शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

गटारे, नाल्यांची थातूरमातूर स्वच्छता

By admin | Updated: May 11, 2014 23:26 IST

चंद्रपूरकरांना ‘स्वच्छ चंद्रपूर आणि सुंदर चंद्रपूर’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सत्तारूढ काँग्रेसचे शहराच्या विकासाकडे पाहिजे तसे लक्ष नाही.

चंद्रपूर : चंद्रपूरकरांना ‘स्वच्छ चंद्रपूर आणि सुंदर चंद्रपूर’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सत्तारूढ काँग्रेसचे शहराच्या विकासाकडे पाहिजे तसे लक्ष नाही. प्रशासनाचे तर केवळ दुर्लक्षच होत आहे. शहरात सध्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील नाल्या, गटारी ठिकठिकाणी कचरा, प्लास्टिकने तुंबल्या असून रस्त्यावरही घणकचर्‍याचे ढिगारेच बघायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मनपाने गटारांची थातूरमातूर स्वच्छता करीत केवळ देखावा केला. अडीच वर्षापूर्वी चंद्रपूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर चंद्रपूरकरांनी शहराच्या विकासाचे स्वप्न पाहणे सुरू केले. मनपा अस्तित्वात आल्यानंतर सहा महिन्यानंतर मनपासाठी पहिली निवडणूक झाली. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी चंद्रपूरकरांना विकासाचे गाजर दाखवून मताचा जोगवा मागितला. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मात्र, विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास मागील दोन वर्षात सत्तारूढ काँग्रेस-शिवसेनेने चंद्रपूरकरांचा भ्रमनिरास केला आहे. सुरूवातीच्या काळात रस्त्याच्या समस्येने चंद्रपूरकर चांगलेच हैराण झाले होते. आधीच खराब असलेले रस्ते, भूमिगत गटार योजनेमुळे आणखीच खराब झाले. रस्त्यामुळे चंद्रपूरकरांची सर्वत्र ओरड सुरू होताच दीड वर्षानंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. मात्र, अजूनही शहरातील अनेक रस्त्यांची कामे शिल्लक असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील नाल्या, गटारीची भर पडत असून त्या ठिकठिकाणी तुंबल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एक महिन्यावर पावसाळा आला असताना मनपाने गटारे, नाल्या उपसण्याचे काम सुरू केले खरे; मात्र अगदी थातूरमातूर ही स्वच्छता दिसून येत आहे. ज्या ठिकाणाहून मोठे गटारे गेले आहेत. तिथे अनेकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे तिथे गाळ उपसलाच जाऊ शकत नाही. प्रत्येक वॉर्डात नाल्या, गटारी तुंबल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मोठी गटारे प्लास्टिक, कचर्‍याने तुंबले आहेत. पर्यायाने सांडपाणीच वाहून जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. मात्र, मनपाला, याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने अस्वच्छतेकडे किमान नगरसेवक, पदाधिकारी तरी लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गंजवॉर्डात अस्वच्छतेची समस्या गंभीर असून नाल्यांची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाई झाली नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. आंबेडकर पुतळ्यापासून तर बिनबा गेटकडे जाणार्‍या मार्गावर हॉटेल मीडटॉऊनजवळ असलेल्या मोठ्या नाल्यामध्ये कचर्‍याचे मोठे ढिगारेच बघायला मिळतात. नाल्याच्या चोकअपमुळे मागील काही वर्षांपासून मोठा पाऊस पडला की शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत आहे. आझाद बाग, गिरनार चौक येथे दरवर्षीच अशी परिस्थिती बघायला मिळते. शहरातही काही ठिकाणी अशीच स्थिती असून याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)