शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तळोधीचे अप्पर तहसील कार्यालय वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:01 IST

मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गावांचा कारभार सोपविण्यात आला.

ठळक मुद्देअतिरिक्त तहसीलदार नियुक्तीची मागणी : ४० गावे आहेत जुळली

लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे मुख्य तहसीलमधून काही गावांचा भार कमी व्हावा, यासाठी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती मोठा गाजावाजा करून करण्यात आली. अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली. मात्र अल्पावधीतच त्यांची बदली झाली. दरम्यान, काही दिवस नायब तहसीलदार यांच्या भरोशावर कारभार चालला. मात्र अलिकडे या ठिकाणी अधिकारीच राहत नसल्याने हे अप्पर कार्यालय वाºयावर सोडले आहे. परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गावांचा कारभार सोपविण्यात आला.परिसरातील नागरिकांचे कामे सदर कार्यालयात तातडीने व्हावे, यासाठी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सहा महिन्यातच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले.परिसरातील नागरिकांसाठी नागभीड हे अंतर दूर असल्याने जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, नागरिक व विद्यार्थ्यांची कामे इत्यादींसाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.छोटा मोठ्या कामासाठी नागभीड तहसील कार्यालयामध्येच जावे लागत आहे. तळोधीचे अप्पर तहसील कार्यालय हे रामभरोसे असल्याने पुन्हा मुख्य तहसील कार्यालयावरच ४० गावांचा भार आलेला आहे. दरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी नवीन तहसीलदाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी परिसरातील नागरिकांसह वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.परिसरातील ४० गावांच्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने सदर अप्पर तहसील कार्यालयात अतिरिक्त तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात यावी व कारभार सुरळीत करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.- अश्विन मेश्राम, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :Tahasildarतहसीलदार