शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पतीविरुद्धच्या तक्रारीत सहा वर्षांत दहापट वाढ

By admin | Updated: September 28, 2016 00:48 IST

पुरुषांकडून महिलांवर अत्याचार होत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते.

 माहिती अधिकारात उघड : नवऱ्यांविरोधात ११ हजार १६० तक्रारीचंद्रपूर : पुरुषांकडून महिलांवर अत्याचार होत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. मात्र महिलाही पुरूषावर अत्याचार करतात, हे कुणीही समजून घ्यायला तयार दिसत नाही. महिलांकडूनही पुरुषावर शारिरीक, मानसिक व लैंगिक असे अत्याचार सतत घडत असून गेल्या सहा वर्षात अशाप्रकारच्या तक्रारीत तब्बल दहापट वाढ झाल्याचे सत्य माहिती अधिकारातून समोर आले आहे. भारतीय परिवार बचाव संघटनेने मागितलेल्या माहिती अधिकारतील माहितीत शासकीय माहिती अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) चंद्रपूर यांनी ही माहिती दिली आहे. विवाहित महिलांचे छळापासून रक्षण करण्यासाठी १९८० च्या दशकात ४९८ (अ) हुंडाबळी व २००५ मध्ये गृहहिंसाचार यासारखे कडक कायदे करण्यात आले. परिणामी २०१२ ते २०१६ या पाच वर्षात ११ हजार १६० च्यावर महिलांनी पुरुषांवर या कायद्यानुसार तक्रारी नोंदविल्या. एकीकडे या कायद्याने स्त्रीयांचे रक्षण होत असले तरी दुसरीकडे याच कायद्याचा शस्त्रप्रमाणे धाक दाखवून समाजातील असामाजिक तत्वाकडून गैरवापर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया असलेली आदर्श कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत असल्याचे दिसून येते.चंद्रपूर जिल्ह्यात हुंडाबळी व गृहहिंसाचार अंतर्गत पोलीस स्टेशन तथा महिला पोलीस तक्रार निवारण कक्षात २०१२ ते १२५१, २०१३ मध्ये २०८०, २०१४ मध्ये २९४४, २०१५ मध्ये २०३८ व २०१६ मध्ये १६६६ तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच गृह हिंसाचार प्रकरणी सन २०१२ मध्ये १२५, २०१३ मध्ये १७८, २०१४ मध्ये २०३, २०१५ मध्ये २०१, २०१६ मध्ये ७३ तक्रारी प्राप्त झाल्या. मागील सहा वर्षा अगोदर सन २००५ मध्ये ४०७, २००६ मध्ये ५०२, २००७ मध्ये ४०७, २००८ मध्ये १७०, २००९ मध्ये २४०, २०१० मध्ये ४७ अशा पुरुषविरोधी ११७३ तक्रारी होत्या. मात्र सहा वर्षात या तक्रारी १० पटीने वाढलेल्या आहेत. भारतात एक हजार विवाहामागे १३ घटस्फोट होत आहेत. सन २०१४-१५ मध्ये भारतात ४ लाख ५२ हजार ७४३ पुरुषांनी तर ९ लाख ९ हजार ५७३ स्त्रीयांनी घटस्फोट घेतला. म्हणजे एका वर्षात १३ लाख ६२ हजार ३१६ कुटुंबाने घटस्फोट घेतला आहे. पुरूषांवरिल तक्रारीचा आलेख असाच वाढत राहिला तर विवाह संस्थेवरचा विश्वास कायम राहणार नाही. त्यामुळे सदर कायद्याचा दुरुपयोग थांबवून कुटुंब वाचविण्याचे आवाहन भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, अ‍ॅड. प्रदीप क्षिरसागर, यशवंत वाघ, सुदर्शन नैताम, डॉ. राहूल विधाते, शितल साळवे, गोपी आक्केवार, डॉ. गुरूदेव गेडाम, मनोज तारे, दीपक पराते, किशोर जंपलवार, गंगाधर गुरनुले, संदिप आत्राम यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी) मोबाईलमुळे वाढलेपती-पत्नीत गैरसमजसध्याच्या युगात मोबाईलमुळे पती-पत्नीत गैरसमज वाढू लागले आहेत. कुटुंबावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी संकटमोचक म्हणून पती पत्नीच्या मागे उभा राहतो. मात्र त्याची संपत्ती आपल्या नावे करण्यासाठी तगादा लावणे, अनैतीक संबध ठेवणे, ज्या घरात माहेरच्या मंडळींची ढवळाढवळ असते, त्या घराच वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. गृहहिंसाचार ४९८ (अ) या कायद्याला सर्वोच्च न्यायालयानेही दहशतवाद असे संबोधले आहे. या कायद्याने एक सून घरातील दहा स्त्रीयांना वेठीस धरते, हा कुठला न्याय, असे भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले आहे.