शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. पीक जोमाने आले. मात्र सद्यस्थितीत १५ ...

यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. पीक जोमाने आले. मात्र सद्यस्थितीत १५ ते २० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी कपाशीसह, सोयाबीन, धान, तूर आदी पिके संकटात सापडली असून काही ठिकाणी ती करपतसुद्धा आहेत.

पहिल्या दोन महिन्यात चांगला पाऊस पडल्याने पिके जोमाने आली. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनला अधिक पसंती दिली असून कापसाची पेरणीही बऱ्यापैकी आहे. सध्या पिके फुलोल्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पाऊस गायब असल्याने तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सध्या शेतकरी फवारणीच्या कामाला लागले आहेत. मात्र पाऊस न आल्यास हातातील पीक वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या प्रत्येक शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र जोपर्यंत पाऊस कोसळणार नाही, तोपर्यंत काही खरे नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांवर कीड वाढत आहे. कापसावर मावा, तुडतुडे आदी किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे.

बाॅक्स

धान उत्पादकही आले संकटात

धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. धान पिकासाठी भरपूर प्रमाणात पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकून रोवणी केली आहे, तर काही शेतकऱ्यांची अद्यापही पावसामुळे रोवणी रखडली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

मागील २० दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आता पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. पाऊस नसल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे. कपाशीवरही कीड आली आहे.

- रमेश बावने

राजुरा

कोट

सुरुवातीला समाधानकारक पाऊस कोसळला. त्यामुळे सर्व दु:ख विसरून शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिकांची आंतरमशागतही सुरू आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हातात आलेले पीक जाण्याची शक्यता आहे.

- रत्नाकर माळवे

बल्लारपूर

बाॅक्स

११४.५

मि.मी. आतापर्यंत अपेक्षित पाऊस

--

२०

मि.मि. प्रत्यक्ष पडलेला पाऊस