शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तुकूम जलशुद्धीकरण यंत्रात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:40 IST

येथील तुकूम परिसरातील जलशुध्दीकरण यंत्रात शुक्रवारी तांत्रिक बिघाड आला. यामुळे आज शनिवारी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. ऐन उन्हाळ्यात आणि तेही कोणतीही पूर्वसूचना नसताना नळाला पाणी न आल्याने चंद्रपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील तुकूम परिसरातील जलशुध्दीकरण यंत्रात शुक्रवारी तांत्रिक बिघाड आला. यामुळे आज शनिवारी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. ऐन उन्हाळ्यात आणि तेही कोणतीही पूर्वसूचना नसताना नळाला पाणी न आल्याने चंद्रपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.शुक्रवारी तुकूम येथील जलशुध्दीकरण यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नागरिकांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. सध्या चंद्रपुरात सूर्य आग ओकत आहे. सातत्याने महिनाभर पारा ४५ अंशाच्या वर असल्यामुळे शहरातील विहिरी, बोअरवेल आटल्या आहेत. नागरिक पाण्यासाठी इतरत्र भटकत आहेत. दरम्यान, शनिवारी चंद्रपुरातील अनेक भागात पाणी पुरवठा न झाल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दैनंदिन कामावर परिणाम झाला. आधीच विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. अशात नळही येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना कुलर बंद ठेवून रहावे लागत आहे.बिघाड तात्काळ दुरुस्तशनिवारी नळ आले नाही. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेता मनपा आयुक्त संजय काकडे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, संजय जोगी, रवींद्र कळंबे, नरेंद्र पवार, अतुल टिकले यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी अहोरात्र काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे. येत्या १-२ दिवसात संपूर्ण चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नरत आहे. कधी तांत्रिक बिघाडामुळे समस्या उदभवते. त्यासाठी पालिका अधिकारी-कर्मचारी वर्ग दिवसरात्र कार्यरत आहेत. पाणीपुरवठयासाठी मनपा कटीबद्ध आहे, नागरिकांनी याकरिता सहकार्य करावे.- संजय काकडे, आयुक्त, मनपा चंद्रपूर.

टॅग्स :Waterपाणी