शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

चर्चेविनाच आयुक्तांनी काढल्या निविदा

By admin | Updated: September 13, 2014 01:16 IST

मनपाच्या सर्वसाधारण सभेत विषय चर्चेला येण्यापुर्वीच मनपा आयुक्तांनी कामाच्या निवीदा काढल्या.

चंद्रपूर : मनपाच्या सर्वसाधारण सभेत विषय चर्चेला येण्यापुर्वीच मनपा आयुक्तांनी कामाच्या निवीदा काढल्या. आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन सोयीच्या एजन्सींना काम देत असल्याचा आरोप संजय अनेजा यांनी केला आहे. आयुक्तांनी काढलेल्या निवीदा रद्द न झाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. संजय अनेजा यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, सहा सप्टेंबरला चंद्रपूर मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेत प्रस्ताव क्रमांक ७७ वर तज्ञ सल्लागारांशी रस्ता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, घनकचरा, व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार करणे, शासन स्तरावर मान्यता घेणे याबाबत निर्णय घेण्याचा विषय ठेवण्यात आला होता. मात्र, सभेत विषय चर्चेला येण्यापुर्वी व विषय मंजूर होण्यापुर्वीच मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी आपल्या अधिकाराचे हणन करीत नागपूरच्या विभागीय वृत्तपत्रात चंद्रपूर महानगरपालिकेकरीता तज्ञ सल्लागाराचे पॅनल नियुक्त करण्याच्या मथळ््याखाली रस्ता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, घनकचरा या विषयावर तज्ञ सल्लागाराची समिती नेमण्याकरीता जाहिरात देऊन सभेच्या एक दिवसांपुर्वीच प्रकाशित केली. आमसभेने त्यासाठी आवश्यक अनुभव, अनामत रक्कम इत्यादी निश्चीत केले नसताना त्यापुर्वीच अनुभवाच्या रकान्यात पात्रता दर्शविली आहे. या पात्रतेमध्ये कोणतीही विशेष बाब किंवा वाक्यातून अर्थबोध होत नसल्याचे अनेजा यांनी म्हटले आहे. एक कोटीच्या उलाढालीने पात्रता स्पष्ठ होत नाही आणि तांत्रिक मनुष्यबळ कोणत्या पध्दतीचे व किती हे जाहिरातीत नमूद नाही. ही जाहिरात भविष्यात आपल्या सोयीनुसार मंडळीला इंटरटेस्ट करण्यासाठी काढल्याचे म्हटले आहे. अनामत रक्कम २५ रोख १५ सप्टेंबरला ४ वाजेपर्यंत भरण्याची अट, कामाचा कालावधी इत्यादी गोष्टी आमसभेत ठरायला पाहिजे होत्या. जाहिरातीत कंत्राटदार नेमणूक सुध्दा ती एजन्सी करेल असे नमूद आहे. कंत्राटदाराशी करारनामा करणे, योग्य सक्षम कंत्राटदाराची नेमणूक प्रक्रिया पार पाडणे, करारनामे करणे, निकषाप्रमाणे काम करुन घेणे, कामाचे आवश्यक यंत्रणेमार्फत तपासणी करून प्रमाणपत्र देणे ही कामे नियामाप्रमाणे अधिकाऱ्यांना करायची आहेत. मात्र, अधिकाराचे हणन करुन आयुक्तांनी आमसभेपुर्वीच या बाबी जाहीर केली. यावर एका नगरसेवकाने लेखी आक्षेप नोंदविल्यानंतर आचारसंहिता लागणार असल्याने जाहिरात प्रकाशित केल्याचे सांगितले. आचारसंहितेचा बाऊ करत मनपा आयुक्तांनी आपल्या अधिकाराचे हणन केले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा विकास व समस्या निवारण समितीच्यावतीने याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष हरविंदरसिंह धुन्नाजी, सचिव संजय अनेजा, यशवंत दाचेवार, डॉ. पंदीलवार, महादेवराव लांडे, अ‍ॅड. आसिफ शेख, अरविंद मुच्चूलवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)