शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पटसंख्या अन् नोकरी टिकण्यासाठी शिक्षकांना गावागावांत जाऊन करावी लागते भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:06 IST

Chandrapur : संस्थाचालंकाकडून शिक्षकांना दिले टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : एकेकाळी शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, आजची परिस्थिती उलट आहे. शैक्षणिक वर्ष संपताच विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुट्यांची पर्वणी लाभते. सध्या शाळांच्या गुरुजींना वर्गतुकड्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांचा शोध घेत भटकंती करावी लागत आहे. पालकांनी मुलाचे नाव आमच्या शाळेत टाकले पाहिजे म्हणून शाळेच्या महतीसह प्रलोभनही दाखविण्यात येत आहे.

सध्या शिक्षकांना सुट्या असल्या तरी रोज शिक्षक विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबवत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षक आपल्या संस्थेच्या उच्च शिक्षण व सुविधेची बतावणी करून पाल्यांना आकर्षित करीत आहे. मात्र, काही शाळांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेली असल्याने विद्यार्थी अन्य ठिकाणी शिक्षणासाठी जाणे पसंत करीत आहेत. शिक्षण संस्थांनी शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा केल्यास त्या शाळांत विद्यार्थ्यांचा निश्चितच कल वाढीस लागेल. वर्गतुकड्या टिकविण्यासाठी शिक्षक पालकांना गुणवत्तेचे धडे सध्या सांगत आहे. चौथीचा निकाल लागल्यापासून शिक्षक त्या शाळेसमोर ठाण मांडून आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकाकडे रोज येरझारा मारून प्रवेश मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न शिक्षक करताना दिसून येत आहेत. शहर, तालुका व गावातील काही खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षक आपली नोकरी टिकून राहावी म्हणून विद्यार्थ्यांच्या शोधात गावे पिंजून काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संस्थाचालंकाकडून शिक्षकांना दिले टार्गेटजुन्या खासगी संस्थांच्या वर्गतुकड्यांची मंजुरी टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांची भरपाई करणे गरजेचे असते. विद्यार्थी मिळाले नसल्यास वर्गतुकड्या तुटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे शिक्षण संस्थेच्या संस्थापक मंडळींकडूनही विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट दिले जात असल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरzp schoolजिल्हा परिषद शाळा