शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. पीक जोमाने आले. मात्र सद्यस्थितीत १५ ...

यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. पीक जोमाने आले. मात्र सद्यस्थितीत १५ ते २० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी कपाशीसह, सोयाबीन, धान, तूर आदी पिके संकटात सापडली असून काही ठिकाणी ती करपतसुद्धा आहेत.

पहिल्या दोन महिन्यात चांगला पाऊस पडल्याने पिके जोमाने आली. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनला अधिक पसंती दिली असून कापसाची पेरणीही बऱ्यापैकी आहे. सध्या पिके फुलोल्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पाऊस गायब असल्याने तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सध्या शेतकरी फवारणीच्या कामाला लागले आहेत. मात्र पाऊस न आल्यास हातातील पीक वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या प्रत्येक शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र जोपर्यंत पाऊस कोसळणार नाही, तोपर्यंत काही खरे नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांवर कीड वाढत आहे. कापसावर मावा, तुडतुडे आदी किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे.

बाॅक्स

धान उत्पादकही आले संकटात

धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. धान पिकासाठी भरपूर प्रमाणात पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकून रोवणी केली आहे, तर काही शेतकऱ्यांची अद्यापही पावसामुळे रोवणी रखडली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

मागील २० दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आता पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. पाऊस नसल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे. कपाशीवरही कीड आली आहे.

- रमेश बावने

राजुरा

कोट

सुरुवातीला समाधानकारक पाऊस कोसळला. त्यामुळे सर्व दु:ख विसरून शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिकांची आंतरमशागतही सुरू आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हातात आलेले पीक जाण्याची शक्यता आहे.

- रत्नाकर माळवे

बल्लारपूर

बाॅक्स

११४.५

मि.मी. आतापर्यंत अपेक्षित पाऊस

--

२०

मि.मि. प्रत्यक्ष पडलेला पाऊस