शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

२० दिवसांवर पोराचं लग्न आलं अन् बँकेतील रक्कमच झाली गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 07:00 IST

Chandrapur News चंदनखेडा येथील शेतकऱ्यांच्या दोन मुलांचे २० दिवसांवर लग्न येऊन ठेपले असून, त्यांच्या खात्यात दोन हजार शिल्लक ठेवून १५ लाख गहाळ करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनोरुग्णाचीही आरडीची रक्कम गहाळचंदनखेडा विदर्भ कोकण बँकेतील प्रकार

विनायक येसेकर

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून २६ खातेदारांच्या खात्यातून रक्कम गहाळ झाल्याचा प्रकार घडला. त्यात चंदनखेडा येथील शेतकऱ्यांच्या दोन मुलांचे २० दिवसांवर लग्न येऊन ठेपले असून, त्यांच्या खात्यात दोन हजार शिल्लक ठेवून १५ लाख गहाळ करण्यात आले आहे.

तसेच येथील शेतमजुराने आपल्या मनोरुग्ण मुलाच्या नावाने आरडी काढली. येथीलही रक्कम गहाळ झाली. या प्रकाराने येथील सर्वच खातेदार आता सतर्क झाले आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे चंदनखेडा येथील शेतकरी दादाजी कोकुडे यांनी लग्नासाठी १५ लाख २८ हजार २०० रुपये जमा केले होते. त्यांच्या दोन मुलांचे लग्न २० एप्रिलला आहे. या लग्नात कसा खर्च करायचा, याचे त्यांनी नियोजन केले होते. ते २७ मार्चला लग्नाच्या खरेदीकरिता रक्कम काढण्यासाठी गेले असता, त्यांच्या खात्यातील १५ लाख २८ हजार २०० रुपयांपैकी केवळ दोन हजार शिल्लक असल्याचे बँकेकडून सांगण्यात आल्याने त्यांना धक्काच बसला. आपली रक्कम गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शेतमजुराची रक्कमही गायब

येथील दत्तुजी मुडेवार हे शेतमजूर आहेत. ते मिळेल तिथे रोजीने काम करतात. त्यांना चरणदास नावाचा गतिमंद मुलगा आहे. त्यांच्या भविष्यासाठी काही तरी करावे, यासाठी त्यांनी तीन वर्षांसाठी आरडी काढली व महिन्याला एक हजार रुपये भरत होते. मार्च महिन्यात तीन वर्षे पूर्ण होणार होते. या बँकेचा प्रकार बघता त्यांनीसुद्धा बँकेत चौकशी केली असता, त्यांच्या खात्यात ३६ हजार जमा व्हायला पाहिजे; परंतु आठ हजार शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. बँकेतील खातेदारांची एकच गर्दी होत असून, आमची रक्कम खात्यात आहे की नाही, याबाबत खातेदार शहानिशा करत आहे. दररोज पाच ते सहा प्रकरणे समोर येत असल्याने विदर्भ बँकेतून तब्बल करोडो रुपये गहाळ झाल्याची चर्चा गावात आहे.

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची रक्कम गहाळ होण्याचा प्रकार दररोज वाढत असून, आतापर्यंत ३० ग्राहकांचे अर्ज माझ्याकडे आले आहे. या प्रकाराबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह ठाणेदार तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या शेतकरी, शेतमजुरांची रक्कम परत त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा बँकेच्या विरोधात जनआंदोलन उभारू.

-सुधीर मुडेवार सामाजिक कार्यकर्ते चंदनखेडा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी