शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

दक्षिणचा दिलासा, मध्य रेल्वेला अजूनही जाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारशा-मुंबई सेवाग्राम ही जिल्ह्यातील प्रवाशांसाठी हक्काची असलेली एक्स्प्रेस कोरोना संकट काळात बंद करण्यात आली. ती अजूनही बंदच आहे. ही ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा साकडे घातले. मात्र मध्य रेल्वेने अजूनही ती सुरू केली नाही. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेने प्रवासांना दिलासा देत मुंबईसाठी समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र तिला दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे. एवढेच नाही तर २८ मे ते २५ जूनपर्यंत केवळ पाच दिवसच ती चालणार आहे.बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. त्यामुळे बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम ही एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला. दरम्यान, मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी नुकतीच बल्लारशाह, चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशनची पाहणीही केली आहे. विशेष म्हणजे, त्या पूर्वी बल्लारशा येथून मुंबईसाठी ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने हालचाली केल्या. एवढेच नाही तर या ट्रेनचा टाईमटेबलही तयार करण्यात येऊन ट्रेन सोडण्याचा दिवसही ठरला. मात्र ट्रेन कुठे गेली,याचा कुणालाच पत्ता लागला नाही. आता दक्षिण मध्य रेल्वेने समर ट्रेन सुरू केली. एका महिन्यामध्ये केवळ पाचवेळा ती चालणार आहे. त्यातच ती आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाणार असल्याचे बराच वेळसुद्धा लागणार आहे.

आता आंदोलन हाच पर्पयाय

नुकतीच मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांनी बल्लारशा, चंद्रपूर येथे येऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील विविध रेल्वे संघटना, सामाजिक संस्थांनी निवेदन देत बल्लारशाह-मुंबई ही नियमित ट्रेन सुरू करण्याची मागणी लावून धरली. मात्र, अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ट्रेनसाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.-श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयुसीसी सदस्य, मध्य रेल्वे

दक्षिणाला जमलं ते मध्य रेल्वे का नाही दक्षिण मध्य रेल्वेने  कसाबसा प्रयत्न करून किमान  समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र मध्य रेल्वेला बल्लारशाह स्टेशनवरून अधिक उत्पन्न असतानाही येथून थेट मुंबईसाठी ट्रेन सुरूच करता आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे