शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिवतीतील शाळांना शिक्षकांचे ‘नो लाईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:21 IST

अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळांची अवस्था : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार

संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस असतानाही येथील शाळांमध्ये शिक्षक रुजूच झाले नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून शिक्षण विभागाने जवळच्या शाळेतील शिक्षकांना त्या शाळेत प्रतिनियुक्ती देऊन शाळा उघडल्याचा प्रकार शाळेच्या पहिल्या दिवशी घडला.जिवती तालुक्यात काही शासकीय नोकरदार सेवा करण्यात नाखूश आहेत, याची प्रचिती यावरुन दिसून येते. शिक्षकांच्या यावर्षीच्या बदली प्रक्रियेत जिवती तालुक्यातून २४६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या जागी जवळपास २१५ शिक्षक रुजू झाले. यात ३१ शिक्षकांची आणखी आवश्यकता आहे. मागील वर्षी विषय शिक्षकांच्या बदल्यात जिवतीवरुन विषय शिक्षक बदली झालेत. परंतु, दुसरे विषय शिक्षक अजूनही सुरू झालेले नाहीत. केवळ १० विषय शिक्षक रुजू झाले असून आजही ५० विषय शिक्षकांचा अनुशेष आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया ही आॅनलाईन राबविण्यात आली. मात्र जिवती तालुक्यातील येरव्हा, राहपल्ली (बु.) पळसगुडा, पाटागुडा, महाराजगुडा, कोलामगुडा, शेडवाही, टाटाकोहाळ, भुरी येसापूर येथील शाळांना पसंती दिली नाही. २६ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी या शाळात प्रतीनियुक्तीवर जवळच्या शाळेतील शिक्षक पाठविण्यात आले.तालुक्यातील अनेक शाळेत चार ते पाच शिक्षकांची आवश्यकता असताना, त्या शाळेत केवळ एकच शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहेत. तर ‘त्या’ नऊ शाळांमध्ये शिक्षकच रुजू झाले नाही तर शाळाच बंद करण्याची वेळ तर येणार नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.रुजू झाले आणि वैद्यकीय रजेवर गेलेबदली प्रक्रियेनंतर तालुक्यात अनेक शाळांत शिक्षक रुजू झालेत. परंतु, आल्याआल्याच वैद्यकीय रजा घेऊन निघून गेलेत. वैद्यकीय रजा घेऊन अनेकांनी काढता पाय घेतल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.मोठ्या शाळा ओसतालुक्यात शिक्षक रुजू न झाल्यामुळे तसेच रुजू झालेले शिक्षक वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे मोठ्या जि. प. शाळा ओस पडल्या आहेत. कुंबेझरी येथील डिजिटल शाळा, सेवादासनगर, येल्लापूर या मोठ्या शाळांत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थीही येत नाही.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक