडाल्याची माहिती कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड यांना प्राप्त होताच ते पोलिस सहकाऱ्यांसह सिंधी घाटावर पोहोचले. तहसीलदार व आपत्कालीन शोध चमूंना माहिती दिली. मात्र, चंद्रपूरवरून शोध पथक येण्यास विलंब लागत होता. सोबत नावही नव्हती. मात्र, मुलांना शोधण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता दुथडी भरलेल्या नदीत राजू राजूरकर व सचिन पोहणकर या पोलिसांनी थेट उडी घेतली. तब्बल अर्धा किलोमीटरचा परिसर पिंजून काढला.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर