शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा वनवास संपेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 00:53 IST

गेल्या चार ते पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या न झाल्याने त्याचा फटका अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांना

विषय शिक्षकही रुजू व्हायला तयार नाहीत : कर्मचाऱ्यांना जिवती तालुक्याची अ‍ॅलर्जीसंघरक्षित तावाडे । लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : गेल्या चार ते पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या न झाल्याने त्याचा फटका अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांना नेहमीच सहन करावा लागला आहे. बदली प्रक्रिया होत नसल्याने त्याच दुर्गम ठिकाणी किती वर्ष काढायचे हा प्रश्न त्यांना पडतो आहे. जिवतीसारख्या दुर्गम तालुक्यात अनेक शिक्षकांना १३ ते १४ वर्षे झालीत. तरीही त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. कारण यात राजकारण आड येत आहे. चंद्रपूरजवळ असलेल्या शिक्षक संघटना या मजबूत असून संघटनेचे पदाधिकारी नेत्यांच्या नेहमी संपर्कात असतात. त्यातच जिवतीसारख्या दुर्गम भागात जाण्याची त्यांच्यात असलेली ‘अ‍ॅलर्जी’ हे सर्व कारणे यासाठी कारणीभूत आहेत. विषय शिक्षकांच्या बाबतही तसेच आहे. नुकत्याच विषय शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये जिवती तालुक्यातून ७८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या ठिकाणी ७८ ऐवजी केवळ नऊ शिक्षकच आले. बाकी शिक्षक अजूनही आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात जिवती तालुक्याबद्दल अ‍ॅलर्जी तर दिसतेच. परंतु विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. विषय शिक्षक पदस्थापना पूर्णता चुकीची झाल्यामुळे तालुक्यावर अन्याय झाला असून उर्वरित ६९ पदे खाली आहेत. त्याचे काय? विषय शिक्षक समुपदेशनाने न पाठविता रिक्त जागेवर त्यांना पाठविले असते तर जिल्ह्यातील सर्व शाळांना विषय शिक्षक मिळाले असते, असे मत पंचायत समिती उपसभापती महेश देवकते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.तालुक्यात अनेक शाळा वर्ग १ ते ८ पर्यंतच्या आहेत. पण त्या शाळेत केवळ १ ते २ शिक्षकच गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. याकडे प्रशासन लक्ष देण्याऐवजी, आहे त्याही विषय शिक्षकांच्या बदल्या करीत आहे.