शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

दहा पंचायत समित्यांना ११ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:25 IST

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे कसोशीने प्रयत्न आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील

हागणदारी मुक्तीकडे वाटचाल : प्रत्येकांनी शौचालय बांधण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे कसोशीने प्रयत्न आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीपासून तर गावस्तरावरील यत्रंणा या कामास लागली आहे. गावस्तरावर शौचालय बांधकामाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नुकताच दहा पंचायत समित्यांना ११ कोटी ४ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली असून जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुके हागणदारीमुक्त म्हणुन घोषीत करण्यात आले असून सहा तालुके हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करुन नियमित वापर केल्यास गावातील घाणीचे साम्राज्य नाहीसे होण्यास मदत होणार आहे. यामुळे गावातील वातावरण आरोग्यदायी होऊन, लोकांचा जिवनमान उंचावण्यास मदत होईल. जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले असून यासाठी गावातील प्रत्येकांनी जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या चळवळी मध्ये सहभागी झाल्यास लवकरच जिल्हा हागणदारी मुक्ती होईल. यासाठी जिल्हा परिषद दक्ष आहे. त्यानुसार आॅक्टोबर २०१७ अखेर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी नुकतीच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयाच्या प्रोत्साहन निधी वितरणास ११ कोटी ४ लक्ष रूपयांची मान्यता दिली. त्यानुसार पंचायत समित्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळणार आहे.