शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. पीक जोमाने आले. मात्र सद्यस्थितीत १५ ...

यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. पीक जोमाने आले. मात्र सद्यस्थितीत १५ ते २० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी कपाशीसह, सोयाबीन, धान, तूर आदी पिके संकटात सापडली असून काही ठिकाणी ती करपतसुद्धा आहेत.

पहिल्या दोन महिन्यात चांगला पाऊस पडल्याने पिके जोमाने आली. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनला अधिक पसंती दिली असून कापसाची पेरणीही बऱ्यापैकी आहे. सध्या पिके फुलोल्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पाऊस गायब असल्याने तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सध्या शेतकरी फवारणीच्या कामाला लागले आहेत. मात्र पाऊस न आल्यास हातातील पीक वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या प्रत्येक शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र जोपर्यंत पाऊस कोसळणार नाही, तोपर्यंत काही खरे नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांवर कीड वाढत आहे. कापसावर मावा, तुडतुडे आदी किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे.

बाॅक्स

धान उत्पादकही आले संकटात

धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. धान पिकासाठी भरपूर प्रमाणात पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकून रोवणी केली आहे, तर काही शेतकऱ्यांची अद्यापही पावसामुळे रोवणी रखडली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

मागील २० दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आता पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. पाऊस नसल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे. कपाशीवरही कीड आली आहे.

- रमेश बावने

राजुरा

कोट

सुरुवातीला समाधानकारक पाऊस कोसळला. त्यामुळे सर्व दु:ख विसरून शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिकांची आंतरमशागतही सुरू आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हातात आलेले पीक जाण्याची शक्यता आहे.

- रत्नाकर माळवे

बल्लारपूर

बाॅक्स

११४.५

मि.मी. आतापर्यंत अपेक्षित पाऊस

--

२०

मि.मि. प्रत्यक्ष पडलेला पाऊस