शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

अटीतटीच्या लढतीत ठरले ५८ गावांचे उपकर्णधार; नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 14:53 IST

बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत उपसरपंचपद अविरोध

चंद्रपूर : यंदा पहिल्यांदाच सरपंचपदाच्या थेट निवडीनंतर जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी बुधवारी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. निकालानंतर समर्थकांनी ढोल ताश्यांच्या गजरात जोरदार जल्लोष साजरा केला. या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविली जात नसली तरी आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी झाल्याचे दावे-प्रतिदावे भाजप, काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना (ठाकरे), वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत.

ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. या निवडणुकीत प्रथमच सरपंचाची थेट निवडणूक झाली. उपसरपंचपदासाठी सरपंचांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. सरपंचपदानंतरचे दुसरे महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यामुळे गावातील राजकारण चांगलेच तापले होते. गटबाजी उफाळून येऊ नये, कोणत्याही परिस्थितीत आपल्या समर्थकांची उपसरपंचपदी वर्णी लागावी, यासाठी राजकीय पक्षांच्या पाठबळाने ग्रामपंचायत सदस्य पर्यटनाला गेले होते. आज बुधवारी हे सर्व सदस्य ऐन मतदानाच्या वेळी गावात हजर झाले. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी संवेदनशील गावांमध्ये पोलिसांनी चोख बंदाेबस्त ठेवला होता. निकालानंतर समर्थकांनी ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोष साजरा केला.

सरपंचपद काँग्रेसकडे तर उपसरपंचद भाजपकडे

यंदा सरपंचपदाची थेट निवडणूक झाल्याने सरपंच व सदस्य वेगवेगळ्या पक्षांचे समर्थक असल्याचे पुढे आले. सरकारच्या निर्णयामुळे सरपंचाला विकासकामे करताना अडचणी येतील, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच काही ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंचपदी भाजपचे समर्थक असताना तिथे उपसरपंचपद काँग्रेसकडे गेले. काही ठिकाणी सरपंच काँग्रेसचा असताना उपसरपंचपद भाजपकडे गेल्याने ग्रामपंचायतींचा कारभार व्यवस्थित चालणार काय, असा प्रश्न युवकांकडून विचारला जात आहे.

सरपंचांनी केले मतदान

ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले होते. दोन उमेदवारांना उपसरपंचपदासाठी समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क होता. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सरंपचांना हा हक्क बजावल्याची माहिती आहे.

निवडणूक सभा तहकुबीचा प्रसंगच आला नाही

उपसरपंचपदाची निवडणूक सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेणे कायद्याने बंधनकारक होते. त्यामुळे निवडणुकीचे अध्यक्षस्थान भूषवून कार्यवाही करणे हे सरपंचाच्या कर्तव्याचा भाग आहे. निवडणुकीची सभा तहकूब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार ती सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या होत्या. जिल्ह्यात तहकुबीचा प्रसंग कुठे घडला नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक