शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

उद्दिष्ट एक हजार कोटी, कर्जवितरण फक्त २३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अधिनस्थ विविध कार्यकारी संस्थांचे जाळे ग्रामीण भागात पसरल्याने बहुतांश शेतकरी या संस्थांकडून पिककर्ज घेतात. तुलनेने राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्जासाठी अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार बँकांनी कर्ज वितरणाची तयारी सुरू केली.

ठळक मुद्देबँकांचा हात आखडता : खरिपासाठी पीककर्ज मिळाले नाही तर दुष्काळ उगवणार !

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण कृषी अर्थकारणाची चाके दुष्टचक्रात रूतली असतानाच कोरोना लॉकडाऊनमुळे ती आणखी खोलात गेली. खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. आता खरीप हंगामासाठी पैशाची गरज असल्याने शेतकरीपीक कर्जाकरिता बँकांकडे चकरा मारत आहेत. जिल्ह्याला यंदा एकहजार कोटींचे उद्दिष्ट मिळाले. मात्र, कर्ज वितरणासाठी बँकांनी हात आखडता घेतल्याने एप्रिलपर्यंत केवळ २३ कोटी २९ लाख १३ हजारांचेच कर्ज वितरण होऊ शकले. त्यामुळे कर्ज वितरणाची गती वाढवून आर्थिक कोंडी दूर केली नाही तर खरीप हंगामात ‘दुष्काळ’ उगवण्याचा धोका शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अधिनस्थ विविध कार्यकारी संस्थांचे जाळे ग्रामीण भागात पसरल्याने बहुतांश शेतकरी या संस्थांकडून पिककर्ज घेतात. तुलनेने राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्जासाठी अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार बँकांनी कर्ज वितरणाची तयारी सुरू केली. २० एप्रिलपर्यंत २३ हजार कोटी २९ लाखांचे कर्ज वितरण झाले. दरम्यान, २४ एप्रिलला लॉकडाऊन सुरू झाल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने जीवनाश्यक वस्तु व सेवांचा अपवाद वगळून सर्व क्षेत्रांवर प्रतिबंध घातला. सोशल डिस्टन्सचे पालन करून बँकांचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले. मात्र, खरीप कर्जासाठी अर्ज स्वीकारणे, मंजुरी देणे व वितरणाची व्यवस्थाच विस्कळीत झाली. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्याने बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. परंतु, पिककर्ज प्रकरणांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अद्याप गतिमान झाली नाही. त्यामुळे पैशाअभावी शेतकरी धास्तावले आहेत.जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडीएप्रिल २०२० पर्यंत ३ हजार ९८० शेतकऱ्यांना २३ कोटी २९ लाख १३ हजारांचे खरीप पीक कर्ज वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्थांमार्फत सर्वाधिक १८ कोटी ८३ लाख ९९ हजारांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरीत केल्याचे पुढे आले आहे.राष्ट्रीयीकृत बँकांचा ताठरपणा मुळावरराष्ट्रीयीकृत बँकांनी एप्रिल २०२० पर्यंत एकून उद्दिष्टाच्या तुलनेत सुमारे चार कोटींचेच पिककर्ज वाटप केले. यंदाच्या खरीप हंगामाच्या आगमाची स्थिती बघता वितरण केलेल्या कर्जाची टक्केवारी चिंताजनक आहे. रब्बी व खरीप हंगामात कर्ज वितरण करताना राष्ट्रीयीकृत बँकांनी स्वीकारलेला ताठरपणा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारा असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.व्याज परताव्याबाबत संभ्रमपीककर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकऱ्यांना केंद्राकडून ३ टक्के व राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतंर्गत ३ टक्के व्याज सवलत दिली जाते. परंतु, केंद्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार अल्प मुदत खरीप पिककर्जाची परतफेड ३१ मे २०२० पर्यंत करणाऱ्या शेतकऱ्यांनाच केंद्राचा ३ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १ जून ते ३० जून २०२० या कालावधीत बँकांच्या प्रचलित व्याज दराप्रमाणे व्याज भरावा लागणार आहे. शेतकरी सभासदानाही एक महिन्याचा व्याज परतावा मिळणार नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.हिस्सेदाराच्या स्वाक्षरीची अट वगळावीशंकरपूर : लॉकडाऊनमुळे बँकेतून पिककर्ज घेण्यासाठी हिस्सेदारांच्या स्वाक्षरी आणण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पुर्तता करताना हिस्सेदाराच्या स्वाक्षरीची अट वगळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज देण्याची प्रक्रिया राष्ट्रीयीकृत बँक व सोसायटींमार्फत सुरू आहे. कर्जासाठी सातबारा नमुना आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड द्यावा लागतो. परंतु सातबारावर एकापेक्षा जास्त नावे असल्यास १०० रूपयांच्या मुद्रांकावर संमतीपत्र देण्याचा नियम आहे. बँक निरीक्षकासमोर उपस्थित राहून स्वाक्षरी केली तरच कर्ज मिळते. बऱ्याच शेतकऱ्यांचे भाऊ, बहीण, आई-वडील लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना निरीक्षकांसमक्ष स्वाक्षरीच्या अटीतून वगळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज