शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट एक हजार कोटी, कर्जवितरण फक्त २३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अधिनस्थ विविध कार्यकारी संस्थांचे जाळे ग्रामीण भागात पसरल्याने बहुतांश शेतकरी या संस्थांकडून पिककर्ज घेतात. तुलनेने राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्जासाठी अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार बँकांनी कर्ज वितरणाची तयारी सुरू केली.

ठळक मुद्देबँकांचा हात आखडता : खरिपासाठी पीककर्ज मिळाले नाही तर दुष्काळ उगवणार !

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण कृषी अर्थकारणाची चाके दुष्टचक्रात रूतली असतानाच कोरोना लॉकडाऊनमुळे ती आणखी खोलात गेली. खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. आता खरीप हंगामासाठी पैशाची गरज असल्याने शेतकरीपीक कर्जाकरिता बँकांकडे चकरा मारत आहेत. जिल्ह्याला यंदा एकहजार कोटींचे उद्दिष्ट मिळाले. मात्र, कर्ज वितरणासाठी बँकांनी हात आखडता घेतल्याने एप्रिलपर्यंत केवळ २३ कोटी २९ लाख १३ हजारांचेच कर्ज वितरण होऊ शकले. त्यामुळे कर्ज वितरणाची गती वाढवून आर्थिक कोंडी दूर केली नाही तर खरीप हंगामात ‘दुष्काळ’ उगवण्याचा धोका शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अधिनस्थ विविध कार्यकारी संस्थांचे जाळे ग्रामीण भागात पसरल्याने बहुतांश शेतकरी या संस्थांकडून पिककर्ज घेतात. तुलनेने राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्जासाठी अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार बँकांनी कर्ज वितरणाची तयारी सुरू केली. २० एप्रिलपर्यंत २३ हजार कोटी २९ लाखांचे कर्ज वितरण झाले. दरम्यान, २४ एप्रिलला लॉकडाऊन सुरू झाल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने जीवनाश्यक वस्तु व सेवांचा अपवाद वगळून सर्व क्षेत्रांवर प्रतिबंध घातला. सोशल डिस्टन्सचे पालन करून बँकांचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले. मात्र, खरीप कर्जासाठी अर्ज स्वीकारणे, मंजुरी देणे व वितरणाची व्यवस्थाच विस्कळीत झाली. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्याने बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. परंतु, पिककर्ज प्रकरणांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अद्याप गतिमान झाली नाही. त्यामुळे पैशाअभावी शेतकरी धास्तावले आहेत.जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडीएप्रिल २०२० पर्यंत ३ हजार ९८० शेतकऱ्यांना २३ कोटी २९ लाख १३ हजारांचे खरीप पीक कर्ज वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्थांमार्फत सर्वाधिक १८ कोटी ८३ लाख ९९ हजारांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरीत केल्याचे पुढे आले आहे.राष्ट्रीयीकृत बँकांचा ताठरपणा मुळावरराष्ट्रीयीकृत बँकांनी एप्रिल २०२० पर्यंत एकून उद्दिष्टाच्या तुलनेत सुमारे चार कोटींचेच पिककर्ज वाटप केले. यंदाच्या खरीप हंगामाच्या आगमाची स्थिती बघता वितरण केलेल्या कर्जाची टक्केवारी चिंताजनक आहे. रब्बी व खरीप हंगामात कर्ज वितरण करताना राष्ट्रीयीकृत बँकांनी स्वीकारलेला ताठरपणा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारा असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.व्याज परताव्याबाबत संभ्रमपीककर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकऱ्यांना केंद्राकडून ३ टक्के व राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतंर्गत ३ टक्के व्याज सवलत दिली जाते. परंतु, केंद्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार अल्प मुदत खरीप पिककर्जाची परतफेड ३१ मे २०२० पर्यंत करणाऱ्या शेतकऱ्यांनाच केंद्राचा ३ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १ जून ते ३० जून २०२० या कालावधीत बँकांच्या प्रचलित व्याज दराप्रमाणे व्याज भरावा लागणार आहे. शेतकरी सभासदानाही एक महिन्याचा व्याज परतावा मिळणार नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.हिस्सेदाराच्या स्वाक्षरीची अट वगळावीशंकरपूर : लॉकडाऊनमुळे बँकेतून पिककर्ज घेण्यासाठी हिस्सेदारांच्या स्वाक्षरी आणण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पुर्तता करताना हिस्सेदाराच्या स्वाक्षरीची अट वगळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज देण्याची प्रक्रिया राष्ट्रीयीकृत बँक व सोसायटींमार्फत सुरू आहे. कर्जासाठी सातबारा नमुना आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड द्यावा लागतो. परंतु सातबारावर एकापेक्षा जास्त नावे असल्यास १०० रूपयांच्या मुद्रांकावर संमतीपत्र देण्याचा नियम आहे. बँक निरीक्षकासमोर उपस्थित राहून स्वाक्षरी केली तरच कर्ज मिळते. बऱ्याच शेतकऱ्यांचे भाऊ, बहीण, आई-वडील लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना निरीक्षकांसमक्ष स्वाक्षरीच्या अटीतून वगळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज