शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अटीतटीच्या लढतीत ठरले ५८ गावांचे उपकर्णधार; नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 14:53 IST

बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत उपसरपंचपद अविरोध

चंद्रपूर : यंदा पहिल्यांदाच सरपंचपदाच्या थेट निवडीनंतर जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी बुधवारी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. निकालानंतर समर्थकांनी ढोल ताश्यांच्या गजरात जोरदार जल्लोष साजरा केला. या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविली जात नसली तरी आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी झाल्याचे दावे-प्रतिदावे भाजप, काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना (ठाकरे), वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत.

ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. या निवडणुकीत प्रथमच सरपंचाची थेट निवडणूक झाली. उपसरपंचपदासाठी सरपंचांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. सरपंचपदानंतरचे दुसरे महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यामुळे गावातील राजकारण चांगलेच तापले होते. गटबाजी उफाळून येऊ नये, कोणत्याही परिस्थितीत आपल्या समर्थकांची उपसरपंचपदी वर्णी लागावी, यासाठी राजकीय पक्षांच्या पाठबळाने ग्रामपंचायत सदस्य पर्यटनाला गेले होते. आज बुधवारी हे सर्व सदस्य ऐन मतदानाच्या वेळी गावात हजर झाले. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी संवेदनशील गावांमध्ये पोलिसांनी चोख बंदाेबस्त ठेवला होता. निकालानंतर समर्थकांनी ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोष साजरा केला.

सरपंचपद काँग्रेसकडे तर उपसरपंचद भाजपकडे

यंदा सरपंचपदाची थेट निवडणूक झाल्याने सरपंच व सदस्य वेगवेगळ्या पक्षांचे समर्थक असल्याचे पुढे आले. सरकारच्या निर्णयामुळे सरपंचाला विकासकामे करताना अडचणी येतील, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच काही ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंचपदी भाजपचे समर्थक असताना तिथे उपसरपंचपद काँग्रेसकडे गेले. काही ठिकाणी सरपंच काँग्रेसचा असताना उपसरपंचपद भाजपकडे गेल्याने ग्रामपंचायतींचा कारभार व्यवस्थित चालणार काय, असा प्रश्न युवकांकडून विचारला जात आहे.

सरपंचांनी केले मतदान

ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले होते. दोन उमेदवारांना उपसरपंचपदासाठी समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क होता. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सरंपचांना हा हक्क बजावल्याची माहिती आहे.

निवडणूक सभा तहकुबीचा प्रसंगच आला नाही

उपसरपंचपदाची निवडणूक सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेणे कायद्याने बंधनकारक होते. त्यामुळे निवडणुकीचे अध्यक्षस्थान भूषवून कार्यवाही करणे हे सरपंचाच्या कर्तव्याचा भाग आहे. निवडणुकीची सभा तहकूब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार ती सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या होत्या. जिल्ह्यात तहकुबीचा प्रसंग कुठे घडला नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक