शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

गटारे, नाल्यांची थातूरमातूर स्वच्छता

By admin | Updated: May 11, 2014 23:26 IST

चंद्रपूरकरांना ‘स्वच्छ चंद्रपूर आणि सुंदर चंद्रपूर’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सत्तारूढ काँग्रेसचे शहराच्या विकासाकडे पाहिजे तसे लक्ष नाही.

चंद्रपूर : चंद्रपूरकरांना ‘स्वच्छ चंद्रपूर आणि सुंदर चंद्रपूर’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सत्तारूढ काँग्रेसचे शहराच्या विकासाकडे पाहिजे तसे लक्ष नाही. प्रशासनाचे तर केवळ दुर्लक्षच होत आहे. शहरात सध्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील नाल्या, गटारी ठिकठिकाणी कचरा, प्लास्टिकने तुंबल्या असून रस्त्यावरही घणकचर्‍याचे ढिगारेच बघायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मनपाने गटारांची थातूरमातूर स्वच्छता करीत केवळ देखावा केला. अडीच वर्षापूर्वी चंद्रपूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर चंद्रपूरकरांनी शहराच्या विकासाचे स्वप्न पाहणे सुरू केले. मनपा अस्तित्वात आल्यानंतर सहा महिन्यानंतर मनपासाठी पहिली निवडणूक झाली. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी चंद्रपूरकरांना विकासाचे गाजर दाखवून मताचा जोगवा मागितला. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मात्र, विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास मागील दोन वर्षात सत्तारूढ काँग्रेस-शिवसेनेने चंद्रपूरकरांचा भ्रमनिरास केला आहे. सुरूवातीच्या काळात रस्त्याच्या समस्येने चंद्रपूरकर चांगलेच हैराण झाले होते. आधीच खराब असलेले रस्ते, भूमिगत गटार योजनेमुळे आणखीच खराब झाले. रस्त्यामुळे चंद्रपूरकरांची सर्वत्र ओरड सुरू होताच दीड वर्षानंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. मात्र, अजूनही शहरातील अनेक रस्त्यांची कामे शिल्लक असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील नाल्या, गटारीची भर पडत असून त्या ठिकठिकाणी तुंबल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एक महिन्यावर पावसाळा आला असताना मनपाने गटारे, नाल्या उपसण्याचे काम सुरू केले खरे; मात्र अगदी थातूरमातूर ही स्वच्छता दिसून येत आहे. ज्या ठिकाणाहून मोठे गटारे गेले आहेत. तिथे अनेकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे तिथे गाळ उपसलाच जाऊ शकत नाही. प्रत्येक वॉर्डात नाल्या, गटारी तुंबल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मोठी गटारे प्लास्टिक, कचर्‍याने तुंबले आहेत. पर्यायाने सांडपाणीच वाहून जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. मात्र, मनपाला, याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने अस्वच्छतेकडे किमान नगरसेवक, पदाधिकारी तरी लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गंजवॉर्डात अस्वच्छतेची समस्या गंभीर असून नाल्यांची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाई झाली नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. आंबेडकर पुतळ्यापासून तर बिनबा गेटकडे जाणार्‍या मार्गावर हॉटेल मीडटॉऊनजवळ असलेल्या मोठ्या नाल्यामध्ये कचर्‍याचे मोठे ढिगारेच बघायला मिळतात. नाल्याच्या चोकअपमुळे मागील काही वर्षांपासून मोठा पाऊस पडला की शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत आहे. आझाद बाग, गिरनार चौक येथे दरवर्षीच अशी परिस्थिती बघायला मिळते. शहरातही काही ठिकाणी अशीच स्थिती असून याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)