शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावर टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: July 6, 2014 23:51 IST

जून महिना उलटूनही पाऊस न आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावातील विहिरी, हातपंप आटले

जलस्तर घटला : नागरिकांची पाण्यासाठी भटकंतीचंद्रपूर: जून महिना उलटूनही पाऊस न आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावातील विहिरी, हातपंप आटले असून नदी नालेही आटण्याच्या स्थितीत आहेत. त्यातच जीवती तालुक्यातील पहाडावर असलेल्या अनेक गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी वेगाने आटत चालले आहे. आभाळात ढग दाटून येतात पण पाऊसच येत नाही. अशी स्थिती आहे. चंद्रपुरात होणाऱ्या वीज उत्पादनासह उद्योगांवरही जलसंकट ओढवण्याची चिन्हे आहेत. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. धानपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये अद्यापही धान रोवणीला सुरूवात झाली नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील ४ लाख ६९ हजार हेक्टरपैकी केवळ ५७ हजार ७४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी जूनच्या अखेरपर्यंत १०० टक्के पेरण्या आटोपल्या होता. मात्र यावर्षी आतापर्यंत केवळ १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील लहानमोठी जलायशेही आटत चालली आहेत. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणासह आसोलामेंढा व नलेश्वर ही धरणे सोडली तर उर्वरित सर्व जलाशये वेगाने आटत आहेत. चंदई धरणे पूर्णत: रिते झाले आहे. लभानसराड प्रकल्पात केवळ ०.०४ टक्के जलसाठा आहे. इरई धरणात सर्वांत जास्त म्हणजे ४५.१३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जुलै महिन्यात जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली होती. यावर्षी मात्र स्थिती भयावह आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांंना आर्थिक फटका सहन करीत आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)