शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणचा दिलासा, मध्य रेल्वेला अजूनही जाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारशा-मुंबई सेवाग्राम ही जिल्ह्यातील प्रवाशांसाठी हक्काची असलेली एक्स्प्रेस कोरोना संकट काळात बंद करण्यात आली. ती अजूनही बंदच आहे. ही ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा साकडे घातले. मात्र मध्य रेल्वेने अजूनही ती सुरू केली नाही. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेने प्रवासांना दिलासा देत मुंबईसाठी समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र तिला दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे. एवढेच नाही तर २८ मे ते २५ जूनपर्यंत केवळ पाच दिवसच ती चालणार आहे.बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. त्यामुळे बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम ही एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला. दरम्यान, मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी नुकतीच बल्लारशाह, चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशनची पाहणीही केली आहे. विशेष म्हणजे, त्या पूर्वी बल्लारशा येथून मुंबईसाठी ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने हालचाली केल्या. एवढेच नाही तर या ट्रेनचा टाईमटेबलही तयार करण्यात येऊन ट्रेन सोडण्याचा दिवसही ठरला. मात्र ट्रेन कुठे गेली,याचा कुणालाच पत्ता लागला नाही. आता दक्षिण मध्य रेल्वेने समर ट्रेन सुरू केली. एका महिन्यामध्ये केवळ पाचवेळा ती चालणार आहे. त्यातच ती आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाणार असल्याचे बराच वेळसुद्धा लागणार आहे.

आता आंदोलन हाच पर्पयाय

नुकतीच मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांनी बल्लारशा, चंद्रपूर येथे येऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील विविध रेल्वे संघटना, सामाजिक संस्थांनी निवेदन देत बल्लारशाह-मुंबई ही नियमित ट्रेन सुरू करण्याची मागणी लावून धरली. मात्र, अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ट्रेनसाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.-श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयुसीसी सदस्य, मध्य रेल्वे

दक्षिणाला जमलं ते मध्य रेल्वे का नाही दक्षिण मध्य रेल्वेने  कसाबसा प्रयत्न करून किमान  समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र मध्य रेल्वेला बल्लारशाह स्टेशनवरून अधिक उत्पन्न असतानाही येथून थेट मुंबईसाठी ट्रेन सुरूच करता आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे