शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

जिवतीतील शाळांना शिक्षकांचे ‘नो लाईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:21 IST

अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळांची अवस्था : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार

संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस असतानाही येथील शाळांमध्ये शिक्षक रुजूच झाले नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून शिक्षण विभागाने जवळच्या शाळेतील शिक्षकांना त्या शाळेत प्रतिनियुक्ती देऊन शाळा उघडल्याचा प्रकार शाळेच्या पहिल्या दिवशी घडला.जिवती तालुक्यात काही शासकीय नोकरदार सेवा करण्यात नाखूश आहेत, याची प्रचिती यावरुन दिसून येते. शिक्षकांच्या यावर्षीच्या बदली प्रक्रियेत जिवती तालुक्यातून २४६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या जागी जवळपास २१५ शिक्षक रुजू झाले. यात ३१ शिक्षकांची आणखी आवश्यकता आहे. मागील वर्षी विषय शिक्षकांच्या बदल्यात जिवतीवरुन विषय शिक्षक बदली झालेत. परंतु, दुसरे विषय शिक्षक अजूनही सुरू झालेले नाहीत. केवळ १० विषय शिक्षक रुजू झाले असून आजही ५० विषय शिक्षकांचा अनुशेष आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया ही आॅनलाईन राबविण्यात आली. मात्र जिवती तालुक्यातील येरव्हा, राहपल्ली (बु.) पळसगुडा, पाटागुडा, महाराजगुडा, कोलामगुडा, शेडवाही, टाटाकोहाळ, भुरी येसापूर येथील शाळांना पसंती दिली नाही. २६ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी या शाळात प्रतीनियुक्तीवर जवळच्या शाळेतील शिक्षक पाठविण्यात आले.तालुक्यातील अनेक शाळेत चार ते पाच शिक्षकांची आवश्यकता असताना, त्या शाळेत केवळ एकच शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहेत. तर ‘त्या’ नऊ शाळांमध्ये शिक्षकच रुजू झाले नाही तर शाळाच बंद करण्याची वेळ तर येणार नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.रुजू झाले आणि वैद्यकीय रजेवर गेलेबदली प्रक्रियेनंतर तालुक्यात अनेक शाळांत शिक्षक रुजू झालेत. परंतु, आल्याआल्याच वैद्यकीय रजा घेऊन निघून गेलेत. वैद्यकीय रजा घेऊन अनेकांनी काढता पाय घेतल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.मोठ्या शाळा ओसतालुक्यात शिक्षक रुजू न झाल्यामुळे तसेच रुजू झालेले शिक्षक वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे मोठ्या जि. प. शाळा ओस पडल्या आहेत. कुंबेझरी येथील डिजिटल शाळा, सेवादासनगर, येल्लापूर या मोठ्या शाळांत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थीही येत नाही.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक