शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणचा दिलासा, मध्य रेल्वेला अजूनही जाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारशा-मुंबई सेवाग्राम ही जिल्ह्यातील प्रवाशांसाठी हक्काची असलेली एक्स्प्रेस कोरोना संकट काळात बंद करण्यात आली. ती अजूनही बंदच आहे. ही ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा साकडे घातले. मात्र मध्य रेल्वेने अजूनही ती सुरू केली नाही. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेने प्रवासांना दिलासा देत मुंबईसाठी समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र तिला दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे. एवढेच नाही तर २८ मे ते २५ जूनपर्यंत केवळ पाच दिवसच ती चालणार आहे.बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. त्यामुळे बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम ही एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला. दरम्यान, मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी नुकतीच बल्लारशाह, चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशनची पाहणीही केली आहे. विशेष म्हणजे, त्या पूर्वी बल्लारशा येथून मुंबईसाठी ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने हालचाली केल्या. एवढेच नाही तर या ट्रेनचा टाईमटेबलही तयार करण्यात येऊन ट्रेन सोडण्याचा दिवसही ठरला. मात्र ट्रेन कुठे गेली,याचा कुणालाच पत्ता लागला नाही. आता दक्षिण मध्य रेल्वेने समर ट्रेन सुरू केली. एका महिन्यामध्ये केवळ पाचवेळा ती चालणार आहे. त्यातच ती आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाणार असल्याचे बराच वेळसुद्धा लागणार आहे.

आता आंदोलन हाच पर्पयाय

नुकतीच मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांनी बल्लारशा, चंद्रपूर येथे येऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील विविध रेल्वे संघटना, सामाजिक संस्थांनी निवेदन देत बल्लारशाह-मुंबई ही नियमित ट्रेन सुरू करण्याची मागणी लावून धरली. मात्र, अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ट्रेनसाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.-श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयुसीसी सदस्य, मध्य रेल्वे

दक्षिणाला जमलं ते मध्य रेल्वे का नाही दक्षिण मध्य रेल्वेने  कसाबसा प्रयत्न करून किमान  समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र मध्य रेल्वेला बल्लारशाह स्टेशनवरून अधिक उत्पन्न असतानाही येथून थेट मुंबईसाठी ट्रेन सुरूच करता आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे