शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:45 IST

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यातील दृष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई व त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना लक्षात घेता सदर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढविण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात राज्यातील जि.प. अध्यक्ष व सभापतींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

ठळक मुद्देविद्यमान पदाधिकाऱ्यांना दिलासा : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यातील दृष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई व त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना लक्षात घेता सदर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढविण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात राज्यातील जि.प. अध्यक्ष व सभापतींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सदर मागणी तत्वत: मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत सदर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागणीचे निवेदन सादर केले. या मागणी विषयीची भूमिका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विषद केली. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी तत्वत: मान्य करत लवकरच आदेश निर्गमित करु असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात वर्धा जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, नागपूर जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, गडचिरोली जि. प. अध्यक्ष संगिता भांडेकर, जळगांव जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, औरंगाबाद जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगांवकर आदींची उपस्थिती होती.