शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलांच्या सामूहिक अंत्यविधीला संपूर्ण गाव खिन्न मनाने एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 14:29 IST

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लावली हजेरी

बाबूराव बोंडे

तोहोगाव (चंद्रपूर) : वर्धा नदीच्या पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांवर सामूहिक अंत्यविधी नलफळी घाटावर करण्यात आला. या अंत्यविधीसाठी संपूर्ण गावकरी उपस्थित होते. सोबतच कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड, संवर्ग विकास अधिकारी शालिक माउलीकर, तोहोगाव शाळेतील संपूर्ण शिक्षक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सर्वच उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले होते.

शवविच्छेदन करून मृतदेह गावात येताच पाहण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले. कुटुंब, नातेवाइकांनी तर हंबरडाच फोडला. यावेळी उपस्थित गावकऱ्यांचेही अश्रू अनावर झाले होते. तोहोगावपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वर्धा नदीच्या सिंधी घाटावर, तोहोगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारे चार विद्यार्थी शनिवारी सकाळची शाळा आटोपून खेकडे पकडण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न समजल्याने ते वर्धा नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला.

अन् त्या पोलिसांनी घेतली होती नदीत उडी

पोलिस हा जनतेचा सेवक आणि मित्र असल्याचे विधान प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये दर्शनी भागातील फलकावर असले तरी या विधानाला प्रत्यक्षात साकारण्याचे काम कोठारी पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांनी करून दाखविले. राजू राजूरकर व सचिन पोहणकर अशी त्यांची नावे आहेत. दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या सिंधी घाटावर तीन शाळकरी विद्यार्थी बुडाल्याची माहिती कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड यांना प्राप्त होताच ते पोलिस सहकाऱ्यांसह सिंधी घाटावर पोहोचले. तहसीलदार व आपत्कालीन शोध चमूंना माहिती दिली. मात्र, चंद्रपूरवरून शोध पथक येण्यास विलंब लागत होता. सोबत नावही नव्हती. मात्र, मुलांना शोधण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता दुथडी भरलेल्या नदीत राजू राजूरकर व सचिन पोहणकर या पोलिसांनी थेट उडी घेतली. तब्बल अर्धा किलोमीटरचा परिसर पिंजून काढला.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर