शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पतीविरुद्धच्या तक्रारीत सहा वर्षांत दहापट वाढ

By admin | Updated: September 28, 2016 00:48 IST

पुरुषांकडून महिलांवर अत्याचार होत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते.

 माहिती अधिकारात उघड : नवऱ्यांविरोधात ११ हजार १६० तक्रारीचंद्रपूर : पुरुषांकडून महिलांवर अत्याचार होत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. मात्र महिलाही पुरूषावर अत्याचार करतात, हे कुणीही समजून घ्यायला तयार दिसत नाही. महिलांकडूनही पुरुषावर शारिरीक, मानसिक व लैंगिक असे अत्याचार सतत घडत असून गेल्या सहा वर्षात अशाप्रकारच्या तक्रारीत तब्बल दहापट वाढ झाल्याचे सत्य माहिती अधिकारातून समोर आले आहे. भारतीय परिवार बचाव संघटनेने मागितलेल्या माहिती अधिकारतील माहितीत शासकीय माहिती अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) चंद्रपूर यांनी ही माहिती दिली आहे. विवाहित महिलांचे छळापासून रक्षण करण्यासाठी १९८० च्या दशकात ४९८ (अ) हुंडाबळी व २००५ मध्ये गृहहिंसाचार यासारखे कडक कायदे करण्यात आले. परिणामी २०१२ ते २०१६ या पाच वर्षात ११ हजार १६० च्यावर महिलांनी पुरुषांवर या कायद्यानुसार तक्रारी नोंदविल्या. एकीकडे या कायद्याने स्त्रीयांचे रक्षण होत असले तरी दुसरीकडे याच कायद्याचा शस्त्रप्रमाणे धाक दाखवून समाजातील असामाजिक तत्वाकडून गैरवापर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया असलेली आदर्श कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत असल्याचे दिसून येते.चंद्रपूर जिल्ह्यात हुंडाबळी व गृहहिंसाचार अंतर्गत पोलीस स्टेशन तथा महिला पोलीस तक्रार निवारण कक्षात २०१२ ते १२५१, २०१३ मध्ये २०८०, २०१४ मध्ये २९४४, २०१५ मध्ये २०३८ व २०१६ मध्ये १६६६ तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच गृह हिंसाचार प्रकरणी सन २०१२ मध्ये १२५, २०१३ मध्ये १७८, २०१४ मध्ये २०३, २०१५ मध्ये २०१, २०१६ मध्ये ७३ तक्रारी प्राप्त झाल्या. मागील सहा वर्षा अगोदर सन २००५ मध्ये ४०७, २००६ मध्ये ५०२, २००७ मध्ये ४०७, २००८ मध्ये १७०, २००९ मध्ये २४०, २०१० मध्ये ४७ अशा पुरुषविरोधी ११७३ तक्रारी होत्या. मात्र सहा वर्षात या तक्रारी १० पटीने वाढलेल्या आहेत. भारतात एक हजार विवाहामागे १३ घटस्फोट होत आहेत. सन २०१४-१५ मध्ये भारतात ४ लाख ५२ हजार ७४३ पुरुषांनी तर ९ लाख ९ हजार ५७३ स्त्रीयांनी घटस्फोट घेतला. म्हणजे एका वर्षात १३ लाख ६२ हजार ३१६ कुटुंबाने घटस्फोट घेतला आहे. पुरूषांवरिल तक्रारीचा आलेख असाच वाढत राहिला तर विवाह संस्थेवरचा विश्वास कायम राहणार नाही. त्यामुळे सदर कायद्याचा दुरुपयोग थांबवून कुटुंब वाचविण्याचे आवाहन भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, अ‍ॅड. प्रदीप क्षिरसागर, यशवंत वाघ, सुदर्शन नैताम, डॉ. राहूल विधाते, शितल साळवे, गोपी आक्केवार, डॉ. गुरूदेव गेडाम, मनोज तारे, दीपक पराते, किशोर जंपलवार, गंगाधर गुरनुले, संदिप आत्राम यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी) मोबाईलमुळे वाढलेपती-पत्नीत गैरसमजसध्याच्या युगात मोबाईलमुळे पती-पत्नीत गैरसमज वाढू लागले आहेत. कुटुंबावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी संकटमोचक म्हणून पती पत्नीच्या मागे उभा राहतो. मात्र त्याची संपत्ती आपल्या नावे करण्यासाठी तगादा लावणे, अनैतीक संबध ठेवणे, ज्या घरात माहेरच्या मंडळींची ढवळाढवळ असते, त्या घराच वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. गृहहिंसाचार ४९८ (अ) या कायद्याला सर्वोच्च न्यायालयानेही दहशतवाद असे संबोधले आहे. या कायद्याने एक सून घरातील दहा स्त्रीयांना वेठीस धरते, हा कुठला न्याय, असे भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले आहे.