शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
3
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
4
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
5
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
6
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
7
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
8
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
9
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
10
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
11
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
12
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
13
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
14
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
15
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
16
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
17
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
18
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
19
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
20
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत

पहाडावर टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: July 6, 2014 23:51 IST

जून महिना उलटूनही पाऊस न आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावातील विहिरी, हातपंप आटले

जलस्तर घटला : नागरिकांची पाण्यासाठी भटकंतीचंद्रपूर: जून महिना उलटूनही पाऊस न आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावातील विहिरी, हातपंप आटले असून नदी नालेही आटण्याच्या स्थितीत आहेत. त्यातच जीवती तालुक्यातील पहाडावर असलेल्या अनेक गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी वेगाने आटत चालले आहे. आभाळात ढग दाटून येतात पण पाऊसच येत नाही. अशी स्थिती आहे. चंद्रपुरात होणाऱ्या वीज उत्पादनासह उद्योगांवरही जलसंकट ओढवण्याची चिन्हे आहेत. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. धानपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये अद्यापही धान रोवणीला सुरूवात झाली नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील ४ लाख ६९ हजार हेक्टरपैकी केवळ ५७ हजार ७४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी जूनच्या अखेरपर्यंत १०० टक्के पेरण्या आटोपल्या होता. मात्र यावर्षी आतापर्यंत केवळ १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील लहानमोठी जलायशेही आटत चालली आहेत. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणासह आसोलामेंढा व नलेश्वर ही धरणे सोडली तर उर्वरित सर्व जलाशये वेगाने आटत आहेत. चंदई धरणे पूर्णत: रिते झाले आहे. लभानसराड प्रकल्पात केवळ ०.०४ टक्के जलसाठा आहे. इरई धरणात सर्वांत जास्त म्हणजे ४५.१३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जुलै महिन्यात जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली होती. यावर्षी मात्र स्थिती भयावह आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांंना आर्थिक फटका सहन करीत आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)