शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पहाडावर टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: July 6, 2014 23:51 IST

जून महिना उलटूनही पाऊस न आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावातील विहिरी, हातपंप आटले

जलस्तर घटला : नागरिकांची पाण्यासाठी भटकंतीचंद्रपूर: जून महिना उलटूनही पाऊस न आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावातील विहिरी, हातपंप आटले असून नदी नालेही आटण्याच्या स्थितीत आहेत. त्यातच जीवती तालुक्यातील पहाडावर असलेल्या अनेक गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी वेगाने आटत चालले आहे. आभाळात ढग दाटून येतात पण पाऊसच येत नाही. अशी स्थिती आहे. चंद्रपुरात होणाऱ्या वीज उत्पादनासह उद्योगांवरही जलसंकट ओढवण्याची चिन्हे आहेत. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. धानपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये अद्यापही धान रोवणीला सुरूवात झाली नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील ४ लाख ६९ हजार हेक्टरपैकी केवळ ५७ हजार ७४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी जूनच्या अखेरपर्यंत १०० टक्के पेरण्या आटोपल्या होता. मात्र यावर्षी आतापर्यंत केवळ १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील लहानमोठी जलायशेही आटत चालली आहेत. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणासह आसोलामेंढा व नलेश्वर ही धरणे सोडली तर उर्वरित सर्व जलाशये वेगाने आटत आहेत. चंदई धरणे पूर्णत: रिते झाले आहे. लभानसराड प्रकल्पात केवळ ०.०४ टक्के जलसाठा आहे. इरई धरणात सर्वांत जास्त म्हणजे ४५.१३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जुलै महिन्यात जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली होती. यावर्षी मात्र स्थिती भयावह आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांंना आर्थिक फटका सहन करीत आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)